शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीतून घडले नेतृत्व थेट विधानसभेपर्यंत पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:27 IST

सांगली : ग्रामपंचायत निवडणूक ही राजकीय पायाभरणी असून येथे घडलेले नेतृत्व राजकारणात यशस्वीच झाल्याची उदाहरणे पहाण्यास मदत मिळत आहे. ...

सांगली : ग्रामपंचायत निवडणूक ही राजकीय पायाभरणी असून येथे घडलेले नेतृत्व राजकारणात यशस्वीच झाल्याची उदाहरणे पहाण्यास मदत मिळत आहे. आमदार मोहनराव कदम, अनिल बाबर हे विधानसभेपर्यंत पोहोचले आहेत. सरपंचपदावर विराजमान झालेले चौघेजण जिल्हा परिषद अध्यक्ष तर सातजणांनी सभापतीपदापर्यंत झेप घेतली आहे.

सोनसळ ता. कडेगाव ग्रामपंचायतीचे १९६७ ते ७२ या कालावधीत सरपंचपद मोहनराव कदम यांनी भूषविले होते. ग्रामपंचायतीमध्ये आदर्श कारभारामुळे त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचीही त्यांनी जबाबदारी संभाळली होती. पुढे त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला आहे.

गार्डी ता. खानापूर ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनिल बाबर यांनी १९७२ च्या दरम्यान भूषविले होते. त्यानंतर जिल्हा परिषद विषय समितीचे सभापतीपदाची चांगल्यापध्दतीने जबाबदारी संभाळली होती. त्यांच्याकडील नेतृत्व गुण लक्षात घेवूनच संपतराव माने यांनी त्यांच्यावर खानापूर तालुक्यातील राजकारणाची जबाबदारी सोपविली होती. पुढे त्यांनी खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील विजय खेचून आणून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. मोहनराव कदम, अनिल बाबर यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच ते विधानसभेत प्रवेश केला. आता त्यांचे मंत्रीपदापर्यंत पाेहाेचणे हेच लक्ष असल्याचे दिसत आहे.

ग्रामपंचायतीपासून सुरुवात केलेले कासेगाव ता. वाळवा येथील देवराज पाटील, पांडोझरी ता. जत येथील अण्णासाहेब गडदे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषविले आहेत.

चौकट

ही तर राजकीय पायाभरणी

ग्रामपंचायत सरपंचपदाची जबाबदारी संभाळल्यानंतर त्या व्यक्तीस ग्रामीण भागाच्या समस्यांची जाण असती. विकास कामे कशापध्दतीची केली पाहिजेत, याचा चांगला अभ्यास झालेला असतो. राजकारणातील बारकावेही त्यांना चांगल्यापध्दतीने कळत असल्यामुळे ग्रामपंचायत ही तर राजकीय पायाभरणीच आहे, असे मत सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब कोडग यांनी व्यक्त केले.

चौकट

असे घडले नेतृत्व

-बसवराज पाटील यांनी संख ग्रामपंचायतीचे सरपंच ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि जत विधानसभेची निवडणूक लढविण्यापर्यंत राजकीय प्रवास झाला आहे. जत तालुक्यातील राजकारणामध्ये त्यांचा दबदबा आहे.

-कवठेपिरान ता. मिरज ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच ते जिल्हा परिषद सदस्यापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. त्यांनी गावात विकासाचे आदर्श मॉडेलही तयार केले आहे. त्यांची जि. प.चे अध्यक्षपदाची संधी थोडक्यात हुकले आहे.