शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

लातूर पाणीप्रश्नावर सकारात्मकतेचा सूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2016 00:23 IST

भाजप आक्रमक : राष्ट्रवादी, कॉँग्रेस नेत्यांकडूनही समर्थनाच्या भूमिकेमुळे विरोध करणारे एकाकी

सांगली : मिरजेतून लातूरला पाणी देण्याच्या निर्णयाला विरोध करणारे कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आता पक्षाच्या अधिकृत सकारात्मक भूमिकेमुळे एकाकी पडले आहेत. कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अण्णा डांगे यांनी लातूरला पाणी देण्याच्या निर्णयाचे समर्थन केल्याने आता सर्वच पक्ष, संघटना एकवटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यांची अवस्था लातूरपेक्षा भयानक असल्याने लातूरला मिरजेतून पाणी नेणारी रेल्वे रोखण्याचा इशारा काँग्रेस नेते सिध्दार्थ जाधव व अनिल आमटवणे यांनी बुधवारी दिला होता. राष्ट्रवादी शहराध्यक्ष साजीद पठाण व नगरसेवक मैनुद्दीन बागवान यांनीही यास विरोध केल्याने लातूरच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न पेटण्याची चिन्हे दिसत होती, मात्र पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी लातूरला पाणीपुरवठ्याच्या निर्णयास समर्थन दर्शविल्यामुळे स्थानिक नेत्यांची गोची झाली आहे. जिल्ह्यातील दुष्काळाकडे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केलेले दुर्लक्ष कॉँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांना अजूनही खटकले आहे. तरीही लातूरबाबत आता सर्वपक्षीय सकारात्मकतेचे चित्र निर्माण झाले आहे. रेल्वे अडवणे हे राष्ट्रवादीचे धोरण नाही : अण्णा डांगेसांगली जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळग्रस्त असून अनेक गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे, असे असताना मिरजेहून लातूरच्या जनतेसाठी रेल्वेने पाणी नेणे यास आमचा विरोध आहे, अशी माहिती माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी दिली. डांगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पाण्याची रेल्वे अडविण्याच्या मैनुद्दीन बागवान यांच्या विचाराशी आम्ही सहमत नाही. दुष्काळग्रस्तांना शक्य तितकी मदत काही जोखीम पत्करून करण्याची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची आहे. त्यांच्या विचाराला विसंगत अशी भूमिका बागवान घेत आहेत, हे योग्य नाही. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा मैनुद्दीन बागवान यांनी दौरा करावा. त्यांच्यासाठी तीव्र अंदोलन उभे करावे, त्यात आम्हीही सहभागी होवू. रेल्वेला भाजप कार्यकर्ते संरक्षण देणारमिरज : लातूरला पाणी न देण्याची दर्पोक्ती करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा भाजपने निषेध केला आहे. लातूरला पाणी घेऊन जाणाऱ्या रेल्वेला भाजप कार्यकर्ते संरक्षण देऊन पाणी पाठवतील, असे भाजप जिल्हा सरचिटणीस ओंकार शुक्ल यांनी निवेदनात म्हटले आहे. दुष्काळग्रस्तांशी काही देणे-घेणे नसल्याने केवळ राजकारण करायचे आहे. सत्तेत असताना पाणी दिले नाही आणि आता सत्तेत नसतानाही पाणी अडविण्याच्या भूमिकेमुळे जनतेला त्यांचा पाण्याबाबतच कळवळा कळला. पाणी देण्याच्या विरोधात भूमिका घेण्यापूर्वी लातूरच्या काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांशी चर्चा करा. लातूरला जाऊन पाणी टंचाईची भीषण परिस्थिती त्यांनी पाहिल्यास विरोधाची हिंमत होणार नाही.