शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

सांगली, कोल्हापूरच्या रक्तदात्यांकडून कर्नाटकच्या तरुणास जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:24 IST

सांगली : अपघातग्रस्त होऊन रुग्णालयामध्ये जीवन-मरणाच्या कुंपणावर असलेल्या एका तरुणाचा रक्तगट बॉम्बे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्या रुग्णालयामधील डॉक्टरांची चिंता ...

सांगली : अपघातग्रस्त होऊन रुग्णालयामध्ये जीवन-मरणाच्या कुंपणावर असलेल्या एका तरुणाचा रक्तगट बॉम्बे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्या रुग्णालयामधील डॉक्टरांची चिंता वाढली. प्रयत्नांची पराकाष्टा केल्यानंतर अखेर त्यांना सांगलीच्या बॉम्बे ग्रुपच्या माध्यमातून आशेचा किरण दिसला. कोल्हापूर व सांगली याठिकाणच्या बॉम्बे ग्रुपच्या दोन रक्तदात्यांनी धावाधाव करून या तरुणाला जीवदान दिले. माणुसकीचे अनोखे दर्शन घडवून रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टरांची मनेही या तरुणांनी जिंकली.रायबाग येथील जनार्दन गोपाळ वंजिरे या ३३ वर्षीय तरुणाचा जांबोटी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथे अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला बेळगावच्या विजया हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रक्ताच्या विविध तपासण्या केल्यानंतर, त्याचा रक्तगट अत्यंत दुर्मिळ म्हणजेच ‘बॉम्बे ओ’ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. डॉक्टरांना हा रक्तगट किती दुर्मिळ आहे, याची कल्पना होती. त्यामुळे त्यांच्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या. त्याचे प्राण वाचविण्यासाठी दोन बाटल्या रक्त तातडीने हवे होते. बेळगावसह कर्नाटकातील अनेक रक्तपेढ्यांशी संपर्क केल्यानंतरही, त्यांना हे रक्त उपलब्ध झाले नाही. शेवटी इंटरनेटवरून त्यांना सांगली जिल्ह्यात स्थापन झालेल्या बॉम्बे ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनचा संपर्क क्रमांक मिळाला. त्यावेळी ग्रुपचे संस्थापक विक्रम यादव यांनी हे रक्त उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील हणमंत भोसले आणि कोल्हापूर येथील सुनील भोसले या दोघांशी त्यांनी संपर्क साधला. सुनील भोसले हे बेळगावला जाऊन रक्तदान करायला तयार झाले, मात्र हणमंत भोसले यांना कामावरून सुटी मिळणे मुश्किल होते. त्यामुळे त्यांनी कामाच्या ठिकाणी, आईच्या प्रकृतीचे कारण सांगून केवळ तीन तासांची सुटी काढली. त्यानंतर त्यांनी मिरजेतील एका रक्तपेढीत रक्तदान केले. ग्रुपच्या सदस्यांनी हे रक्त रेल्वेने बेळगावच्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचविले. अत्यंत कमी वेळात हे रक्त पोहोचल्यामुळे त्या रुग्णाचे प्राण वाचविणे डॉक्टरांना शक्य झाले.नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रूदोघांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे रुग्णालयाचे डॉक्टर, कर्मचारी व रुग्णाचे नातेवाईक भारावून गेले. नातेवाईकांच्या डोळ्यात त्यांच्या मदतीने अश्रू उभे राहिले. वंजिरे यांचा धोका आता टळला असल्याचे सांगत, येथील डॉ. रवी पाटील, ब्लड बँकेचे संचालक गिरीश बुडरकट्टी यांनी भोसले यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.काय आहे ‘बॉम्बे ब्लड’मुंबईमध्ये १९५२ मध्ये वाय. एम. भेंडे नावाच्या डॉक्टरनी या रक्तगटाचा शोध लावला होता. पूर्वी मुंबईला बॉम्बे म्हटले जायचे. म्हणून या शहराचेच नाव या रक्तगटाला देण्यात आले. हा सर्वात दुर्मिळ रक्तगट मानला जातो. याचे जगभरातील प्रमाण 0.000४ इतके आहे. या रक्तगटातील व्यक्तीचे रक्त अन्य लोकांना चालते, मात्र या लोकांना त्यांच्याच गटाचे रक्त लागते.