शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बळीराजाची फौज घेऊन दिल्लीवर चाल करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर रॅली काढली. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्वत: सारथ्य केले. फोटो २५ ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर रॅली काढली. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्वत: सारथ्य केले.

फोटो २५ ट्रॅक्टर रॅली २

छाया : सुरेंद्र दुपटे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : केंद्र सरकार कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करत आहे. तो यशस्वी होऊ देणार नाही. प्रसंगी बळीराजाची फौज दिल्लीवर चाल करेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर रॅलीच्या प्रारंभावेळी ते बोलत होते.

सांगलीत विश्रामबागमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सुरुवात झाली. जिल्हाभरातून ट्रॅक्टरसह आलेल्या शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. केंद्र सरकारविरोधी घोषणांमुळे विश्रामबाग चौक दणाणून गेला.

शेट्टी म्हणाले, केंद्राने राजकीय पक्षांना गुलाम केले आहे. शेतकरी व कामगारांवर अन्यायकारी कायदे केले जात आहेत. ते रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. सरकारने अन्यायी कृषी कायदे रद्द केले नाहीत, तर सळो की पळो करून सोडू. पत्र्या ठोकण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये.

ते म्हणाले, कृषी कायद्यांना विरोधासाठी मंगळवारी (ता. २६) दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर परेड करणार आहेत. आम्हालाही जायचे होते, पण रेल्वेचा मार्ग बंद केला आहे. दक्षिणेकडील शेतकऱ्यांना अडविण्यासाठी वाहने रोखली जात आहेत. त्यामुळे सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चा काढावा लागला. मूठभरच शेतकरी कायद्यांविरोधात असल्याचे सरकार भासवत आहे. विरोधी पक्षही सक्रिय नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनाच आक्रमक व्हावे लागेल. सरकारचे वर्तन गोऱ्या इंग्रजांप्रमाणे आहे. कवडीमोलाने शेतीमाल खरेदी करून चौपट दराने विकण्याचे कारस्थान आहे. कृषी कायद्यांतून आमचे अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

चौकट

वीजबिल माफ करण्याची मागणी

आंदोलकांनी प्रत्येक ट्रॅक्टरवर कृषी कायद्यांना विरोधाची पोस्टर्स लावली होती. वीजबिल माफ झालेच पाहिजे, अशाही घोषणा सुरू होत्या. सुमारे पन्नासहून अधिक ट्रॅक्टर्स रॅलीमध्ये सहभागी झाले होते, त्यामुळे प्रचंड उत्साह संचारला होता. पुष्पराज चौकापासून विश्रामबागेपर्यंत एका रांगेत ट्रॅक्टर्स दिसत होते. राजू शेट्टी स्वत: अग्रभागी ट्रॅक्टर चालवत होते. विश्रामबागेतून पुष्पराज चौक, राम मंदिर, सिटी पोस्ट, शिवाजी मंडई, बसस्थानकमार्गे ती शहराबाहेर कोल्हापूरच्या दिशेने गेली. त्यानंतर जयसिंगपूर, हातकणंगले आदी ठिकाणी शेतकरी सहभागी होत गेले.

------------

--------