शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यामध्ये नेत्यांनी पेटवलं वाकुर्डेचं पाणी !

By admin | Updated: October 6, 2014 23:43 IST

विकासाचे मुद्देही ऐरणीवर : ग्रामीण भागातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

अशोक पाटील--इस्लामपूर --शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार आणि त्यांच्या स्टार प्रचारकांनी वाकुर्डेचं पाणी चांगलंच पेटवलं आहे. विकास कामाचे श्रेय घेण्यासाठी ग्रामीण भागातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षाच्या सभास्थानी असले तरी, मतदार मात्र सर्वांच्याच सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद देताना दिसत आहेत.मानसिंगराव नाईक यांनी गत निवडणुकीत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांचे चिन्ह टीव्ही होते, तर त्यांच्याविरोधात शिवाजीराव नाईक यांनी काँग्रेसच्या हाताचा पंजा चिन्हावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मानसिंगराव नाईक राष्ट्रवादीसोबत असले तरी, शिवाजीराव नाईक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले शिवाजीराव देशमुखांचे चिरंजीव सत्यजित देशमुख हेही पक्षाच्या चिन्हावर नशीब अजमावत आहेत.सर्वच उमेदवारांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या वाकुर्डे बुद्रुक योजनेचा मुद्दा उचलून धरला आहे. याचे श्रेय घेण्यासाठी तिघेही सरसावले आहेत. भाजपच्या काळातच ही योजना सुरू झाली आणि भाजपच्याच काळात ही योजना पूर्ण होईल, असे आवाहन शिवाजीराव नाईक करीत आहेत. मानसिंगराव नाईकांनीही आपल्या कार्यकाळातच ही योजना मार्गी लागली असून योजना पूर्ण करण्यासाठी पुन्हा संधी द्या, अशी साद मतदारांना घातली आहे. शिवाजीराव देशमुख यांच्या माध्यमातून मतदारसंघासाठी कोट्यवधींचा निधी आणून कामे पूर्ण केल्याचा दावा सत्यजित देशमुख यांच्याकडून केला जात आहे. या तीनही उमेदवारांच्या सभा गाजत असून, मतदार त्यांच्या सभांना चांगलाच प्रतिसाद देत आहेत.उड्डाण पुलाचा प्रश्न मार्गी लावलाशिवाजीराव नाईक यांनी वाळवा तालुक्यातील नेर्ले, वाघवाडी, येलूर या गावांलगत महामार्गावर उड्डाण पूल बांधण्यासाठी आंदोलन केले होते. त्याचाही प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन ते सभांमधून देत आहेत. शिवाय पेठ येथील वाघवाडीतील औद्योगिक वसाहतीला आपण विरोध केल्यानेच शेतकऱ्यांच्या जमिनी वाचल्याचेही सांगत आहेत.