शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

‘सर्वोदय’च्या मैदानात दिग्गज मल्ल उतरणार

By admin | Updated: October 4, 2016 01:02 IST

सभांना श्रीगणेशा : प्रचारात गाजणार कारखान्याच्या मालकीचा मुद्दा; निवडणुकीचे धुराडे पेटले

अविनाश कोळी -- सांगली -सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे धुराडे पेटले असून, यंदाची निवडणूक ही अनेक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. आ. जयंत पाटील आणि माजी आ. संभाजी पवारांची कारखान्याच्या ताब्यावरून रंगलेली कुस्ती निवडणुकीत निकाली ठरणार आहे. त्यामुळे दिग्गज नेत्यांची फौज दोन्ही बाजूंनी रणांगणात उतरणार आहे. सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. आॅक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम राहणार आहे. सर्वोदय सहकारी साखर कारखाना सध्या जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालत आहे. राजारामबापू कारखान्याच्या व्यवस्थापनामार्फत कारखान्याचे निर्णय घेतले जातात. राजारामबापू कारखान्याचे युनिट म्हणून हा कारखाना सुरू आहे. स्थापनेपासून हा कारखाना संभाजी पवार गटाच्या ताब्यात होता. २००८ मध्ये आर्थिक अडचणीत आलेल्या या कारखान्याला राजारामबापूने आर्थिक मदत देऊन तीन वर्षाचा करार केला होता. करार संपल्यानंतर राजारामबापू कारखाना आणि पवार गटात कारखान्याच्या ताब्यावरून तसेच देय असलेल्या रकमेवरून वाद रंगला. जयंत पाटील आणि संभाजी पवारांच्या मैत्रीपूर्ण नात्याला या वादाने सुरूंग लागला. संभाजी पवारांनी जयंत पाटील यांच्यावर विश्वासघाताचा आरोप करून तोफ डागली. जयंत पाटील यांच्या गटानेही पवार गटावर शाब्दिक हल्ला केला. राज्यभर वादाचे रंग उधळले गेले. हा वाद इतका टोकाला गेला की, संपूर्ण राज्यात सर्वोदय कारखान्याचे नाव चर्चेत आले. न्यायालयीन लढाया सुरू झाल्या. आजतागायत या साखर कारखान्याच्या मालकीचा वाद शांत झालेला नाही. त्यामुळेच सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकमेकांना चितपट करण्यासाठी हे दोन्ही नेते सरसावले आहेत. जयंत पाटील यांच्यातर्फे त्यांच्याकडील पहिल्या फळीतील नेत्यांची फौज उतरणार आहे, तर पवार गटाकडूनही जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष शरद पाटील, खासदार राजू शेट्टी, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत आदी नेते मैदानात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे अनेक नेत्यांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली जाणार आहे. बैठकांना सुरुवात पवार गटाने यापूर्वीच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कारखाना कार्यक्षेत्रातील गावांत सभासदांच्या बैठका सुरू आहेत. दुधगाव, माळवाडी, सावळवाडीनंतर सोमवारी कसबे डिग्रज येथे या गटाने बैठक घेतली. अद्याप प्रचार बैठकांचे कोणतेही नियोजन ठरलेले नसले तरी, मतदार याद्या अंतिम झाल्यानंतर सर्व गावांमध्ये बैठका घेण्यात येणार असल्याचे या गटाकडून सांगण्यात आले.जयंत पाटील गटही तयारीत जयंत पाटील यांच्या गटानेही कारखाना निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. वाळवा तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांचेही वर्चस्व असल्याने हा सामना चुरशीचा ठरण्याची चिन्हे आहेत. पवार गटाच्या सुरू असलेल्या हालचालींवर जयंत पाटील यांच्या गटाने नजर ठेवली आहे. लवाद, न्यायालयाने निर्णय देऊन राजारामबापू कारखाना सभासदांच्या ताब्यात सर्वोदय कारखाना देण्यास तयार नाही. हा मुद्दा आम्ही सभासदांसमोर मांडत आहोत. ही निवडणूक जयंत पाटील विरुद्ध सभासद अशीच राहील. शेतकरी सभासदांना या गोष्टीची कल्पना असल्याने तेच आता योग्य निवाडा करणार आहेत. - पृथ्वीराज पवार, अध्यक्ष, सर्वोदय सहकारी साखर कारखाना.