शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

ग्रामीण विकासाच्या भंपक कल्पना आता बाजूला ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:30 IST

सांगली : ग्रामीण विकास ही संकल्पना जगात कोठेही अस्तित्वात नाही. पण भारतात मात्र त्यावर अधिक भर दिला जातो. देशाचा विकास शहरांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे शहरांचा दुस्वास करू नका, असा सल्ला देत, रस्ते, गटारी, आरोग्य केंद्र या ग्रामविकासाच्या भंपक कल्पना बाजूला ठेवून रोजगार निर्मितीवर भर द्या, असे आवाहन प्रमुख वक्ते ...

सांगली : ग्रामीण विकास ही संकल्पना जगात कोठेही अस्तित्वात नाही. पण भारतात मात्र त्यावर अधिक भर दिला जातो. देशाचा विकास शहरांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे शहरांचा दुस्वास करू नका, असा सल्ला देत, रस्ते, गटारी, आरोग्य केंद्र या ग्रामविकासाच्या भंपक कल्पना बाजूला ठेवून रोजगार निर्मितीवर भर द्या, असे आवाहन प्रमुख वक्ते निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील यांनी केले.‘लोकमत’च्या सरपंच अवॉर्डस्चे कौतुक करीत नानासाहेब पाटील म्हणाले की, चीनने प्रगतीला सुरूवात केली, तेव्हा त्या देशात बेरोजगारीचा प्रश्न बिकट होता. तेथील राज्यकर्त्यांनी शेतीसोबतच रोजगार निर्मितीवर भर दिला. प्रत्येक गावात एक उद्योग उभा केला. सकाळी शेती आणि दुपारी उद्योगधंद्यात काम, असे वातावरण तयार केले. दोन ते तीन वर्षात पावणेदोन कोटी उद्योग उभे केले. समुद्राजवळील गावात आयात-निर्यात केंद्रे उभारली. परदेशी गुंतवणूक वाढली. आज जगातील ४५ टक्के वस्तूंची निर्मिती चीनमध्ये होते. याउलट भारतात बेरोजगारीचे संकट कायम आहे. भविष्यात तरूणांच्या प्रक्षोभाला राज्यकर्त्यांना सामोरे जावे लागेल.गावातील शेतीचे तुकडे झाले आहेत. त्यावरचा भार कमी करण्याची गरज आहे. भारतातील शेती अनियमित पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे गावातील तरुणांना कामासाठी शहराकडे पाठविले पाहिजे. शहरेच देशाला विकसित बनवू शकतात. महाराष्ट्राच्या उत्पन्नात चार शहरांचा वाटा ५२ टक्के आहे. खेडेगाव वाईट नाही. पण तेथे उद्योगधंदे येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत.शेतीचीही व्याख्या भंपकपणाची आहे. ज्वारी, भात, इतर पीक म्हणजे शेती समजले जाते. शेतीसोबत शेळी, मेंढी, कुक्कुटपालन असे जोडधंदे शेतकºयांनी केले पहिजेत. गाई, म्हैशी पाळणाºया राज्यातील एकाही शेतकºयाने आत्महत्या केलेली नाही. त्यामुळे सरपंचांनी गावात पाणी, इंटरनेट, शिक्षण या पायाभूत सुविधा देऊन रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा. त्यातून गावातील मानवी विकासाला चालना मिळेल. गावातील मुलींच्या संरक्षणाची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे. तरुणांना कौशल्यावर आधारित शिक्षणाची गरज आहे. पदवी घेतलेल्या तरुणांना काहीच येत नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे केवळ पदवी देणाºया शिक्षण संस्था गुंडाळल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.