शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
3
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
4
१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट
5
चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
6
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?
7
आयपीएलमध्ये तिकीट घोटाळा, सीआयडीची मोठी कारवाई, हैदराबाद क्रिकेट संघटेनेच्या अध्यक्षांना अटक   
8
'पालिका प्लॅन' ON ! सांगली, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
9
दे दणादण! काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; माजी आमदार जखमी
10
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
11
Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला सायंकाळी 'हा' उपाय करा; अडलेली कामे मार्गी लागतील!
12
पुन्हा प्रेमात पडला आदित्य रॉय कपूर? अनन्या पांडेनंतर आता 'या' मॉडेलसोबत डेटिंगच्या चर्चा
13
संजय शिरसाट यांना आयकर नोटीस; विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशी आदेशानंतर दुसरा धक्का
14
उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व
15
जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?
16
"मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभूराज देसाईंची महत्त्वाची घोषणा
17
Airtel Recharge Plan: २०० रुपयांपेक्षा स्वस्तातील एअरटेलचे हे प्लान्स आहेत बेस्ट, WiFi असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा
18
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
19
Sindoor Bridge: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन
20
एका शब्दावरून निवडणूक आयोग अडकला, सर्वोच्च न्यायालयात मतदार पुनरावलोकनावरील सुनावणीवेळी झाली कोंडी

सांगली, कोल्हापूरच्या रक्तदात्यांकडून कर्नाटकच्या तरुणास जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:24 IST

सांगली : अपघातग्रस्त होऊन रुग्णालयामध्ये जीवन-मरणाच्या कुंपणावर असलेल्या एका तरुणाचा रक्तगट बॉम्बे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्या रुग्णालयामधील डॉक्टरांची चिंता ...

सांगली : अपघातग्रस्त होऊन रुग्णालयामध्ये जीवन-मरणाच्या कुंपणावर असलेल्या एका तरुणाचा रक्तगट बॉम्बे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्या रुग्णालयामधील डॉक्टरांची चिंता वाढली. प्रयत्नांची पराकाष्टा केल्यानंतर अखेर त्यांना सांगलीच्या बॉम्बे ग्रुपच्या माध्यमातून आशेचा किरण दिसला. कोल्हापूर व सांगली याठिकाणच्या बॉम्बे ग्रुपच्या दोन रक्तदात्यांनी धावाधाव करून या तरुणाला जीवदान दिले. माणुसकीचे अनोखे दर्शन घडवून रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टरांची मनेही या तरुणांनी जिंकली.रायबाग येथील जनार्दन गोपाळ वंजिरे या ३३ वर्षीय तरुणाचा जांबोटी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथे अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला बेळगावच्या विजया हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रक्ताच्या विविध तपासण्या केल्यानंतर, त्याचा रक्तगट अत्यंत दुर्मिळ म्हणजेच ‘बॉम्बे ओ’ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. डॉक्टरांना हा रक्तगट किती दुर्मिळ आहे, याची कल्पना होती. त्यामुळे त्यांच्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या. त्याचे प्राण वाचविण्यासाठी दोन बाटल्या रक्त तातडीने हवे होते. बेळगावसह कर्नाटकातील अनेक रक्तपेढ्यांशी संपर्क केल्यानंतरही, त्यांना हे रक्त उपलब्ध झाले नाही. शेवटी इंटरनेटवरून त्यांना सांगली जिल्ह्यात स्थापन झालेल्या बॉम्बे ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनचा संपर्क क्रमांक मिळाला. त्यावेळी ग्रुपचे संस्थापक विक्रम यादव यांनी हे रक्त उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील हणमंत भोसले आणि कोल्हापूर येथील सुनील भोसले या दोघांशी त्यांनी संपर्क साधला. सुनील भोसले हे बेळगावला जाऊन रक्तदान करायला तयार झाले, मात्र हणमंत भोसले यांना कामावरून सुटी मिळणे मुश्किल होते. त्यामुळे त्यांनी कामाच्या ठिकाणी, आईच्या प्रकृतीचे कारण सांगून केवळ तीन तासांची सुटी काढली. त्यानंतर त्यांनी मिरजेतील एका रक्तपेढीत रक्तदान केले. ग्रुपच्या सदस्यांनी हे रक्त रेल्वेने बेळगावच्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचविले. अत्यंत कमी वेळात हे रक्त पोहोचल्यामुळे त्या रुग्णाचे प्राण वाचविणे डॉक्टरांना शक्य झाले.नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रूदोघांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे रुग्णालयाचे डॉक्टर, कर्मचारी व रुग्णाचे नातेवाईक भारावून गेले. नातेवाईकांच्या डोळ्यात त्यांच्या मदतीने अश्रू उभे राहिले. वंजिरे यांचा धोका आता टळला असल्याचे सांगत, येथील डॉ. रवी पाटील, ब्लड बँकेचे संचालक गिरीश बुडरकट्टी यांनी भोसले यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.काय आहे ‘बॉम्बे ब्लड’मुंबईमध्ये १९५२ मध्ये वाय. एम. भेंडे नावाच्या डॉक्टरनी या रक्तगटाचा शोध लावला होता. पूर्वी मुंबईला बॉम्बे म्हटले जायचे. म्हणून या शहराचेच नाव या रक्तगटाला देण्यात आले. हा सर्वात दुर्मिळ रक्तगट मानला जातो. याचे जगभरातील प्रमाण 0.000४ इतके आहे. या रक्तगटातील व्यक्तीचे रक्त अन्य लोकांना चालते, मात्र या लोकांना त्यांच्याच गटाचे रक्त लागते.