शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
4
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
5
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
6
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
7
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
8
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
9
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
10
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
11
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
12
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
13
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
14
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
15
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
16
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
17
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
18
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
19
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
20
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली

जतला आता आठवड्यातून दोन दिवस पाणी

By admin | Updated: April 24, 2016 23:52 IST

नगरपालिकेचा निर्णय : बिरनाळ तलावाने गाठला तळ; २५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध

जयवंत आदाटे -- जत --जत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बिरनाळ (ता. जत) येथील साठवण तलावात फक्त वीस दशलक्ष घनफूट इतका अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे नगरपालिकेने पाणी पुरवठ्यात कपात केली आहे. आठवड्यातून तीन दिवस होणारा पाणी पुरवठा बंद करून फक्त दोन दिवस पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना यापुढील काळात तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.जत शहराची लोकसंख्या सुमारे ३८ हजार इतकी आहे. गौसिद्ध साठवण तलाव, यल्लम्मादेवी विहीर व बिरनाळ साठवण तलाव येथून शहराला पाणी पुरवठा केला जात होता. त्यापैकी जानेवारी महिन्यातच गौसिद्ध तलाव कोरडा ठणठणीत झाला आहे, तर एक एप्रिलपासून यल्लम्मादेवी विहिरीतील पाणी उद्भव बंद झाला आहे. त्यामुळे याचा ताण बिरनाळ पाणी पुरवठा यंत्रणेवर पडू लागला आहे. बिरनाळ जलशुद्धीकरण केंद्रातून पाईपलाईनद्वारे यल्लम्मा विहिरीत पाणी नेऊन शहराच्या दक्षिण भागातील नागरिकांना सध्या पाणी पुरवठा केला जात आहे.बिरनाळ तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. तलावातील मृतसंचय पाणी पातळी व गाळ याचा ताळमेळ घातला, तर फक्त पंचवीस-तीस दिवस पुरेल इतका पाणीसाठा तलावात शिल्लक आहे. सध्या बिरनाळ तलावातून बारा हजार लिटर क्षमतेच्या टॅँकरद्वारे तालुक्यातील देवनाळ, मेंढेगिरी, बसर्गी, उमराणी, सिंदूर, बिळूर, खोजनवाडी, अचकनहळ्ळी, उंटवाडी, रेवनाळ, रावळगुुंडवाडी, बनाळी, अमृतवाडी आदी चौदा गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे तलावातील पाण्याची पातळी वेगाने खाली जात आहे. कडक ऊन, अहोरात्र होणारा पाणी उपसा, बाष्पीभवन यामुळे येत्या पंधरा-वीस दिवसातच तलावातील पाणीसाठा संपुष्टात येईल, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.बिरनाळ तलावात म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या कालव्यामधून आलेले पाणी सोडण्यात येते. सध्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. पाटबंधारे विभागाने कुंभारी व शेगाव तलावात काही प्रमाणात पाणी सोडून तेथील पाणी पुरवठा बंद केला आहे. पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तलावात पाणी न सोडता शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या तलावात पाणी सोडल्यामुळे जत शहरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना, पाणी जवळ असूनही करावा लागत आहे. पाटबंधारे विभागाने बिरनाळ तलाव वगळून पुढे पाणी का सोडले आहे?. पिण्याच्या पाण्याचेही राजकारण केले जात आहे काय? याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगरपरिषद विरोधी गटनेते परशुराम मोरे यांनी केली आहे. पाटबंधारे विभागाने बिरनाळ तलावात तात्काळ पाणी सोडणे आवश्यक आहे. जर पाणी सोडले नाही, तर नागरिक स्वत: आक्रमक होऊन पाण्याचे टॅँकर अडवतील अथवा म्हैसाळ कालवा फोडून पाणी स्वत: घेतील, असा इशारा जत नगरपरिषद नगराध्यक्ष इकबाल गवंडी व उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे यांनी दिला आहे. पाटबंधारे विभागाचा चुकीचा निर्णय तिप्पेहळ्ळी तलावात सध्या पाणी सोडले जात आहे. कुंभारी व तिप्पेहळ्ळी तलावादरम्यान बिरनाळ साठवण तलाव आहे. पाटबंधारे विभागाने चुकीचा निर्णय घेऊन, बिरनाळऐवजी तिप्पेहळ्ळी तलावात पाणी सोडले आहे. तिप्पेहळ्ळी तलावातील पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही, फक्त शेतीसाठी वापरले जाते.