शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

जतला आता आठवड्यातून दोन दिवस पाणी

By admin | Updated: April 24, 2016 23:52 IST

नगरपालिकेचा निर्णय : बिरनाळ तलावाने गाठला तळ; २५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध

जयवंत आदाटे -- जत --जत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बिरनाळ (ता. जत) येथील साठवण तलावात फक्त वीस दशलक्ष घनफूट इतका अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे नगरपालिकेने पाणी पुरवठ्यात कपात केली आहे. आठवड्यातून तीन दिवस होणारा पाणी पुरवठा बंद करून फक्त दोन दिवस पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना यापुढील काळात तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.जत शहराची लोकसंख्या सुमारे ३८ हजार इतकी आहे. गौसिद्ध साठवण तलाव, यल्लम्मादेवी विहीर व बिरनाळ साठवण तलाव येथून शहराला पाणी पुरवठा केला जात होता. त्यापैकी जानेवारी महिन्यातच गौसिद्ध तलाव कोरडा ठणठणीत झाला आहे, तर एक एप्रिलपासून यल्लम्मादेवी विहिरीतील पाणी उद्भव बंद झाला आहे. त्यामुळे याचा ताण बिरनाळ पाणी पुरवठा यंत्रणेवर पडू लागला आहे. बिरनाळ जलशुद्धीकरण केंद्रातून पाईपलाईनद्वारे यल्लम्मा विहिरीत पाणी नेऊन शहराच्या दक्षिण भागातील नागरिकांना सध्या पाणी पुरवठा केला जात आहे.बिरनाळ तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. तलावातील मृतसंचय पाणी पातळी व गाळ याचा ताळमेळ घातला, तर फक्त पंचवीस-तीस दिवस पुरेल इतका पाणीसाठा तलावात शिल्लक आहे. सध्या बिरनाळ तलावातून बारा हजार लिटर क्षमतेच्या टॅँकरद्वारे तालुक्यातील देवनाळ, मेंढेगिरी, बसर्गी, उमराणी, सिंदूर, बिळूर, खोजनवाडी, अचकनहळ्ळी, उंटवाडी, रेवनाळ, रावळगुुंडवाडी, बनाळी, अमृतवाडी आदी चौदा गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे तलावातील पाण्याची पातळी वेगाने खाली जात आहे. कडक ऊन, अहोरात्र होणारा पाणी उपसा, बाष्पीभवन यामुळे येत्या पंधरा-वीस दिवसातच तलावातील पाणीसाठा संपुष्टात येईल, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.बिरनाळ तलावात म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या कालव्यामधून आलेले पाणी सोडण्यात येते. सध्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. पाटबंधारे विभागाने कुंभारी व शेगाव तलावात काही प्रमाणात पाणी सोडून तेथील पाणी पुरवठा बंद केला आहे. पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तलावात पाणी न सोडता शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या तलावात पाणी सोडल्यामुळे जत शहरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना, पाणी जवळ असूनही करावा लागत आहे. पाटबंधारे विभागाने बिरनाळ तलाव वगळून पुढे पाणी का सोडले आहे?. पिण्याच्या पाण्याचेही राजकारण केले जात आहे काय? याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगरपरिषद विरोधी गटनेते परशुराम मोरे यांनी केली आहे. पाटबंधारे विभागाने बिरनाळ तलावात तात्काळ पाणी सोडणे आवश्यक आहे. जर पाणी सोडले नाही, तर नागरिक स्वत: आक्रमक होऊन पाण्याचे टॅँकर अडवतील अथवा म्हैसाळ कालवा फोडून पाणी स्वत: घेतील, असा इशारा जत नगरपरिषद नगराध्यक्ष इकबाल गवंडी व उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे यांनी दिला आहे. पाटबंधारे विभागाचा चुकीचा निर्णय तिप्पेहळ्ळी तलावात सध्या पाणी सोडले जात आहे. कुंभारी व तिप्पेहळ्ळी तलावादरम्यान बिरनाळ साठवण तलाव आहे. पाटबंधारे विभागाने चुकीचा निर्णय घेऊन, बिरनाळऐवजी तिप्पेहळ्ळी तलावात पाणी सोडले आहे. तिप्पेहळ्ळी तलावातील पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही, फक्त शेतीसाठी वापरले जाते.