शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

चहा सोडून बोला !

By admin | Updated: June 2, 2017 23:20 IST

चहा सोडून बोला !

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा दुसऱ्या दिवशीही साताऱ्यात परिणाम दिसून आला. संपाच्या भितीने हॉटेल मालकांनी दुधाचा साठा करून ठेवला होता. मात्र हा स्टॉकही संपल्याने ‘चहा सोडून बोला’ असे ऐकायला मिळत होते. संपापूर्वी हॉटेल मालकांनी दूध आणि इतर भाजीपाल्यांचा स्टॉक करून ठेवला होता. दोन दिवसांत संप मिटेल, अशी अशा बाळगून अनेकांनी मर्यादित साठा केला होता. दुसऱ्या दिवशीही संप सुरूच राहिल्याने हॉटेलमालक चिंतेत आहेत. दूध आणि भाजीपाला रोजच्या रोज आणावा लागतो. मात्र भाजीपाल्याची आवक ठप्प झाल्याने नास्टाही बंद होण्याच्या मार्गावर आहे. दुधाचे टँकर पोलिस बंदोबस्तात येत असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात असले तरी अनेक हॉटेलमध्ये दुधाच्या पिशव्या शुक्रवारी पोहोचल्या नाहीत. संप आणखी दोन दिवस सुरू राहिला तर हॉटेलला टाळे लागण्याची शक्यता आहे.शेतकरी संपामुळे मार्केटयार्ड परिसरातील चित्र शुक्रवारी वेगळेच दिसले. ऐरवी सकाळी सहा वाजता या परिसरात शेतकऱ्यांची लगबग सुरू असायची. मात्र शुक्रवारी एकही शेतकरी भाजी घेऊन आला नसल्याचे जाणवले. मार्केटयार्डला शुक्रवारी सुटी असते. यामुळे संपाचा आणखीनच परिणाम जाणवला. मात्र जो माल खराब होण्याची शक्यता आहे. असा माल शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काही दलालांनी खरेदी केल्याचे सांगण्यात येत आहे. मेथीची पेंडी दहा रुपयांना मिळत होती. ती आता काही ठिकाणी वीस रुपयांना विकली जात आहे. बहुतांश ठिकाणी मेथीची पेंडी संपल्याचे दिसून येत आहे. राजवाडा भाजी मंडईतही हीच स्थिती होती. काहींनी भाजी विक्री बंद करून फिरायला जाणे पसंत केले आहे. तुमचा संप.. आमची विश्रांती !सातारा मार्केटयार्डमध्ये नेहमी खांद्यावर बटाटे आणि कांद्यांची पोती घेऊन जाणारे हमाल शुक्रवारी वेगळ्याच विश्वात होते. शेतकऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे या हमालांना विश्रांतीसाठी भरपूर वेळ मिळाला. शुक्रवारी मार्केटयार्डला सुटी असली तरी हमालांकडून छोटी-मोठी कामे केली जातात. त्यामुळे काही हमाल सुटीच्या दिवशीही या ठिकाणी येत असतात. रोज कमाई झाली तरच एकवेळचे जेवण मिळणार, अशी परिस्थिती असलेल्या हमालांना हा संप लवकर मिठावा, असे वाटत आहे. इकडे तिकडे फिरण्यापेक्षा विश्रांती केलेली बरी, असे म्हणून अनेकांनी शुक्रवारचा दिवस विश्रांतीमध्ये घालविला.रिक्षा चालकाची बारा वाजता झाली भवानी!पहाटे सहा वाजता रिक्षाचालक मार्केटयार्डमध्ये रोज येत असतात. सकाळी तरकारीचे भाडे त्यांना मिळत असते. मात्र शेतकऱ्यांच्या संपामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत रिक्षा चालकाला भाडे मिळाले नव्हते. त्यानंतर त्याला एक भाजीविक्रेते गिऱ्हाईक आले. हा संप असाच सुरू राहिला तर आम्हाला रिक्षा या ठिकाणी उभ्या करणे परवडणार नाही. असे रिक्षाचालक समीर पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.