शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
8
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
9
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
10
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
11
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
12
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
13
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
14
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
15
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
16
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
17
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
18
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
19
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
20
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय

एलबीटीप्रश्नी २६ महापौर एकत्र येणार

By admin | Updated: May 23, 2015 00:37 IST

सांगलीचा पुढाकार : पुढील आठवड्यात बैठकीचे नियोजन

सांगली : राज्य शासनाने एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्याविरोधात सांगली महापालिकेने पुढाकार घेत राज्यातील सर्व महापालिकांच्या महापौरांना एकत्र आणण्याचे नियोजन सुरू केले आहे. पुढील आठवड्यात २६ महापौरांची बैठक घेतली जाणार असून, त्यात राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. शासनाने एक आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्याचे जाहीर केले आहे. त्यात महापालिकांनी व्यापाऱ्यांवर थकबाकी वसुलीसाठी कारवाईचा बडगा उगारताच शासनाने व्याज व दंड माफीची अभयदान योजना लागू केली आहे. त्यानुसार ३१ जुलैपर्यंत व्यापाऱ्यांना विवरणपत्र व कर भरण्याची मुभा देण्यात आली आहे. मुदतीत जे व्यापारी पूर्ण कर भरतील, त्यांचा दंड व व्याज माफ होणार आहे. तोपर्यंत महापालिकेला अशा कोणत्याही थकबाकीदार व्यापाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांवर दाखविलेल्या कृपादृष्टीमुळे महापालिकेच्या अडचणीत भर पडली आहे. सांगली महापालिका हद्दीतील व्यापाऱ्यांकडे १७० कोटींची एलबीटी थकित असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. जकातीची शेवटची वसुली १०५ कोटी रुपये होती. त्यात दोन वर्षांची नैसर्गिक वाढ गृहीत धरून ती रक्कम १४५ कोटींच्या घरात जाते. यातील किमान १२० कोटी रुपये तरी महापालिकेच्या तिजोरीत जमा व्हावेत, अशी प्रशासनाची अपेक्षा होती. मार्च २०१५ पासून ३१ जुलै २०१५ पर्यंतचीही एलबीटी गृहीत धरता महापालिकेला १५० कोटी रुपये अपेक्षित होते. हीच स्थिती इतर महापालिकेचीही आहे. त्यासाठी सांगलीचे महापौर विवेक कांबळे यांनी पुढाकार घेत एलबीटीप्रश्नी राज्यातील सर्व महापौरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. सर्व महापौरांशी त्यांनी पत्रव्यवहार केला असून, काहीजणांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. पुढील आठवड्यात सर्व महापौरांना सांगलीत निमंत्रित करून बैठक घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. (प्रतिनिधी)न्यायालयात याचिकाएलबीटीप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई देण्याचा निर्धार महापौरांनी केला आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे वकील मकरंद आडकर यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांच्याकडून कायदेशीर मार्गदर्शनही मागविले आहे. येत्या दोन दिवसांत त्यांचा अभिप्राय प्राप्त होणार आहे. त्यानंतर महापौरांच्या बैठकीत याचिका दाखल करण्याबाबत शिक्कामोर्तब होईल, असे पालिका सूत्रांनी सांगितले.