शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

रस्ता रुंदीकरणातील दीडशे झाडांना जीवदान

By admin | Updated: August 13, 2014 23:35 IST

हरित न्यायालयाचा आदेश : महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाला दणका

सांगली : सांगली-मिरज रस्त्याच्या रुंदीकरणातील १८६ पैकी १२४ झाडे तोडण्याचा घाट महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाने घातला होता. पण राष्ट्रीय हरित न्यायालयाने केवळ ३७ झाडे तोडण्यास परवानगी देऊन, या रस्त्यावरील बेसुमार वृक्षतोडीला दणका दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सुमारे ३५० कोटींची नैसर्गिक मालमत्ता नष्ट होण्यापासून वाचली आहे, अशी माहिती समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे, अजित ऊर्फ पापा पाटील, प्रा. आर. बी. शिंदे, रवींद्र चव्हाण यांनी आज (मंगळवारी) पत्रकार बैठकीत दिली. ते म्हणाले की, सांगली-मिरज मार्गावरील पुष्पराज चौक ते विश्रामबाग या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हिरव्यागर्द झाडांनी अच्छादलेल्या या रस्त्यावर १८६ लहान-मोठी झाडे आहेत. रुंदीकरणासाठी १२४ झाडे तोडण्यास महापालिकेच्या वृक्ष समितीने मान्यता दिली होती. या रस्त्यावरील वृक्षतोडीला जिल्हा सुधार समितीने सुरुवातीपासून विरोध केला होता. समितीने वृक्षतोडीशिवाय रुंदीकरण प्रस्तावही दिला होता. पण त्या प्रस्तावाकडे कानाडोळा करून महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग वृक्षतोडीवर ठाम होते. याविरोधात समितीच्यावतीने अ‍ॅड. रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रीय हरित न्यायालयात याचिका दाखल केली होती. हरित न्यायालयाच्या पुणे खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. आर. किनगावकर, डॉ. अजय देशपांडे यांच्यासमोर याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेत बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता, महापालिका आयुक्त, ठेकेदार सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर यांना प्रतिवादी करण्यात आले होते. सुनावणीवेळी बांधकाम विभागाने समितीची याचिका चुकीची असल्याचा बचाव केला होता. पण न्यायालयाने समितीने सुचविल्याप्रमाणे रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची सूचना दिली. त्यानंतर बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केली. अखेर त्यांनी रुंदीकरणासाठी ३७ झाडे तोडण्याचा प्रस्ताव न्यायालयात सादर केला. याव्यतिरिक्त एकही झाड तोडणार नाही, असे प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. न्यायालयानेही हा प्रस्ताव मान्य केला. त्यामुळे या रस्त्यावरील १४९ झाडांना जीवदान मिळाले आहे. झाडे तोडण्यापूर्वी त्यांची यादी निश्चित केली जाणार असून, एका झाडापोटी त्याच जातीची पाच नवीन झाडे लावण्याचे आदेशही न्यायालयाने बांधकाम विभागाला दिले आहेत. या निकालामुळे महापालिका आयुक्तांनी घाईगडबडीत दिलेली १२४ झाडे तोडण्याची परवानगी रद्दबातल ठरली असून, या लढ्याच्या विजयाचा आनंद वृक्षलागवड करून साजरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)