शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

लातूरमध्ये २५ लाख लिटर पाण्याची कंपन्यांकडून चोरी

By admin | Updated: April 10, 2016 00:22 IST

भारत पाटणकर : बाटलीबंद पाण्याचे कारखाने कसे सुरू?

सांगली : लातूर जिल्ह्याला पिण्यासाठी तेरणासह तीन धरणांतून २५ लाख लिटर पाणी उचलले आहे. मात्र प्रत्यक्षात हे पाणी पिण्यासाठी नागरिकांपर्यंत पोहोचलेच नाही. बाटलीबंद पाण्याच्या कंपन्यांनी कारखान्यांसाठी ते अधिकाऱ्यांच्या मदतीने पळवले आहे, असा आरोप श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. लातूरमध्ये पाणीच नसेल, तर तेथे सध्या १६ बाटलीबंद पाण्याचे कारखाने कसे सुरू आहेत? ते कुठून पाणी उपलब्ध करीत आहेत? या प्रकरणाचा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शोध घेऊन कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून ते पाणी लातूर शहरातील नागरिकांना पिण्यासाठी द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ते म्हणाले की, लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई असल्याचे कळल्यानंतर तेथील कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली. लातूरमध्ये बाटलीबंद पाण्याचे १६ कारखाने आहेत. तेथे पाणी नाही म्हणून तेथील एकही कारखाना बंद नाही. हे कारखाने कुठून पाणी उपलब्ध करीत आहेत, याचा शोध शासनाने घेऊन तेथील पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. लातूर जिल्ह्याला निम्न तेरणा, मांजरा या धरणांतून आणि घोणसी, डोंगरकोनाळी या छोट्या प्रकल्पातून पाणी उपलब्ध होत आहे. या धरणांतील २५ लाख लिटर पाणी टँकरच्या माध्यमातून उचलले आहे. मात्र ते पाणी नागरिकांपर्यंत पिण्यासाठी पोहोचले नाही. हे पाणी कोठे गेले, याचा खडसेंनी शोध घेण्याची गरज आहे. आमच्या माहितीनुसार हे पाणी लातूर जिल्ह्यातील बाटलीबंद पाण्याच्या कारखानदारांनीच पळवले आहे. उपलब्ध पाण्याचे प्रशासन आणि सरकारने नियोजन न केल्यामुळेच तेथे पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. या प्रकरणाची शासनाने चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे, असे मत पाटणकर यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)