शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

ग्रामपंचायतीतून घडले नेतृत्व थेट विधानसभेपर्यंत पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:27 IST

सांगली : ग्रामपंचायत निवडणूक ही राजकीय पायाभरणी असून येथे घडलेले नेतृत्व राजकारणात यशस्वीच झाल्याची उदाहरणे पहाण्यास मदत मिळत आहे. ...

सांगली : ग्रामपंचायत निवडणूक ही राजकीय पायाभरणी असून येथे घडलेले नेतृत्व राजकारणात यशस्वीच झाल्याची उदाहरणे पहाण्यास मदत मिळत आहे. आमदार मोहनराव कदम, अनिल बाबर हे विधानसभेपर्यंत पोहोचले आहेत. सरपंचपदावर विराजमान झालेले चौघेजण जिल्हा परिषद अध्यक्ष तर सातजणांनी सभापतीपदापर्यंत झेप घेतली आहे.

सोनसळ ता. कडेगाव ग्रामपंचायतीचे १९६७ ते ७२ या कालावधीत सरपंचपद मोहनराव कदम यांनी भूषविले होते. ग्रामपंचायतीमध्ये आदर्श कारभारामुळे त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचीही त्यांनी जबाबदारी संभाळली होती. पुढे त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला आहे.

गार्डी ता. खानापूर ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनिल बाबर यांनी १९७२ च्या दरम्यान भूषविले होते. त्यानंतर जिल्हा परिषद विषय समितीचे सभापतीपदाची चांगल्यापध्दतीने जबाबदारी संभाळली होती. त्यांच्याकडील नेतृत्व गुण लक्षात घेवूनच संपतराव माने यांनी त्यांच्यावर खानापूर तालुक्यातील राजकारणाची जबाबदारी सोपविली होती. पुढे त्यांनी खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील विजय खेचून आणून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. मोहनराव कदम, अनिल बाबर यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच ते विधानसभेत प्रवेश केला. आता त्यांचे मंत्रीपदापर्यंत पाेहाेचणे हेच लक्ष असल्याचे दिसत आहे.

ग्रामपंचायतीपासून सुरुवात केलेले कासेगाव ता. वाळवा येथील देवराज पाटील, पांडोझरी ता. जत येथील अण्णासाहेब गडदे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषविले आहेत.

चौकट

ही तर राजकीय पायाभरणी

ग्रामपंचायत सरपंचपदाची जबाबदारी संभाळल्यानंतर त्या व्यक्तीस ग्रामीण भागाच्या समस्यांची जाण असती. विकास कामे कशापध्दतीची केली पाहिजेत, याचा चांगला अभ्यास झालेला असतो. राजकारणातील बारकावेही त्यांना चांगल्यापध्दतीने कळत असल्यामुळे ग्रामपंचायत ही तर राजकीय पायाभरणीच आहे, असे मत सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब कोडग यांनी व्यक्त केले.

चौकट

असे घडले नेतृत्व

-बसवराज पाटील यांनी संख ग्रामपंचायतीचे सरपंच ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि जत विधानसभेची निवडणूक लढविण्यापर्यंत राजकीय प्रवास झाला आहे. जत तालुक्यातील राजकारणामध्ये त्यांचा दबदबा आहे.

-कवठेपिरान ता. मिरज ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच ते जिल्हा परिषद सदस्यापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. त्यांनी गावात विकासाचे आदर्श मॉडेलही तयार केले आहे. त्यांची जि. प.चे अध्यक्षपदाची संधी थोडक्यात हुकले आहे.