शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

डावा कालव्याचे काम बंद!

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

कालव्याची दुरवस्था : उर्जितावस्था कधी येणार?

सहदेव खोत - पुनवतमागील दोन वर्षापासून बंद पडलेली कामे, जागोजागी उखडलेले काँक्रिटीकरण, आत आणि बाहेर झुडपांचे वाढलेले साम्राज्य यामुळे शिराळा तालुक्यात वारणा डावा कालव्याची दुरवस्था झाली आहे. केंद्रात आणि राज्यात नव्यानेच सत्तारुढ झालेल्या भाजप सरकारच्या काळात तरी या कालव्याला उर्जितावस्था येणार का? असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे.दोन-तीन वर्षापूर्वी डाव्या कालव्याची कामे जागोजागी जोमाने सुरू होती. अनेक ठिकाणी कालव्याची साफसफाई करून साईड काँक्रिटची कामे करण्यात आली. ही कामे विशेषत: १0 कि.मी.पासून पुढे करण्यात आली. रिळे जलसेतूपर्यंत पाण्याची चाचणीही घेण्यात आली होती.कामाचा ठेका घेणाऱ्या कंपनीने कधीकाळी कामे केल्यानंतर आता आपला गाशा गुंडाळला आहे. साधारणत: रिळे जलसेतूपासून ते अगदी मांगले देववाडीपर्यंत ही कामे अर्ध्यावरच राहिली आहेत. कित्येक ठिकाणी केलेले अस्तरीकरण निकृष्ट कामामुळे उखडून गेले आहे. शिल्लक राहिलेल्या अस्तरीकरणाला भेगा पडल्या आहेत. त्यामधून झाडे—झुडपे उगवली आहेत. अस्तरीकरण नीट न झाल्यामुळे कालव्यात पावसाळ्यात साठलेले पाणी झिरपून निघून गेले आहे. कालव्याच्या दुतर्फा तसेच आत मोठमोठी झाडे उगवल्यामुळे कालव्याचा धोका वाढला आहे. शिवाय 0 ते २0 कि.मी.पर्यंतच्या पट्ट्यात गळतीची समस्या मोठी आहे. सततच्या पाणी गळतीमुळे शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी नापीक बनल्या आहेत.तालुक्यात विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक या नेत्यांनी वाकुर्डे बुद्रुक योजना व डावा कालवा पूर्णत्वास नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सध्या निधीअभावी या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजना रखडल्या आहे. कॉँग्रेस शासनाच्या काळात या योजनांसाठी निधी आला व कामेही झाली. आता कामात राहिलेल्या उणिवा दूर करून उर्वरित कामे मार्गी लावण्याची गरज आहे.कालव्याचे काँक्रिट तुटलेल्या ठिकाणी कोटिंग कागदाची चोरीही झाली आहे. कामे बंद असल्यामुळे खोलीच्या ठिकाणी असलेल्या संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दरवर्षी कालव्यात पडून कित्येक जनावरांचा मृत्यू होत आहे. काही ठिकाणी बसविलेले लोखंडी पूल कालबाह्य झाले आहेत. सततच्या पाणी गळतीमुळे शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी नापीक बनल्या आहेत.