शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

वीज बिल माफीसाठी मंत्र्यांच्या गाड्या अडवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:20 IST

सांगली : कोरोना, लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल सुरू असताना थकीत वीज बिलापोटी महावितरण कंपनीकडून कनेक्शन तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. ...

सांगली : कोरोना, लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल सुरू असताना थकीत वीज बिलापोटी महावितरण कंपनीकडून कनेक्शन तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. शासनाने वीज बिल माफीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा पालकमंत्री, कृषी राज्यमंत्र्यांच्या गाड्या अडवू, असा इशारा सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी बुधवारी दिला.

पवार म्हणाले की, कोरोनामुळे जिल्ह्याचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत आहे. व्यापारी, उद्योजकांपासून ते कामगार, नोकरदार, रोजंदारी, हमाल, तोलाईदारांनाही संघर्ष करावा लागत आहे. आर्थिक संकटात सरकारने मदतीचा हात देणे अपेक्षित होते. त्यातच वीज बिलांबाबत आघाडी सरकारने घोळ घातला आहे. आता महावितरणचे कर्मचारी वीज कनेक्शन तोडत आहेत. वीज बिलाबाबत व्यवहार्य तोडगा काढावा, अशी मागणी आहे. सर्वसामान्य घटक, हमाल, रिक्षावाले, रोजंदारीवरील लोक, दुकान व घरेलू कामगार अशांना पूर्ण वीज बिल माफी दिली पाहिजे. इतरांना लॉकडाऊन काळातील वीज बिलात किमान पन्नास टक्के सवलत आणि या काळातील थकीत बिल भरण्यासाठी किमान दोन वर्षांचे समान हप्ते पाडून दिले पाहिजेत. पण याबाबत कसलाच निर्णय घेतला जात नाही. पालकमंत्री जयंत पाटील व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी तत्काळ यावर तोडगा काढावा, अन्यथा त्यांच्या आगामी दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाड्या अडवू, असा इशाराही पवार यांनी दिला.

चौकट

सर्वपक्षीयांची लवकरच बैठक

पालकमंत्री जयंत पाटील यांनी राज्याचा दौरा थांबवून वाळवा तालुक्यात तळ ठोकण्याची गरज आहे. एका तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा लाॅकडाऊनची स्थिती आली. महापालिकेनेही विविध करांसाठी सक्तीची भूमिका घेतली आहे. त्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या आठवड्यात सर्वपक्षीय कृती समितीची बैठक घेणार असल्याचे पवार म्हणाले.