शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
2
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
3
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
4
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
5
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
6
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
7
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
8
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
9
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
10
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
11
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
12
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
13
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
14
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
15
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
16
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
17
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
18
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
19
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
20
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!

साहित्य अनुभवलेल्या सौंदर्याचे प्रतीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:54 IST

अंकलखोप : नवोदित कविंना कविता कशी करावी, याचे भान नाही. कविता ही कलाकृती आहे, याची जाणीव नाही. कारण सध्याचे ...

अंकलखोप : नवोदित कविंना कविता कशी करावी, याचे भान नाही. कविता ही कलाकृती आहे, याची जाणीव नाही. कारण सध्याचे कवी, लेखक यांचे वाचन कमी आहे. ते साहित्याच्या अनुभवापासून दूर आहेत. साहित्य हे जीवनाचे प्रतिबिंब नसते, तर ते अनुभवलेल्या सौंदर्याचे प्रतीक असते, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. प्रभा गणोरकर यांनी केले. औदुंबर येथे सदानंद साहित्य मंडळाच्या ७६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या.गणोरकर पुढे म्हणाल्या, ७६ वर्षांपूर्वी बा. सी. मर्ढेकर यांनी साहित्याला एक वेगळी कलाटणी दिली. वाङ्मयाला श्रेष्ठत्व निर्माण करून दिले. त्यांच्या साहित्यात नवीन विश्व आले. त्यांनी सगळे संकेत तोडून टाकणारी कविता निर्माण केली. दुर्लक्षित असणारा माणूस समोर आणला. मर्ढेकरांची उंची आजपर्यंत कोणत्याही साहित्यिकाला गाठता आली नाही. त्यांनी साहित्यावर संस्कार केला. त्यांच्या जीवन दर्शनाच्या भूमिकेचा पुढच्या ५० वर्षांच्या काळात प्रभाव पडला आहे. ६० च्या दशकात लिहिणारी पिढी ही अस्तित्ववादी होती. ती आताच्या ९० च्या दशकात दिसत नाही.त्या पुढे म्हणाल्या, सध्याच्या चंगळवादामुळे वाचन संस्कृती लयाला गेली आहे. प्रत्येक काळात नव्या चळवळी येत असतात; मात्र वाचन चळवळीची संस्कृती पुढे येत नाही.साहित्य संमेलनाच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त संमेलनात ‘सौरभ’ स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. श्रीनिवास कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी अध्यक्षांचा परिचय करून दिला. वासुदेव जोशी यांनी सूत्रसंचालन केले. पुरुषोत्तम जोशी यांनी आभार मानले.टीकात्मक विवेचन...गणोरकर म्हणाल्या, कुटुंब संस्था आता नाहीशी झाली आहे. त्याचबरोबर विवाह संस्था हा लग्नाचा बाजार झाला आहे. नव्या साहित्यामध्ये वाचकांच्या मनात भ्रम निर्माण होत आहे. वाङ्मयात निर्मितीकाराला लोकांची एक भूमिका असते. ती व्यक्त व्हायला हवी असते. परंतु ती नवीन साहित्यिकांकडे नाही. सध्याच्या काळातील कविता लोक वाचत नाहीत.