शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

काेरोना व महापुराच्या दुहेरी संकटाला सक्षमपणे समोरे जाऊया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:23 IST

भिलवडी : सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी भिलवडी व धनगाव परिसरातील पूरपरिस्थितीची पाहणी केली. विविध शाळांमध्ये ...

भिलवडी : सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी भिलवडी व धनगाव परिसरातील पूरपरिस्थितीची पाहणी केली. विविध शाळांमध्ये स्थलांतरित केलेल्या पूरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या, त्यांना धीर दिला. कोरोना आणि महापुराच्या दुहेरी संकटाला आपण सक्षमपणे सामोरे जाऊया. भिऊ नका मी सदैव तुमच्यासोबत आहे, अशा शब्दांत धीर दिला.

गेल्या दोन दिवसात कृष्णेला अचानक आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात लोकांनी स्थलांतर केले आहे. सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, भिलवडी, जिल्हा परिषद शाळा, माळवाडी आणि भारती विद्यापीठ, खंडोबाचीवाडी येथे भिलवडीतील तर बुरूंगवाडी येथील ब्रम्हानंद विद्यालयात धनगावमधील पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली आहे. कदम यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधून त्यांना धीर दिला. स्थानिक नेते व प्रशासनासोबत चर्चा करून किती लोक अडकलेत, जनावरांची काय व्यवस्था केली आहे, याची माहिती घेतली.

कोरोनाच्या लढाईपेक्षा पुराचे संकट नक्कीच वेदनादायी आहे. तरीही माझा कृष्णाकाठ या दुहेरी संकटाला सक्षमपणे तोंड देत आहे. मी सर्व परिस्थितीवर नजर ठेवून आहे. या संकटाचा आपण मिळून सामना करूया, असा आशावाद कदम यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाणे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, चंद्रकांत पाटील, धनगावचे सरपंच सतपाल साळुंखे, सुनील जाधव, दीपक भोसले, संदीप यादव, गौसमहंमद लांडगे, भिलवडीचे सहाय्यक निरीक्षक कैलास कोडग आदी उपस्थित होते.

फोटो : २३ भिलवडी १

ओळ : बुरूंगवाडी (ता. पलुस) येथे डॉ. विश्वजित कदम यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला.