शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

एलबीटीची लाखोंची उड्डाणे

By admin | Updated: October 1, 2015 22:46 IST

दुसऱ्या दिवशी कारवाई : व्यापाऱ्यांकडून १२.७१ लाख वसूल

सांगली : महापालिकेच्या एलबीटी विभागाने थकित कर वसुलीसाठी सलग दुसऱ्यादिवशी व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. सांगलीतील दोन व्यापाऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. या व्यापाऱ्यांनी १२.७१ लाख रुपयांचे धनादेश एलबीटी विभागाकडे जमा केले. अजूनही ३० व्यापारी एलबीटी विभागाच्या रडारवर असून ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे उपायुक्त सुनील नाईक व एलबीटी अधीक्षक रमेश वाघमारे यांनी सांगितले. महापालिका हद्दीत एलबीटी लागू झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन करीत बहिष्कार टाकला होता. गेल्या दोन वर्षात व्यापाऱ्यांकडे १०४ कोटी रुपयांची एलबीटी थकित आहे. राज्य शासनाच्या अभय योजनेत बऱ्याच व्यापाऱ्यांनी भाग घेतला. अजूनही दीड हजार व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे नोंदणी केलेली नाही. तसेच दोन ते अडीच हजार व्यापाऱ्यांनी एलबीटी विभागाकडे विवरणपत्र सादर केलेले नाही. एलबीटी वसुलीस प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप वारंवार होत होता. अखेर प्रशासनाने बुधवारपासून थकित व्यापाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. बुधवारी तीन व्यापाऱ्यांकडून बारा लाख वसूल करण्यात आले होते. गुरुवारी आणखी दोन व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. शंभर फुटी रस्त्यावरील साई मंदिरासमोरील वाय टू के फ्लेक्स या दुकानावर दुपारी महापालिकेचे पथक जप्तीसाठी दाखल झाले. या व्यापाऱ्याकडे नऊ लाख ७१ हजार रुपयांची थकबाकी होती. त्याने धनादेश देऊन कारवाई टाळली. टिंबर एरियातील राज एंटरप्रायझेस या व्यापाऱ्यावर तीन लाख रुपयांच्या थकबाकीपोटी कारवाई करण्यात आली. त्यानेही धनादेश दिले. महापालिकेने १५० व्यापाऱ्यांना जप्तीच्या नोटिसा बजाविल्या होत्या. त्यापैकी ३५ जणांनी कर भरण्यास प्रतिसाद दिलेला नाही. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून अजून ३० व्यापारी रडारवर आहेत. शनिवारी मिरजेतील व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. महापालिकेने दोन हजार व्यापाऱ्यांना विवरणपत्र सादर करण्याची नोटीस बजाविली आहे. त्याची मुदत आठवडाभरात संपणार असून त्यानंतर त्यांच्यावरही जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे नाईक व वाघमारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) कटू प्रसंग टाळा ! कृती समितीने एलबीटी भरण्यासाठी व्यापाऱ्यांना आवाहन केले होते. अजूनही अनेकांनी कर भरणा, विवरणपत्र सादर केलेली नाहीत. त्यांनी महापालिकेचे अधिकारी आपल्या दारात येण्यापूर्वी एलबीटी कार्यालयाशी संपर्क साधून कागदपत्रांची पूर्तता करावी व महापालिका- व्यापाऱ्यांतील कटू प्रसंग टाळावेत, असे आवाहन कृती समितीचे समीर शहा यांनी केले आहे.