शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

एलबीटीप्रश्नी मुख्यमंत्र्यांना भेटणार

By admin | Updated: April 2, 2015 00:39 IST

विवेक कांबळे यांचा पुढाकार : सर्व महापालिकांच्या महापौरांना पत्र

सांगली : महापालिका हद्दीतील एलबीटी एक आॅगस्टपासून रद्द झाल्यानंतर पालिकेची आर्थिक स्वायत्तता धोक्यात येणार आहे. या प्रश्नावर राज्यातील सर्व महापालिकांचे महापौर, उपमहापौरांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी महापौर विवेक कांबळे यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व महापालिकांच्या महापौर व उपमहापौरांना पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन कांबळे यांनी केले आहे. राज्य शासनाने एक आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन अर्थसंकल्पात दिले आहे. एलबीटी लागू असलेल्या सर्वच महापालिकांची गेल्या दोन वर्षात मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. त्यात एलबीटी रद्द झाल्यानंतर ही स्थिती आणखीनच बिकट होणार आहे. शासनाकडून एलबीटीपोटीचे अनुदान कोणत्या स्वरुपात मिळणार, व्हॅटवर सरचार्ज लागू होणार असला तरी, महापालिकेची रक्कम कधी मिळणार, याची स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे सर्वच महापालिकांत संभ्रमाचे वातावरण आहे. यासंदर्भात महापौर विवेक कांबळे यांनी पुढाकार घेऊन एलबीटी लागू असलेल्या सर्वच महापालिकांच्या महापौर व उपमहापौरांना पत्र पाठविले आहे. एलबीटी रद्द झाल्यानंतर महापालिकेचे दैनंदिन कामकाज व विकास कामांवर परिणाम होणार आहे. नागरी सुविधा ते कर्मचाऱ्यांचे वेतन, अशा अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. काही व्यापारी संघटनांचे म्हणणे ऐकून राज्य शासन एकतर्फी निर्णय घेत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत असलेल्या एलबीटीवरच शासनाकडून घाला घातला जात आहे. त्यात मुद्रांक शुल्कची रक्कम पालिकांना मिळण्यास विलंब होत आहे. एलबीटी हटवून व्हॅटचे अनुदान पालिकांना दिले जाईल, पण त्याचा कालावधी पाहता, पालिकेचा आर्थिक कणाच मोडून पडणार आहे. राज्य व केंद्र शासनाच्या अनेक योजना निधीअभावी पूर्ण होऊ शकणार नाहीत. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या सर्व समस्यांवर विचारविनियम केला जाणार आहे. पालिकांना अनुदानाचे स्वरुप निश्चित करण्यासाठी व पालिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ मागितली आहे. त्यांची वेळ मिळताच त्या बैठकीला महाराष्ट्रातील सर्व महापौर व उपमहापौरांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही विवेक कांबळे यांनी पत्राद्वारे केले आहे. (प्रतिनिधी)