शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

वीज बिल माफीसाठी मंत्र्यांच्या गाड्या अडवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:20 IST

सांगली : कोरोना, लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल सुरू असताना थकीत वीज बिलापोटी महावितरण कंपनीकडून कनेक्शन तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. ...

सांगली : कोरोना, लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल सुरू असताना थकीत वीज बिलापोटी महावितरण कंपनीकडून कनेक्शन तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. शासनाने वीज बिल माफीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा पालकमंत्री, कृषी राज्यमंत्र्यांच्या गाड्या अडवू, असा इशारा सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी बुधवारी दिला.

पवार म्हणाले की, कोरोनामुळे जिल्ह्याचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत आहे. व्यापारी, उद्योजकांपासून ते कामगार, नोकरदार, रोजंदारी, हमाल, तोलाईदारांनाही संघर्ष करावा लागत आहे. आर्थिक संकटात सरकारने मदतीचा हात देणे अपेक्षित होते. त्यातच वीज बिलांबाबत आघाडी सरकारने घोळ घातला आहे. आता महावितरणचे कर्मचारी वीज कनेक्शन तोडत आहेत. वीज बिलाबाबत व्यवहार्य तोडगा काढावा, अशी मागणी आहे. सर्वसामान्य घटक, हमाल, रिक्षावाले, रोजंदारीवरील लोक, दुकान व घरेलू कामगार अशांना पूर्ण वीज बिल माफी दिली पाहिजे. इतरांना लॉकडाऊन काळातील वीज बिलात किमान पन्नास टक्के सवलत आणि या काळातील थकीत बिल भरण्यासाठी किमान दोन वर्षांचे समान हप्ते पाडून दिले पाहिजेत. पण याबाबत कसलाच निर्णय घेतला जात नाही. पालकमंत्री जयंत पाटील व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी तत्काळ यावर तोडगा काढावा, अन्यथा त्यांच्या आगामी दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाड्या अडवू, असा इशाराही पवार यांनी दिला.

चौकट

सर्वपक्षीयांची लवकरच बैठक

पालकमंत्री जयंत पाटील यांनी राज्याचा दौरा थांबवून वाळवा तालुक्यात तळ ठोकण्याची गरज आहे. एका तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा लाॅकडाऊनची स्थिती आली. महापालिकेनेही विविध करांसाठी सक्तीची भूमिका घेतली आहे. त्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या आठवड्यात सर्वपक्षीय कृती समितीची बैठक घेणार असल्याचे पवार म्हणाले.