शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सहकारमंत्र्यांना ‘सळो की पळो’ करू : शेट्टी

By admin | Updated: April 19, 2016 00:58 IST

शेतकरी मेळावा : एफआरपीसाठी १ मेनंतर ‘आर या पार’ची लढाई

सांगली : एफआरपीची उर्वरित २० टक्के रक्कम देण्याबरोबरच जादा दराची रक्कमही शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. येत्या ३० एप्रिलपर्यंत यावर निर्णय झाला नाही, तर कायदा हातात घेतला जाईल. याप्रश्नी सहकारमंत्र्यांना सळो की पळो करून सोडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथील शेतकरी मेळाव्यात दिला. येथील विष्णुअण्णा फळ मार्केट परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा पार पडला. यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांना एफआरपीची उर्वरित रक्कम तातडीने मिळाली पाहिजे. त्याशिवाय साखरेला जादा भाव मिळाल्याने त्याचाही मोबदला शेतकऱ्यांच्या पदरात पडला पाहिजे. साखर कारखानदार याप्रश्नी टाळाटाळ करीत आहेत. ३० एप्रिलपर्यंत पैसे मिळाले पाहिजेत. कारखानदार जर दाद देत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करा. कारखानदारांना शेतकऱ्यांचे पैसे देणे जमत नसेल, तर त्यांच्या वाट्याची साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना द्यावी. आम्ही ती बाजारात विकून आमचे पैसे काढून घेऊ. सहकार विभागाने नियमानुसार कारवाई न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनाच कायदा हातात घेईल. शेतकऱ्यांच्या उर्वरित बिलातून निर्यातीसाठी दिलेल्या नुकसानभरपाईची रक्कम कपात करण्याचा डाव काही साखर कारखानदारांनी आखला आहे. त्यांना याचा कोणताही अधिकार नाही. असे कृत्य कोणी केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी लढा देऊ. पुढील हंगामावेळी साखरेचे भाव अधिक असले, तर एफआरपी न मागता आम्ही पहिली उचल मागू. साखरेचे दर कमी असतील त्याचवेळी एफआरपीची केली जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही संघटना जन्माला आल्याने संघर्षावेळी सरकार कोणाचे आहे, हे आम्ही पाहणार नाही. येत्या १ मेपासून कारखानदार व शासनाच्याविरोधात निर्णायक लढाई सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. सहकारी बॅँकांमधील घोटाळा प्रकरणात अडकलेल्या नेत्यांबद्दल ते म्हणाले की, सहकार कायद्यातील नियमानुसार पाच वर्षांपूर्वीचा घोटाळा माफ केला जात असेल, तर पाच वर्षापूर्वी चोरी करणाऱ्या संशयितांनाही सोडून देण्याचा निर्णय सरकारने घ्यावा. अशाप्रकारच्या कायद्यातील पळवाटा बंद करून घोटाळेबहादरांवर कारवाईचे धाडस सहकारमंत्र्यांनी दाखवावे. मेळाव्यास संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, प्रवक्ते महेश खराडे, बाजार समितीचे सभापती संतोष पाटील, संभाजी मेंढे, प्रकाश वलवडकर, सागर खोत, भगवान काटे, संदीप राजोबा आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)एकही लाल दिवा सुरक्षित राहणार नाही!राज्य शासन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सदाभाऊ मध्यस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी सहकारमंत्र्यांना समजावून सांगावे. येत्या ३० एप्रिलपर्यंत शासनाने उर्वरित रकमेच्या प्रश्नात लक्ष घातले नाही, तर सांगली, कोल्हापुरात एकही लाल दिवा सुरक्षित राहणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.मुश्रीफ यांच्या कॉल रेकॉर्डची तपासणी करागेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले मुश्रीफ-शेट्टी वाक्युद्ध मेळाव्याच्या निमित्ताने कायम राहिले. वारंवार माझ्या तपासणीची मागणी करणाऱ्या आ. हसन मुश्रीफ यांच्या कॉल रेकॉर्डची तपासणी व्हावी, माझेही कॉल तपासावेत. तपासणीत परदेशात कोणाचा संवाद होतो, कोणाचे काळे-बेरे आहे, आरोपी कोण आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे समोर येतील, असे शेट्टी म्हणाले. कारवाई करा, रेडे बोलतील...पुराणात रेड्याने वेद म्हटल्याची कथा आहे. या कथेप्रमाणे रेडे बोलावेत असे वाटत असेल, तर सहकारमंत्र्यांनी त्यांचे कारवाईचे कर्तव्य पार पाडावे. साखर उत्पादित होण्यापूर्वी तिची विक्री कशी झाली?, कवडीमोल दराने कारखाने कसे विकले गेले?, या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना व राज्यातील जनतेला मिळतील, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली. गोपनीय संदेश मिळेल !आंदोलनाबाबत येत्या २७ किंवा २८ एप्रिल रोजी शेतकऱ्यांना गोपनीयरित्या संदेश दिला जाईल. त्यानंतर संदेशाप्रमाणे आंदोलनासाठी त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले. मंत्रीही दरोडेखोरांना सामील?आम्ही राज्यातील सहकारी साखर कारखानदारीतील काळ्या पैशाच्या गुंतवणुकीबद्दल ओरड करत असतानाही, विद्यमान सरकार काहीही करीत नाही. त्यामुळे पांढऱ्या कपड्यातील या दरोडेखोरांना सध्याचे मंत्रीही सामील झाले आहेत की काय?, अशी शंका येत आहे. सांगलीच्या बाजार समितीमधील एका भ्रष्ट कर्मचाऱ्याला ४२ लाखांच्या अपहारप्रकरणी बडतर्फ करण्यात आल्यानंतर, सहकारमंत्री त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी शिफारस करीत आहेत. या गोष्टीवरून जनतेने काय समजायचे?, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.