शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये २५ लाख लिटर पाण्याची कंपन्यांकडून चोरी

By admin | Updated: April 10, 2016 00:22 IST

भारत पाटणकर : बाटलीबंद पाण्याचे कारखाने कसे सुरू?

सांगली : लातूर जिल्ह्याला पिण्यासाठी तेरणासह तीन धरणांतून २५ लाख लिटर पाणी उचलले आहे. मात्र प्रत्यक्षात हे पाणी पिण्यासाठी नागरिकांपर्यंत पोहोचलेच नाही. बाटलीबंद पाण्याच्या कंपन्यांनी कारखान्यांसाठी ते अधिकाऱ्यांच्या मदतीने पळवले आहे, असा आरोप श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. लातूरमध्ये पाणीच नसेल, तर तेथे सध्या १६ बाटलीबंद पाण्याचे कारखाने कसे सुरू आहेत? ते कुठून पाणी उपलब्ध करीत आहेत? या प्रकरणाचा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शोध घेऊन कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून ते पाणी लातूर शहरातील नागरिकांना पिण्यासाठी द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ते म्हणाले की, लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई असल्याचे कळल्यानंतर तेथील कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली. लातूरमध्ये बाटलीबंद पाण्याचे १६ कारखाने आहेत. तेथे पाणी नाही म्हणून तेथील एकही कारखाना बंद नाही. हे कारखाने कुठून पाणी उपलब्ध करीत आहेत, याचा शोध शासनाने घेऊन तेथील पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. लातूर जिल्ह्याला निम्न तेरणा, मांजरा या धरणांतून आणि घोणसी, डोंगरकोनाळी या छोट्या प्रकल्पातून पाणी उपलब्ध होत आहे. या धरणांतील २५ लाख लिटर पाणी टँकरच्या माध्यमातून उचलले आहे. मात्र ते पाणी नागरिकांपर्यंत पिण्यासाठी पोहोचले नाही. हे पाणी कोठे गेले, याचा खडसेंनी शोध घेण्याची गरज आहे. आमच्या माहितीनुसार हे पाणी लातूर जिल्ह्यातील बाटलीबंद पाण्याच्या कारखानदारांनीच पळवले आहे. उपलब्ध पाण्याचे प्रशासन आणि सरकारने नियोजन न केल्यामुळेच तेथे पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. या प्रकरणाची शासनाने चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे, असे मत पाटणकर यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)