शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी साहित्यिकांनी जनजागृती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : माणसाच्या अतिहव्यासामुळे निसर्गाचा, पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. साहित्यिकांनी सामाजिक बांधीलकी म्हणून निसर्गाविषयी भरभरून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिलवडी : माणसाच्या अतिहव्यासामुळे निसर्गाचा, पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. साहित्यिकांनी सामाजिक बांधीलकी म्हणून निसर्गाविषयी भरभरून लेखन करावे, समाजात पर्यावरणाविषयी जनजागृती करावी, असे प्रतिपादन कविसंमेलनाध्यक्ष सुभाष कवडे यांनी केले. ब्रह्मनाळ, ता.पलूस येथे आनंदमूर्ती संस्थान आणि आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांच्या वतीने आयोजित आभाळमाया निसर्ग काव्यसंमेलनात सुभाष कवडे बोलत होते.

कवी सुभाष कवडे यांनी महापूर सोसुनिया या कवितेतून आपण जे निसर्गाला दिले ते निसर्गाने महापुरातून परत दिल्याची भावना व्यक्त केली. ‘आत्महत्यांचा विचार पाखरांना नाही पटत’ या शब्दात दयासागर बन्ने यांनी निसर्गाच्या हायकू सादर केल्या. तर, नदी आणि माती दोघी सख्या मैत्रिणी या वर्षा चौगुले यांच्या कवितेतेने नदी आणि मातीच्या नात्याचे पदर उलगडले. यास्मिन शेख यांनी ‘निसर्ग माता’ कवितेतून भरभरून देणाऱ्या निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. मनीषा पाटील ‘पैस’ कवितेतून वेलींनी टाकली कात, केलीही बात, फुलांच्या संगे, ‘निसर्ग आणि कवी यांचं प्रेम’ या अभिजित पाटील यांनी आपल्या कवितेतून सौंदर्यसंपन्न निसर्गाचे वर्णन करणारी रचना सादर केली. ‘बघ सोनेरी सुरव्यानं, ओटी कृष्णेची भरली’ या कवितेतून संदीप नाझरे यांनी पशुपक्ष्यांनी गजबजलेल्या कृष्णाकाठच्या रम्य सायंकाळचे चित्रण डोळ्यासमोर उभे केले.

धनश्री खाडे यांनी, ‘मेघ बरसतो, निसर्ग बहरतो, थेंबाथेंबातून हिरवाई पसरवतो’ ही पावसानंतर निसर्गात होणारे बदल टिपणारी कविता सादर केली.नामदेव जाधव, वंदना हुलबत्ते या निमंत्रित कवींनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या.

यावेळी कवी बाबासाहेब पाटील ‘कोरोना’, रंजना गावडे, प्रज्ञा म्हेत्रे, शिखा मुल्ला, सुवर्णा चव्हाण यांच्यासह नवोदित कवयित्री सुप्रिया राजोबा यांनी निसर्ग कविता सादर केल्या.

यावेळी उद्योजक गिरीश चितळे, राजारामबापू बँकेचे संचालक श्यामराव पाटील, आनंदमूर्ती संस्थानचे विलास गोसावी, बाळासाहेब पाटील, डॉ. विकास गोसावी, सुरेंद्र वाळवेकर, अमोल पाटील, एम.एस. रजपूत, संदीप राजोबा, मुस्तफा मुजावर, माया गडदे उपस्थित होते.

फोटो - ब्रह्मनाळ येथे कविसंमेलनात मार्गदर्शन करताना सुभाष कवडे, शेजारी प्रमोद चौगुले, अभिजित पाटील, वर्षा चौगुले आदी.