शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

ग्रामपंचायतीतून घडले नेतृत्व थेट विधानसभेपर्यंत पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:27 IST

सांगली : ग्रामपंचायत निवडणूक ही राजकीय पायाभरणी असून येथे घडलेले नेतृत्व राजकारणात यशस्वीच झाल्याची उदाहरणे पहाण्यास मदत मिळत आहे. ...

सांगली : ग्रामपंचायत निवडणूक ही राजकीय पायाभरणी असून येथे घडलेले नेतृत्व राजकारणात यशस्वीच झाल्याची उदाहरणे पहाण्यास मदत मिळत आहे. आमदार मोहनराव कदम, अनिल बाबर हे विधानसभेपर्यंत पोहोचले आहेत. सरपंचपदावर विराजमान झालेले चौघेजण जिल्हा परिषद अध्यक्ष तर सातजणांनी सभापतीपदापर्यंत झेप घेतली आहे.

सोनसळ ता. कडेगाव ग्रामपंचायतीचे १९६७ ते ७२ या कालावधीत सरपंचपद मोहनराव कदम यांनी भूषविले होते. ग्रामपंचायतीमध्ये आदर्श कारभारामुळे त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचीही त्यांनी जबाबदारी संभाळली होती. पुढे त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला आहे.

गार्डी ता. खानापूर ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनिल बाबर यांनी १९७२ च्या दरम्यान भूषविले होते. त्यानंतर जिल्हा परिषद विषय समितीचे सभापतीपदाची चांगल्यापध्दतीने जबाबदारी संभाळली होती. त्यांच्याकडील नेतृत्व गुण लक्षात घेवूनच संपतराव माने यांनी त्यांच्यावर खानापूर तालुक्यातील राजकारणाची जबाबदारी सोपविली होती. पुढे त्यांनी खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील विजय खेचून आणून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. मोहनराव कदम, अनिल बाबर यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच ते विधानसभेत प्रवेश केला. आता त्यांचे मंत्रीपदापर्यंत पाेहाेचणे हेच लक्ष असल्याचे दिसत आहे.

ग्रामपंचायतीपासून सुरुवात केलेले कासेगाव ता. वाळवा येथील देवराज पाटील, पांडोझरी ता. जत येथील अण्णासाहेब गडदे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषविले आहेत.

चौकट

ही तर राजकीय पायाभरणी

ग्रामपंचायत सरपंचपदाची जबाबदारी संभाळल्यानंतर त्या व्यक्तीस ग्रामीण भागाच्या समस्यांची जाण असती. विकास कामे कशापध्दतीची केली पाहिजेत, याचा चांगला अभ्यास झालेला असतो. राजकारणातील बारकावेही त्यांना चांगल्यापध्दतीने कळत असल्यामुळे ग्रामपंचायत ही तर राजकीय पायाभरणीच आहे, असे मत सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब कोडग यांनी व्यक्त केले.

चौकट

असे घडले नेतृत्व

-बसवराज पाटील यांनी संख ग्रामपंचायतीचे सरपंच ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि जत विधानसभेची निवडणूक लढविण्यापर्यंत राजकीय प्रवास झाला आहे. जत तालुक्यातील राजकारणामध्ये त्यांचा दबदबा आहे.

-कवठेपिरान ता. मिरज ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच ते जिल्हा परिषद सदस्यापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. त्यांनी गावात विकासाचे आदर्श मॉडेलही तयार केले आहे. त्यांची जि. प.चे अध्यक्षपदाची संधी थोडक्यात हुकले आहे.