शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

डावा कालव्याचे काम बंद!

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

कालव्याची दुरवस्था : उर्जितावस्था कधी येणार?

सहदेव खोत - पुनवतमागील दोन वर्षापासून बंद पडलेली कामे, जागोजागी उखडलेले काँक्रिटीकरण, आत आणि बाहेर झुडपांचे वाढलेले साम्राज्य यामुळे शिराळा तालुक्यात वारणा डावा कालव्याची दुरवस्था झाली आहे. केंद्रात आणि राज्यात नव्यानेच सत्तारुढ झालेल्या भाजप सरकारच्या काळात तरी या कालव्याला उर्जितावस्था येणार का? असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे.दोन-तीन वर्षापूर्वी डाव्या कालव्याची कामे जागोजागी जोमाने सुरू होती. अनेक ठिकाणी कालव्याची साफसफाई करून साईड काँक्रिटची कामे करण्यात आली. ही कामे विशेषत: १0 कि.मी.पासून पुढे करण्यात आली. रिळे जलसेतूपर्यंत पाण्याची चाचणीही घेण्यात आली होती.कामाचा ठेका घेणाऱ्या कंपनीने कधीकाळी कामे केल्यानंतर आता आपला गाशा गुंडाळला आहे. साधारणत: रिळे जलसेतूपासून ते अगदी मांगले देववाडीपर्यंत ही कामे अर्ध्यावरच राहिली आहेत. कित्येक ठिकाणी केलेले अस्तरीकरण निकृष्ट कामामुळे उखडून गेले आहे. शिल्लक राहिलेल्या अस्तरीकरणाला भेगा पडल्या आहेत. त्यामधून झाडे—झुडपे उगवली आहेत. अस्तरीकरण नीट न झाल्यामुळे कालव्यात पावसाळ्यात साठलेले पाणी झिरपून निघून गेले आहे. कालव्याच्या दुतर्फा तसेच आत मोठमोठी झाडे उगवल्यामुळे कालव्याचा धोका वाढला आहे. शिवाय 0 ते २0 कि.मी.पर्यंतच्या पट्ट्यात गळतीची समस्या मोठी आहे. सततच्या पाणी गळतीमुळे शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी नापीक बनल्या आहेत.तालुक्यात विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक या नेत्यांनी वाकुर्डे बुद्रुक योजना व डावा कालवा पूर्णत्वास नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सध्या निधीअभावी या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजना रखडल्या आहे. कॉँग्रेस शासनाच्या काळात या योजनांसाठी निधी आला व कामेही झाली. आता कामात राहिलेल्या उणिवा दूर करून उर्वरित कामे मार्गी लावण्याची गरज आहे.कालव्याचे काँक्रिट तुटलेल्या ठिकाणी कोटिंग कागदाची चोरीही झाली आहे. कामे बंद असल्यामुळे खोलीच्या ठिकाणी असलेल्या संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दरवर्षी कालव्यात पडून कित्येक जनावरांचा मृत्यू होत आहे. काही ठिकाणी बसविलेले लोखंडी पूल कालबाह्य झाले आहेत. सततच्या पाणी गळतीमुळे शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी नापीक बनल्या आहेत.