शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

सर्वोदय साखर कारखान्यासाठी नेत्यांचा शड्डू

By admin | Updated: September 30, 2016 01:30 IST

पंचवार्षिक निवडणुकीची तयारी : अस्तित्वासाठी लढणार जयंत पाटील - संभाजी पवारांचा गट

  सांगली : दोन दिग्गज नेत्यांच्या संघर्षाची कहाणी लाभलेल्या कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सर्वोदय शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. कारखान्यावर ताबा मिळविण्यासाठी निवडणुकीचे मैदान मारण्याच्या हेतूने आ. जयंत पाटील आणि माजी आमदार संभाजी पवार यांच्या गटाने आताच शड्डू ठोकला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील गावांमध्ये निवडणुकीसाठीची पेरणी हे गट करीत आहेत. सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया मेअखेर सुरू होणार होती. मात्र, दुष्काळामुळे या निवडणुका आॅक्टोबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीचा फड रंगणार आहे. सर्वोदय कारखान्याच्या मालकी हक्कावरून गेली काही वर्षे जयंत पाटील आणि संभाजी पवार यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे. कारखान्याचा ताबा सध्या राजारामबापू कारखान्याकडे आहे. या कारखान्याची उभारणी संभाजी पवार, शरद पाटील, व्यंकाप्पा पत्की यांच्यासह अन्य नेत्यांनी केली होती. स्थापनेनंतर पवारांच्या नेतृत्वाखालीच या कारखान्याचे काम सुरू होते. संभाजी पवारांचे पुत्र, माजी नगरसेवक पृथ्वीराज पवार हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. कारखान्याचा पूर्ण ताबा जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्याकडे गेल्यानंतर पवारांनी जयंत पाटील यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला. आर्थिक देण्यांचा वाद न्यायालयात गेला. अजूनही हा संघर्ष सुरू आहे. कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत असताना, जयंत पाटील यांनी मदत केली होती. नंतर राजारामबापू कारखान्याकडे याचा ताबा गेला. आर्थिक देवाण-घेवाण हा कळीचा मुद्दा ठरला. त्यातूनच राजकीय संघर्षाला सुरुवात झाली. त्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ४८ गावे आहेत. यातील २४ हून अधिक गावे वाळवा तालुक्यात, तर उर्वरित मिरज तालुक्यात आहेत. कार्यक्षेत्रातील गावांमध्ये जयंत पाटील आणि संभाजी पवारांचे समान प्राबल्य आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीच्या तयारीलाही दोन्ही गटांनी सुरुवात केली होती. पाच महिन्यांचा ब्रेक लागल्याने निवडणुकीच्या तयारीलाही विराम मिळाला होता. आता पुन्हा जोमाने दोन्ही गट कामाला लागले आहेत. सर्वोदय कारखान्याच्या निवडणुकीत काय होणार, हा जिल्ह्यातील राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे. दोन दिग्गज नेत्यांच्या संघर्षाला या निवडणुकीच्या निमित्ताने बळ मिळणार असून, कारखान्यावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न होण्याची चिन्हे आहेत. तशी रणनीतीही तयार होत आहे. (प्रतिनिधी) २१ जागांसाठी निवडणूक वाळवा, सांगली, मिरज पूर्व आणि पश्चिम असे या कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. या कार्यक्षेत्रात ४८ गावांचा समावेश आहे. कारखान्याचे एकूण १६ हजार सभासद आहेत. यापूर्वी २३ जणांचे संचालक मंडळ अस्तित्वात होते. सहकार कायद्यातील बदलामुळे आता आगामी निवडणूक २१ जागांसाठी होणार आहे. लढाई प्रतिष्ठेची इस्लामपूरकर आणि सांगलीकरांच्या या लढाईत आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडणार आहे. यापूर्वीही दोन्ही गटांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या वादाचा डंका राज्यातही वाजला. त्यामुळे राज्यातील राजकीय गोटातही हा कारखाना चर्चेत आला होता. निवडणुकीच्या निमित्तानेही पुन्हा राजकीय पटलावर दोन्ही नेत्यांच्या संघर्षाची चर्चा रंगणार आहे.