शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीची लाखोंची उड्डाणे

By admin | Updated: October 1, 2015 22:46 IST

दुसऱ्या दिवशी कारवाई : व्यापाऱ्यांकडून १२.७१ लाख वसूल

सांगली : महापालिकेच्या एलबीटी विभागाने थकित कर वसुलीसाठी सलग दुसऱ्यादिवशी व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. सांगलीतील दोन व्यापाऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. या व्यापाऱ्यांनी १२.७१ लाख रुपयांचे धनादेश एलबीटी विभागाकडे जमा केले. अजूनही ३० व्यापारी एलबीटी विभागाच्या रडारवर असून ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे उपायुक्त सुनील नाईक व एलबीटी अधीक्षक रमेश वाघमारे यांनी सांगितले. महापालिका हद्दीत एलबीटी लागू झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन करीत बहिष्कार टाकला होता. गेल्या दोन वर्षात व्यापाऱ्यांकडे १०४ कोटी रुपयांची एलबीटी थकित आहे. राज्य शासनाच्या अभय योजनेत बऱ्याच व्यापाऱ्यांनी भाग घेतला. अजूनही दीड हजार व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे नोंदणी केलेली नाही. तसेच दोन ते अडीच हजार व्यापाऱ्यांनी एलबीटी विभागाकडे विवरणपत्र सादर केलेले नाही. एलबीटी वसुलीस प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप वारंवार होत होता. अखेर प्रशासनाने बुधवारपासून थकित व्यापाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. बुधवारी तीन व्यापाऱ्यांकडून बारा लाख वसूल करण्यात आले होते. गुरुवारी आणखी दोन व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. शंभर फुटी रस्त्यावरील साई मंदिरासमोरील वाय टू के फ्लेक्स या दुकानावर दुपारी महापालिकेचे पथक जप्तीसाठी दाखल झाले. या व्यापाऱ्याकडे नऊ लाख ७१ हजार रुपयांची थकबाकी होती. त्याने धनादेश देऊन कारवाई टाळली. टिंबर एरियातील राज एंटरप्रायझेस या व्यापाऱ्यावर तीन लाख रुपयांच्या थकबाकीपोटी कारवाई करण्यात आली. त्यानेही धनादेश दिले. महापालिकेने १५० व्यापाऱ्यांना जप्तीच्या नोटिसा बजाविल्या होत्या. त्यापैकी ३५ जणांनी कर भरण्यास प्रतिसाद दिलेला नाही. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून अजून ३० व्यापारी रडारवर आहेत. शनिवारी मिरजेतील व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. महापालिकेने दोन हजार व्यापाऱ्यांना विवरणपत्र सादर करण्याची नोटीस बजाविली आहे. त्याची मुदत आठवडाभरात संपणार असून त्यानंतर त्यांच्यावरही जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे नाईक व वाघमारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) कटू प्रसंग टाळा ! कृती समितीने एलबीटी भरण्यासाठी व्यापाऱ्यांना आवाहन केले होते. अजूनही अनेकांनी कर भरणा, विवरणपत्र सादर केलेली नाहीत. त्यांनी महापालिकेचे अधिकारी आपल्या दारात येण्यापूर्वी एलबीटी कार्यालयाशी संपर्क साधून कागदपत्रांची पूर्तता करावी व महापालिका- व्यापाऱ्यांतील कटू प्रसंग टाळावेत, असे आवाहन कृती समितीचे समीर शहा यांनी केले आहे.