शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

इच्छुकांच्या गर्दीने नेते हैराण

By admin | Updated: June 24, 2015 00:46 IST

सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती : २६ जूननंतरच चित्र स्पष्ट होणार

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा विस्तार मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात असल्यामुळे इच्छुकांची संख्या दोनशेहून अधिक आहे. एकीकडे नेत्यांच्या आघाडीसाठी बैठका सुरू असताना दुसरीकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी वाढल्याने नेत्यांची डोकेदुखी झाली आहे. बहुतांशी नेते, आमदार आता मुंबईत असल्यामुळे बाजार समितीचे चित्र २५ व २६ जूनलाच स्पष्ट होणार आहे.सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तब्बल सात वर्षांनी होत असल्यामुळे इच्छुकांची संख्या भरमसाट वाढली आहे. केवळ जतमधूनच भाजपचे आमदार विलासराव जगताप यांच्याकडे ४५ हून अधिकजणांनी मागणी केली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातून ५०, तर मिरज तालुक्यातून शंभरहून अधिक जणांनी भाजपसह इतर पक्षांकडे उमेदवारीची मागणी केली आहे. या संस्थेवर तसे वसंतदादा घराण्याचेच ५६ वर्षे वर्चस्व होते. सुरुवातीला वसंतदादा पाटील, त्यानंतर विष्णुअण्णा व नंतर मदन पाटील गटाचीच सत्ता राहिली. याला अपवाद केवळ गतवेळची निवडणूक राहिली. २००८ च्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलच्या झेंड्याखाली जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री अजितराव घोरपडे, संजयकाका पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार संभाजी पवार एकत्रित आले. राष्ट्रवादी, भाजपच्या या पॅनेलला पतंगराव कदम गटाचीही साथ मिळाली. ही निवडणूक मदन पाटील विरुध्द सर्वजण अशी झाली. चुरशीच्या निवडणुकीनंतर या संस्थेत पहिल्यांदाच परिवर्तन घडून आले. आता मात्र जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीनंतर समीकरणे बदलली आहेत. पतंगराव कदम गट मदन पाटील यांच्यावर नाराज असल्यामुळे निवडणूक अटळ असल्याचे बोलले जात आहे. आ. जगताप यांनी मदन पाटील, विशाल पाटील यांच्याशी चर्चाही सुरूकेली आहे. नेतेमंडळींची कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू असल्यामुळे अद्याप कोणीही निर्णय जाहीर केलेला नाही. जिल्ह्यातील आमदार व नेतेमंडळी सध्या मुंबईत असल्यामुळे याच ठिकाणी निवडणुकीची आघाडी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे २६ जूननंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)तिसऱ्या आघाडीची स्थापना होणारसमितीमध्ये भाजप, काँग्रेसच्या आघाडीची चर्चा सुरू असतानाच आता तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी मंगळवारी माजी आमदार शरद पाटील, शिवसेनेचे पृथ्वीराज पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संजय बेले यांची बैठक झाली. येत्या दोन दिवसात खा. राजू शेट्टी यांच्याबरोबरही चर्चा होणार आहे. समविचारी पक्षांना एकत्रित आणून या निवडणुकीत कडवे आव्हान उभे करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तिसऱ्या आघाडीसाठी शेट्टी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपची इतर पक्षांशी आघाडी सुरू असल्यामुळे शिवसेना नेते राज्यपातळीवरील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. ४९ अर्जांची विक्रीमिरज : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी मंगळवारी २९ अर्जांची विक्री झाली. दोन दिवसात ४९ अर्जांची विक्री झाली असून एकही अर्ज दाखल झालेला नाही. भीमराव माने, माजी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील यांचा, अर्ज विकत घेणाऱ्यांत समावेश आहे.केवळ शंभर रुपये अनामत रकमेने संख्या वाढणारकृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी केवळ शंभर रुपये अनामत रक्कम केल्याने उमेदवारांची संख्या वाढणार आहे. कोल्हापूर बाजार समितीसाठी नऊशेहून अधिक जणांनी उमेदवारी दाखल केल्याचे समजते. याच धर्तीवर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवार माघार घेताना नेतेमंडळींची दमछाक होण्याची शक्यता आहे.