शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

चहा सोडून बोला !

By admin | Updated: June 2, 2017 23:20 IST

चहा सोडून बोला !

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा दुसऱ्या दिवशीही साताऱ्यात परिणाम दिसून आला. संपाच्या भितीने हॉटेल मालकांनी दुधाचा साठा करून ठेवला होता. मात्र हा स्टॉकही संपल्याने ‘चहा सोडून बोला’ असे ऐकायला मिळत होते. संपापूर्वी हॉटेल मालकांनी दूध आणि इतर भाजीपाल्यांचा स्टॉक करून ठेवला होता. दोन दिवसांत संप मिटेल, अशी अशा बाळगून अनेकांनी मर्यादित साठा केला होता. दुसऱ्या दिवशीही संप सुरूच राहिल्याने हॉटेलमालक चिंतेत आहेत. दूध आणि भाजीपाला रोजच्या रोज आणावा लागतो. मात्र भाजीपाल्याची आवक ठप्प झाल्याने नास्टाही बंद होण्याच्या मार्गावर आहे. दुधाचे टँकर पोलिस बंदोबस्तात येत असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात असले तरी अनेक हॉटेलमध्ये दुधाच्या पिशव्या शुक्रवारी पोहोचल्या नाहीत. संप आणखी दोन दिवस सुरू राहिला तर हॉटेलला टाळे लागण्याची शक्यता आहे.शेतकरी संपामुळे मार्केटयार्ड परिसरातील चित्र शुक्रवारी वेगळेच दिसले. ऐरवी सकाळी सहा वाजता या परिसरात शेतकऱ्यांची लगबग सुरू असायची. मात्र शुक्रवारी एकही शेतकरी भाजी घेऊन आला नसल्याचे जाणवले. मार्केटयार्डला शुक्रवारी सुटी असते. यामुळे संपाचा आणखीनच परिणाम जाणवला. मात्र जो माल खराब होण्याची शक्यता आहे. असा माल शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काही दलालांनी खरेदी केल्याचे सांगण्यात येत आहे. मेथीची पेंडी दहा रुपयांना मिळत होती. ती आता काही ठिकाणी वीस रुपयांना विकली जात आहे. बहुतांश ठिकाणी मेथीची पेंडी संपल्याचे दिसून येत आहे. राजवाडा भाजी मंडईतही हीच स्थिती होती. काहींनी भाजी विक्री बंद करून फिरायला जाणे पसंत केले आहे. तुमचा संप.. आमची विश्रांती !सातारा मार्केटयार्डमध्ये नेहमी खांद्यावर बटाटे आणि कांद्यांची पोती घेऊन जाणारे हमाल शुक्रवारी वेगळ्याच विश्वात होते. शेतकऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे या हमालांना विश्रांतीसाठी भरपूर वेळ मिळाला. शुक्रवारी मार्केटयार्डला सुटी असली तरी हमालांकडून छोटी-मोठी कामे केली जातात. त्यामुळे काही हमाल सुटीच्या दिवशीही या ठिकाणी येत असतात. रोज कमाई झाली तरच एकवेळचे जेवण मिळणार, अशी परिस्थिती असलेल्या हमालांना हा संप लवकर मिठावा, असे वाटत आहे. इकडे तिकडे फिरण्यापेक्षा विश्रांती केलेली बरी, असे म्हणून अनेकांनी शुक्रवारचा दिवस विश्रांतीमध्ये घालविला.रिक्षा चालकाची बारा वाजता झाली भवानी!पहाटे सहा वाजता रिक्षाचालक मार्केटयार्डमध्ये रोज येत असतात. सकाळी तरकारीचे भाडे त्यांना मिळत असते. मात्र शेतकऱ्यांच्या संपामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत रिक्षा चालकाला भाडे मिळाले नव्हते. त्यानंतर त्याला एक भाजीविक्रेते गिऱ्हाईक आले. हा संप असाच सुरू राहिला तर आम्हाला रिक्षा या ठिकाणी उभ्या करणे परवडणार नाही. असे रिक्षाचालक समीर पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.