शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

आपली संस्कृती नसलेले साहित्य कुचकामीच

By admin | Updated: November 2, 2014 00:39 IST

नितीन सावंत : तुकोबाराय साहित्य परिषदेचा मेळावा उत्साहात

सांगली : विज्ञानाचा आधार नसलेल्या कल्पनाविलासात रमणाऱ्या साहित्याने देशाची माती केली. ज्या साहित्यात खेड्यापाड्यातली संस्कृती, आपल्या वेदना, वास्तव नाही, ते साहित्य कुचकामी आहे, असे मत जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेश महासचिव नितीन सावंत यांनी सांगलीतील मेळाव्यात व्यक्त केले. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्यावतीने साहित्यिकांचा व कार्यकर्त्यांचा मेळावा आज शनिवारी येथील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले की, आपली शिक्षणव्यवस्था पोपटपंची शिकविणारी आहे. शाळेत जे विज्ञान शिकवलं जातं, ते रुजवलं जात नाही. एका बाजूला भिंत निर्जिव असल्याचे सांगणारा अभ्यासक्रम दुसरीकडे ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे भिंत चालवत नेल्याचा पाठ शिकवितो. परस्परविरोधी शिक्षणपद्धतीने गोंधळ निर्माण केला आहे. देशातील विद्रोही व वास्तववादी साहित्यिक वगळता अन्य सर्व साहित्यिकांनी देशाची माती केली. अश्लील, अवास्तव साहित्याची निर्मिती त्यांनी केली. त्यामुळे सध्याच्या काळात वास्तववादी साहित्यनिर्मिती करण्याची गरज आहे. चित्रपटातील संस्कृतीही श्रीमंतांची आहे. बारा बलुतेदारांची, शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याची, घरातील स्त्रीची, बालविश्वाची वास्तवाचे बोट धरून चालणारी संस्कृती साहित्य आणि चित्रपटात यायला हवी. शंभरपैकी ७५ साहित्यिक व्यसनाधीन आहेत. दारू पिल्याशिवाय त्यांची प्रतिभा बाहेर पडत नाही. जात्यावर गाणाऱ्या माईची प्रतिभा कोणत्याही व्यसनाशिवाय बाहेर पडते. त्यामुळे अशा व्यसनाधीन साहित्यिकांचीही ही पोकळ कारणे आहेत. संभाजी महाराज, जिजाऊ यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी मांडून तथाकथित साहित्यिकांनी निर्लज्जपणाचा कळस केला. परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले. परिषदेचे विभागीय सचिव कपिल ढाके, राजेंद्र यादव, दत्तात्रय भोसले यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. शुभांगी पाटील, प्रा. विठ्ठल मोहिते, आर. एस. पवार, प्रा. दास मोरे, डॉ. मीनाक्षी साळुंखे, संतोष जाधव, अपर्णा खांडेकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)