शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

शेतकरीविरोधी सरकारला हाकलून लावा: जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:48 IST

इस्लामपूर : माझे सहकारी, प्रमुख पदाधिकारी व राज्यातील कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आपण वर्षभरात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी चोख पार ...

इस्लामपूर : माझे सहकारी, प्रमुख पदाधिकारी व राज्यातील कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आपण वर्षभरात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी चोख पार पाडू शकलो, अशी भावना माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी कृषी, अर्थ व रोजगार क्षेत्रात वाट लावणाऱ्या शेतकरीविरोधी सरकारला हाकलून लावण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.जयंत पाटील यांनी पुणे येथे राष्ट्रीय नेते खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारुन एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.जयंत पाटील म्हणाले, गेल्या वर्षभरात आपल्या पक्षाचा पूर्ण फोकस बूथ पातळीवर पक्षबांधणी करून केंद्र व राज्यातील सामान्य माणूस व शेतकरीविरोधी सरकारचा पर्दाफाश करण्यावर राहिलेला आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर मी सर्व विधानसभा मतदारसंघात पक्ष निरीक्षकांच्या बैठका घेऊन प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील स्थिती जाणून घेतली. आम्ही पक्षाच्या राज्य कार्यकारिणीमध्ये समाजाच्या सर्व घटकांतील कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले. सध्या राज्यभरात बुथ पातळीवर राष्ट्रवादीचे चार लाखांपेक्षा अधिक सदस्य झालेले आहेत. बुथ पातळीवर सर्व अध्यक्षांशी मी वेळोवेळी ‘आॅडियो कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून संपर्क साधत आहे.‘हल्लाबोल’, ‘निर्धार परिवर्तनाचा’ यासारख्या राज्यभरात झालेल्या आंदोलनातून जनतेच्या आक्रोशाला वाट मिळाली. पक्षाच्या सर्वस्तरातील कार्यकर्त्यांना एक चांगला ‘कृती कार्यक्रम’ मिळाला आहे.पाटील म्हणाले, पुढील सहा महिने आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. जनतेच्या विरोधात काम करून राज्याच्या कृषी, रोजगार आणि अर्थव्यवस्थेची वाट लावणारे राज्य सरकार जनतेच्या साथीने आपल्याला बदलायचे आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला ‘रयतेचे राज्य’ आणायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील ‘नवा महाराष्ट्र’ घडविण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि आपल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन आपण ती पार पाडूया, असेही पाटील यावेळी म्हणाले.जयंत पाटील यांचा आज थेट संवादजयंत पाटील आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर जनतेशी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. मंगळवार, दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता ते ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून हा संवाद साधणार आहेत. आपण आपल्या मनातील प्रश्न व सदिच्छांसह या संवाद पर्वात सहभागी व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे.