शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भाजपांतर्गत वादावर नेत्यांची सावध भूमिका विधानसभेची तयारी : उमेदवारी निश्चितीनंतर बदलणार मतदारसंघातील समीकरणे

By admin | Updated: May 10, 2014 23:54 IST

सांगली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सांगलीत भाजपांतर्गत संघर्ष पेटला असताना, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे.

 सांगली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सांगलीत भाजपांतर्गत संघर्ष पेटला असताना, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या दोन्ही गटांना गोपीनाथ मुंडे यांनी ‘सलाईन’वर ठेवल्याने स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये संभ्रमावस्था वाढली आहे. भाजपमधील उमेदवारी कोणाला मिळणार, यावर या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. भाजपांतर्गत हालचालींवर पक्षाच्या स्थानिक नेत्यांबरोबरच कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. लोकसभेचा निकाल काय लागणार, यावर भाजपमधील उमेदवारीचे गणित ठरणार असल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका स्वीकारणे पसंत केले आहे. सांगलीतील भाजपमध्ये आता दोन गट पडले आहेत. आ. संभाजी पवारांनी मुंडेंची भेट घेतल्यानंतर चारच दिवसांनी नीता केळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंडेंची भेट घेऊन उमेदवारीविषयीची विचारणा केली. लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला गेल्यापासून हे दोन गट अस्तित्वात आले होते. पवार गटावरील नेत्यांची नाराजी अनेकांच्या फायद्याची ठरणार होती. त्यामुळे पवारांविरोधातील गट लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या मागे पूर्ण ताकदीने उभा होता. उमेदवाराविरुद्ध पवारांचा एकाकी लढा शेवटपर्यंत राहिला. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सांगली विधानसभा क्षेत्रात सर्वपक्षीय नेत्यांकडून आश्चर्यकारक चाली खेळल्या जातील. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आणि आ. संभाजी पवार यांच्या गटातील वितुष्ट दिवसेंदिवस वाढत आहे. जयंत पाटील व मदन पाटील यांच्यातही फारसे सख्य नाही, तरीही पवारांच्या घरात उमेदवारी मिळाली तर कदाचित आघाडी धर्माच्या नावाखाली पवार गटाला शह देण्यासाठी जयंत पाटील यांचा गट मदन पाटील यांच्या बाजूने ताकद लावू शकतो. राष्टÑवादीतील दिनकर पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. संजय पाटील यांच्याप्रमाणे जर त्यांना पक्षप्रवेशावेळी भाजपकडून विधानसभेच्या उमेदवारीची लॉटरी लागली तर राष्टÑवादीचा एक मोठा गट त्यांना बळ देऊ शकेल. भाजपमध्ये जर निष्ठावंतांपैकी कोणाला उमेदवारी मिळाली, तर सर्वच समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. येथील पटावर लोकसभेच्या देशभरातील निकालाचाही परिणाम निश्चितपणे जाणवेल. अशा अनेक गोष्टींमुळे सांगली विधानसभा मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)