शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी साहित्यिकांनी जनजागृती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : माणसाच्या अतिहव्यासामुळे निसर्गाचा, पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. साहित्यिकांनी सामाजिक बांधीलकी म्हणून निसर्गाविषयी भरभरून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिलवडी : माणसाच्या अतिहव्यासामुळे निसर्गाचा, पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. साहित्यिकांनी सामाजिक बांधीलकी म्हणून निसर्गाविषयी भरभरून लेखन करावे, समाजात पर्यावरणाविषयी जनजागृती करावी, असे प्रतिपादन कविसंमेलनाध्यक्ष सुभाष कवडे यांनी केले. ब्रह्मनाळ, ता.पलूस येथे आनंदमूर्ती संस्थान आणि आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांच्या वतीने आयोजित आभाळमाया निसर्ग काव्यसंमेलनात सुभाष कवडे बोलत होते.

कवी सुभाष कवडे यांनी महापूर सोसुनिया या कवितेतून आपण जे निसर्गाला दिले ते निसर्गाने महापुरातून परत दिल्याची भावना व्यक्त केली. ‘आत्महत्यांचा विचार पाखरांना नाही पटत’ या शब्दात दयासागर बन्ने यांनी निसर्गाच्या हायकू सादर केल्या. तर, नदी आणि माती दोघी सख्या मैत्रिणी या वर्षा चौगुले यांच्या कवितेतेने नदी आणि मातीच्या नात्याचे पदर उलगडले. यास्मिन शेख यांनी ‘निसर्ग माता’ कवितेतून भरभरून देणाऱ्या निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. मनीषा पाटील ‘पैस’ कवितेतून वेलींनी टाकली कात, केलीही बात, फुलांच्या संगे, ‘निसर्ग आणि कवी यांचं प्रेम’ या अभिजित पाटील यांनी आपल्या कवितेतून सौंदर्यसंपन्न निसर्गाचे वर्णन करणारी रचना सादर केली. ‘बघ सोनेरी सुरव्यानं, ओटी कृष्णेची भरली’ या कवितेतून संदीप नाझरे यांनी पशुपक्ष्यांनी गजबजलेल्या कृष्णाकाठच्या रम्य सायंकाळचे चित्रण डोळ्यासमोर उभे केले.

धनश्री खाडे यांनी, ‘मेघ बरसतो, निसर्ग बहरतो, थेंबाथेंबातून हिरवाई पसरवतो’ ही पावसानंतर निसर्गात होणारे बदल टिपणारी कविता सादर केली.नामदेव जाधव, वंदना हुलबत्ते या निमंत्रित कवींनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या.

यावेळी कवी बाबासाहेब पाटील ‘कोरोना’, रंजना गावडे, प्रज्ञा म्हेत्रे, शिखा मुल्ला, सुवर्णा चव्हाण यांच्यासह नवोदित कवयित्री सुप्रिया राजोबा यांनी निसर्ग कविता सादर केल्या.

यावेळी उद्योजक गिरीश चितळे, राजारामबापू बँकेचे संचालक श्यामराव पाटील, आनंदमूर्ती संस्थानचे विलास गोसावी, बाळासाहेब पाटील, डॉ. विकास गोसावी, सुरेंद्र वाळवेकर, अमोल पाटील, एम.एस. रजपूत, संदीप राजोबा, मुस्तफा मुजावर, माया गडदे उपस्थित होते.

फोटो - ब्रह्मनाळ येथे कविसंमेलनात मार्गदर्शन करताना सुभाष कवडे, शेजारी प्रमोद चौगुले, अभिजित पाटील, वर्षा चौगुले आदी.