शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

इच्छुकांच्या गर्दीने नेते हैराण

By admin | Updated: June 24, 2015 00:46 IST

सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती : २६ जूननंतरच चित्र स्पष्ट होणार

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा विस्तार मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात असल्यामुळे इच्छुकांची संख्या दोनशेहून अधिक आहे. एकीकडे नेत्यांच्या आघाडीसाठी बैठका सुरू असताना दुसरीकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी वाढल्याने नेत्यांची डोकेदुखी झाली आहे. बहुतांशी नेते, आमदार आता मुंबईत असल्यामुळे बाजार समितीचे चित्र २५ व २६ जूनलाच स्पष्ट होणार आहे.सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तब्बल सात वर्षांनी होत असल्यामुळे इच्छुकांची संख्या भरमसाट वाढली आहे. केवळ जतमधूनच भाजपचे आमदार विलासराव जगताप यांच्याकडे ४५ हून अधिकजणांनी मागणी केली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातून ५०, तर मिरज तालुक्यातून शंभरहून अधिक जणांनी भाजपसह इतर पक्षांकडे उमेदवारीची मागणी केली आहे. या संस्थेवर तसे वसंतदादा घराण्याचेच ५६ वर्षे वर्चस्व होते. सुरुवातीला वसंतदादा पाटील, त्यानंतर विष्णुअण्णा व नंतर मदन पाटील गटाचीच सत्ता राहिली. याला अपवाद केवळ गतवेळची निवडणूक राहिली. २००८ च्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलच्या झेंड्याखाली जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री अजितराव घोरपडे, संजयकाका पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार संभाजी पवार एकत्रित आले. राष्ट्रवादी, भाजपच्या या पॅनेलला पतंगराव कदम गटाचीही साथ मिळाली. ही निवडणूक मदन पाटील विरुध्द सर्वजण अशी झाली. चुरशीच्या निवडणुकीनंतर या संस्थेत पहिल्यांदाच परिवर्तन घडून आले. आता मात्र जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीनंतर समीकरणे बदलली आहेत. पतंगराव कदम गट मदन पाटील यांच्यावर नाराज असल्यामुळे निवडणूक अटळ असल्याचे बोलले जात आहे. आ. जगताप यांनी मदन पाटील, विशाल पाटील यांच्याशी चर्चाही सुरूकेली आहे. नेतेमंडळींची कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू असल्यामुळे अद्याप कोणीही निर्णय जाहीर केलेला नाही. जिल्ह्यातील आमदार व नेतेमंडळी सध्या मुंबईत असल्यामुळे याच ठिकाणी निवडणुकीची आघाडी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे २६ जूननंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)तिसऱ्या आघाडीची स्थापना होणारसमितीमध्ये भाजप, काँग्रेसच्या आघाडीची चर्चा सुरू असतानाच आता तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी मंगळवारी माजी आमदार शरद पाटील, शिवसेनेचे पृथ्वीराज पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संजय बेले यांची बैठक झाली. येत्या दोन दिवसात खा. राजू शेट्टी यांच्याबरोबरही चर्चा होणार आहे. समविचारी पक्षांना एकत्रित आणून या निवडणुकीत कडवे आव्हान उभे करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तिसऱ्या आघाडीसाठी शेट्टी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपची इतर पक्षांशी आघाडी सुरू असल्यामुळे शिवसेना नेते राज्यपातळीवरील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. ४९ अर्जांची विक्रीमिरज : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी मंगळवारी २९ अर्जांची विक्री झाली. दोन दिवसात ४९ अर्जांची विक्री झाली असून एकही अर्ज दाखल झालेला नाही. भीमराव माने, माजी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील यांचा, अर्ज विकत घेणाऱ्यांत समावेश आहे.केवळ शंभर रुपये अनामत रकमेने संख्या वाढणारकृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी केवळ शंभर रुपये अनामत रक्कम केल्याने उमेदवारांची संख्या वाढणार आहे. कोल्हापूर बाजार समितीसाठी नऊशेहून अधिक जणांनी उमेदवारी दाखल केल्याचे समजते. याच धर्तीवर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवार माघार घेताना नेतेमंडळींची दमछाक होण्याची शक्यता आहे.