शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

इच्छुकांच्या गर्दीने नेते हैराण

By admin | Updated: June 24, 2015 00:46 IST

सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती : २६ जूननंतरच चित्र स्पष्ट होणार

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा विस्तार मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात असल्यामुळे इच्छुकांची संख्या दोनशेहून अधिक आहे. एकीकडे नेत्यांच्या आघाडीसाठी बैठका सुरू असताना दुसरीकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी वाढल्याने नेत्यांची डोकेदुखी झाली आहे. बहुतांशी नेते, आमदार आता मुंबईत असल्यामुळे बाजार समितीचे चित्र २५ व २६ जूनलाच स्पष्ट होणार आहे.सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तब्बल सात वर्षांनी होत असल्यामुळे इच्छुकांची संख्या भरमसाट वाढली आहे. केवळ जतमधूनच भाजपचे आमदार विलासराव जगताप यांच्याकडे ४५ हून अधिकजणांनी मागणी केली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातून ५०, तर मिरज तालुक्यातून शंभरहून अधिक जणांनी भाजपसह इतर पक्षांकडे उमेदवारीची मागणी केली आहे. या संस्थेवर तसे वसंतदादा घराण्याचेच ५६ वर्षे वर्चस्व होते. सुरुवातीला वसंतदादा पाटील, त्यानंतर विष्णुअण्णा व नंतर मदन पाटील गटाचीच सत्ता राहिली. याला अपवाद केवळ गतवेळची निवडणूक राहिली. २००८ च्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलच्या झेंड्याखाली जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री अजितराव घोरपडे, संजयकाका पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार संभाजी पवार एकत्रित आले. राष्ट्रवादी, भाजपच्या या पॅनेलला पतंगराव कदम गटाचीही साथ मिळाली. ही निवडणूक मदन पाटील विरुध्द सर्वजण अशी झाली. चुरशीच्या निवडणुकीनंतर या संस्थेत पहिल्यांदाच परिवर्तन घडून आले. आता मात्र जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीनंतर समीकरणे बदलली आहेत. पतंगराव कदम गट मदन पाटील यांच्यावर नाराज असल्यामुळे निवडणूक अटळ असल्याचे बोलले जात आहे. आ. जगताप यांनी मदन पाटील, विशाल पाटील यांच्याशी चर्चाही सुरूकेली आहे. नेतेमंडळींची कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू असल्यामुळे अद्याप कोणीही निर्णय जाहीर केलेला नाही. जिल्ह्यातील आमदार व नेतेमंडळी सध्या मुंबईत असल्यामुळे याच ठिकाणी निवडणुकीची आघाडी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे २६ जूननंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)तिसऱ्या आघाडीची स्थापना होणारसमितीमध्ये भाजप, काँग्रेसच्या आघाडीची चर्चा सुरू असतानाच आता तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी मंगळवारी माजी आमदार शरद पाटील, शिवसेनेचे पृथ्वीराज पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संजय बेले यांची बैठक झाली. येत्या दोन दिवसात खा. राजू शेट्टी यांच्याबरोबरही चर्चा होणार आहे. समविचारी पक्षांना एकत्रित आणून या निवडणुकीत कडवे आव्हान उभे करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तिसऱ्या आघाडीसाठी शेट्टी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपची इतर पक्षांशी आघाडी सुरू असल्यामुळे शिवसेना नेते राज्यपातळीवरील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. ४९ अर्जांची विक्रीमिरज : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी मंगळवारी २९ अर्जांची विक्री झाली. दोन दिवसात ४९ अर्जांची विक्री झाली असून एकही अर्ज दाखल झालेला नाही. भीमराव माने, माजी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील यांचा, अर्ज विकत घेणाऱ्यांत समावेश आहे.केवळ शंभर रुपये अनामत रकमेने संख्या वाढणारकृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी केवळ शंभर रुपये अनामत रक्कम केल्याने उमेदवारांची संख्या वाढणार आहे. कोल्हापूर बाजार समितीसाठी नऊशेहून अधिक जणांनी उमेदवारी दाखल केल्याचे समजते. याच धर्तीवर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवार माघार घेताना नेतेमंडळींची दमछाक होण्याची शक्यता आहे.