शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

एलबीटीची लाखोंची उड्डाणे

By admin | Updated: October 1, 2015 22:46 IST

दुसऱ्या दिवशी कारवाई : व्यापाऱ्यांकडून १२.७१ लाख वसूल

सांगली : महापालिकेच्या एलबीटी विभागाने थकित कर वसुलीसाठी सलग दुसऱ्यादिवशी व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. सांगलीतील दोन व्यापाऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. या व्यापाऱ्यांनी १२.७१ लाख रुपयांचे धनादेश एलबीटी विभागाकडे जमा केले. अजूनही ३० व्यापारी एलबीटी विभागाच्या रडारवर असून ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे उपायुक्त सुनील नाईक व एलबीटी अधीक्षक रमेश वाघमारे यांनी सांगितले. महापालिका हद्दीत एलबीटी लागू झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन करीत बहिष्कार टाकला होता. गेल्या दोन वर्षात व्यापाऱ्यांकडे १०४ कोटी रुपयांची एलबीटी थकित आहे. राज्य शासनाच्या अभय योजनेत बऱ्याच व्यापाऱ्यांनी भाग घेतला. अजूनही दीड हजार व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे नोंदणी केलेली नाही. तसेच दोन ते अडीच हजार व्यापाऱ्यांनी एलबीटी विभागाकडे विवरणपत्र सादर केलेले नाही. एलबीटी वसुलीस प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप वारंवार होत होता. अखेर प्रशासनाने बुधवारपासून थकित व्यापाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. बुधवारी तीन व्यापाऱ्यांकडून बारा लाख वसूल करण्यात आले होते. गुरुवारी आणखी दोन व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. शंभर फुटी रस्त्यावरील साई मंदिरासमोरील वाय टू के फ्लेक्स या दुकानावर दुपारी महापालिकेचे पथक जप्तीसाठी दाखल झाले. या व्यापाऱ्याकडे नऊ लाख ७१ हजार रुपयांची थकबाकी होती. त्याने धनादेश देऊन कारवाई टाळली. टिंबर एरियातील राज एंटरप्रायझेस या व्यापाऱ्यावर तीन लाख रुपयांच्या थकबाकीपोटी कारवाई करण्यात आली. त्यानेही धनादेश दिले. महापालिकेने १५० व्यापाऱ्यांना जप्तीच्या नोटिसा बजाविल्या होत्या. त्यापैकी ३५ जणांनी कर भरण्यास प्रतिसाद दिलेला नाही. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून अजून ३० व्यापारी रडारवर आहेत. शनिवारी मिरजेतील व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. महापालिकेने दोन हजार व्यापाऱ्यांना विवरणपत्र सादर करण्याची नोटीस बजाविली आहे. त्याची मुदत आठवडाभरात संपणार असून त्यानंतर त्यांच्यावरही जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे नाईक व वाघमारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) कटू प्रसंग टाळा ! कृती समितीने एलबीटी भरण्यासाठी व्यापाऱ्यांना आवाहन केले होते. अजूनही अनेकांनी कर भरणा, विवरणपत्र सादर केलेली नाहीत. त्यांनी महापालिकेचे अधिकारी आपल्या दारात येण्यापूर्वी एलबीटी कार्यालयाशी संपर्क साधून कागदपत्रांची पूर्तता करावी व महापालिका- व्यापाऱ्यांतील कटू प्रसंग टाळावेत, असे आवाहन कृती समितीचे समीर शहा यांनी केले आहे.