शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली ते उमदीपर्यंत भाग हिरवागार करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त उर्वरित ६५ गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी देण्याचा विचार सुरू आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त उर्वरित ६५ गावांना म्हैसाळ

योजनेतून पाणी देण्याचा विचार सुरू आहे. त्यातून चांदोलीच्या पायथ्यापासून उमदीपर्यंत सांगली जिल्ह्याचा भाग हिरवागार करू, अशी ग्वाही पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी सांगलीत

दिली.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या

पहिल्या मजल्याच्या नूतनीकरणासह स्पोर्टस‌् क्लब व पोर्टलचे उद्घाटन जयंत पाटील यांच्याहस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आले. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील होते. यावेळी बँकेचे

संचालक सी. बी. पाटील, प्रा. शिकंदर जमादार, किरण लाड, बी. के. पाटील,

प्रताप पाटील, उदयसिंह देशमुख, गणपती सगरे, चंद्रकांत हाक्के, बाळासाहेब

होनमोरे, कमल पाटील, श्रध्दा चरापले यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी

जयवंत कडू-पाटील उपस्थित होते.

जयंत पाटील

म्हणाले, यंदा महापुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला देण्यात आम्ही यशस्वी झालो. वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित असणाऱ्या

गावांना त्याचा फायदा होत आहे. दुष्काळी भागातून बँकेची वसुली कमी होते, त्यामुळे तेथील क्षेत्र पाण्याखाली आल्यास बँकेची चांगली वसुली

होईल. म्हैसाळ योजनेतून जत

तालुक्याला पाणी देण्यात येत आहे. पाण्याची उपलब्धता झाल्यास उर्वरित ६५ गावांना पाणी देण्यात येईल. वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, गुलाबराव

पाटील यांचे संपूर्ण जिल्हा सुजलाम-सुफलाम करण्याचे स्वप्न या माध्यमातून पूर्ण होईल.

दिलीपतात्या पाटील म्हणाले, बँकेत काम सुरू

केल्यानंतर अनेक अडचणी आल्या, काहींनी अडचणी निर्माण केल्या. मात्र जयंतराव पाटील यांचा अदृश्य हात कायम पाठीशी आहे. काही संचालकांनी बँकेच्या बैठकांना न येण्याचा, सह्या न

करण्याचा फंडा वापरला होता, असे सांगत त्याचाही खास शैलीत समाचार घेतला. स्वागत व प्रास्ताविक जयवंत कडू-पाटील

यांनी केले.

चौकट....

नावाला बट्टा लावला नाही

जिल्हा

बँकेत काम करताना तुमच्या नावाला बट्टा लागेल, असे कोणतेही कृत्य केले नाही. याची खात्री करायची असेल, तर, तुम्ही

बँकेची गुप्त चौकशी करावी, अशी विनंती दिलीपतात्या पाटील

यांनी केली.

चौकट

बँक क्रमांक एकवर नेऊ

जिल्हा मध्यवर्ती बँकेने पाच वर्षांत उत्कृष्ट कामगिरी केली असून, राज्यातील पहिल्या क्रमांकाची बँक बनविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.