शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

लातूरमध्ये २५ लाख लिटर पाण्याची कंपन्यांकडून चोरी

By admin | Updated: April 10, 2016 00:22 IST

भारत पाटणकर : बाटलीबंद पाण्याचे कारखाने कसे सुरू?

सांगली : लातूर जिल्ह्याला पिण्यासाठी तेरणासह तीन धरणांतून २५ लाख लिटर पाणी उचलले आहे. मात्र प्रत्यक्षात हे पाणी पिण्यासाठी नागरिकांपर्यंत पोहोचलेच नाही. बाटलीबंद पाण्याच्या कंपन्यांनी कारखान्यांसाठी ते अधिकाऱ्यांच्या मदतीने पळवले आहे, असा आरोप श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. लातूरमध्ये पाणीच नसेल, तर तेथे सध्या १६ बाटलीबंद पाण्याचे कारखाने कसे सुरू आहेत? ते कुठून पाणी उपलब्ध करीत आहेत? या प्रकरणाचा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शोध घेऊन कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून ते पाणी लातूर शहरातील नागरिकांना पिण्यासाठी द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ते म्हणाले की, लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई असल्याचे कळल्यानंतर तेथील कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली. लातूरमध्ये बाटलीबंद पाण्याचे १६ कारखाने आहेत. तेथे पाणी नाही म्हणून तेथील एकही कारखाना बंद नाही. हे कारखाने कुठून पाणी उपलब्ध करीत आहेत, याचा शोध शासनाने घेऊन तेथील पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. लातूर जिल्ह्याला निम्न तेरणा, मांजरा या धरणांतून आणि घोणसी, डोंगरकोनाळी या छोट्या प्रकल्पातून पाणी उपलब्ध होत आहे. या धरणांतील २५ लाख लिटर पाणी टँकरच्या माध्यमातून उचलले आहे. मात्र ते पाणी नागरिकांपर्यंत पिण्यासाठी पोहोचले नाही. हे पाणी कोठे गेले, याचा खडसेंनी शोध घेण्याची गरज आहे. आमच्या माहितीनुसार हे पाणी लातूर जिल्ह्यातील बाटलीबंद पाण्याच्या कारखानदारांनीच पळवले आहे. उपलब्ध पाण्याचे प्रशासन आणि सरकारने नियोजन न केल्यामुळेच तेथे पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. या प्रकरणाची शासनाने चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे, असे मत पाटणकर यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)