शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण विकासाच्या भंपक कल्पना आता बाजूला ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:30 IST

सांगली : ग्रामीण विकास ही संकल्पना जगात कोठेही अस्तित्वात नाही. पण भारतात मात्र त्यावर अधिक भर दिला जातो. देशाचा विकास शहरांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे शहरांचा दुस्वास करू नका, असा सल्ला देत, रस्ते, गटारी, आरोग्य केंद्र या ग्रामविकासाच्या भंपक कल्पना बाजूला ठेवून रोजगार निर्मितीवर भर द्या, असे आवाहन प्रमुख वक्ते ...

सांगली : ग्रामीण विकास ही संकल्पना जगात कोठेही अस्तित्वात नाही. पण भारतात मात्र त्यावर अधिक भर दिला जातो. देशाचा विकास शहरांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे शहरांचा दुस्वास करू नका, असा सल्ला देत, रस्ते, गटारी, आरोग्य केंद्र या ग्रामविकासाच्या भंपक कल्पना बाजूला ठेवून रोजगार निर्मितीवर भर द्या, असे आवाहन प्रमुख वक्ते निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील यांनी केले.‘लोकमत’च्या सरपंच अवॉर्डस्चे कौतुक करीत नानासाहेब पाटील म्हणाले की, चीनने प्रगतीला सुरूवात केली, तेव्हा त्या देशात बेरोजगारीचा प्रश्न बिकट होता. तेथील राज्यकर्त्यांनी शेतीसोबतच रोजगार निर्मितीवर भर दिला. प्रत्येक गावात एक उद्योग उभा केला. सकाळी शेती आणि दुपारी उद्योगधंद्यात काम, असे वातावरण तयार केले. दोन ते तीन वर्षात पावणेदोन कोटी उद्योग उभे केले. समुद्राजवळील गावात आयात-निर्यात केंद्रे उभारली. परदेशी गुंतवणूक वाढली. आज जगातील ४५ टक्के वस्तूंची निर्मिती चीनमध्ये होते. याउलट भारतात बेरोजगारीचे संकट कायम आहे. भविष्यात तरूणांच्या प्रक्षोभाला राज्यकर्त्यांना सामोरे जावे लागेल.गावातील शेतीचे तुकडे झाले आहेत. त्यावरचा भार कमी करण्याची गरज आहे. भारतातील शेती अनियमित पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे गावातील तरुणांना कामासाठी शहराकडे पाठविले पाहिजे. शहरेच देशाला विकसित बनवू शकतात. महाराष्ट्राच्या उत्पन्नात चार शहरांचा वाटा ५२ टक्के आहे. खेडेगाव वाईट नाही. पण तेथे उद्योगधंदे येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत.शेतीचीही व्याख्या भंपकपणाची आहे. ज्वारी, भात, इतर पीक म्हणजे शेती समजले जाते. शेतीसोबत शेळी, मेंढी, कुक्कुटपालन असे जोडधंदे शेतकºयांनी केले पहिजेत. गाई, म्हैशी पाळणाºया राज्यातील एकाही शेतकºयाने आत्महत्या केलेली नाही. त्यामुळे सरपंचांनी गावात पाणी, इंटरनेट, शिक्षण या पायाभूत सुविधा देऊन रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा. त्यातून गावातील मानवी विकासाला चालना मिळेल. गावातील मुलींच्या संरक्षणाची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे. तरुणांना कौशल्यावर आधारित शिक्षणाची गरज आहे. पदवी घेतलेल्या तरुणांना काहीच येत नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे केवळ पदवी देणाºया शिक्षण संस्था गुंडाळल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.