शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

...अखेर सांगली जिल्हा झाला टँकरमुक्त

By admin | Updated: August 31, 2014 23:48 IST

पाणीसाठाही वाढला : सलग दोन वर्षाच्या दुष्काळानंतर मिळाला दिलासा-लोकमत विशेष

अंजर अथणीकर -सांगली -सलग दोन वर्षे दुष्काळाच्या छायेखाली असणाऱ्या सांगली जिल्ह्याला आॅगस्टमधील पावसाने मात्र दिलासा मिळाला आहे. दोन वर्षापासून सांगली जिल्ह्यात सुरु असलेले सर्व टँकर पहिल्यांदाच बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पाणीसाठाही आता ४० टक्क्याच्या वर गेला आहे. जुलै उजाडला तरी पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. जुलैमध्ये जिल्ह्यातील टँकरची संख्या तीसवर होती. जुलैनंतर चांगला पाऊस सुरु झाला. दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यातही मान्सूनपूर्व पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढली होती. तलावांतील पाणीसाठा संपून विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला होता. चांदोली, कोयना या धरणांमध्ये पाणीसाठा वीस टक्क्याच्या खाली गेला होता. आॅगस्टमध्ये झालेल्या दिलासादायक पावसामुळे दुष्काळ हटला आहे. वारणा धरण शंभर टक्के भरलेजिल्ह्यातील वारणा धरण आता शंभर टक्के भरले आहे. धरणामध्ये ३४.४० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणात ९६.१२ टीएमसी, धोममध्ये १२.४३ व कण्हेरमध्ये ९.८० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना ९१.३२, धोम ९२.११ व कण्हेर धरण ९७.०४ टक्के भरले आहे. जिल्ह्यातील तलावांमध्ये आता ७५ टक्क्यापर्यंत पाणीसाठा झाला आहे.दोन कोटीचा खर्चजत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर तसेच मिरज तालुक्यात यावर्षीही टँकर सुरु करण्यात आले होते. जिल्ह्यात पुन्हा एकदा चारा छावण्या सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली होती. जुलैनंतर पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात आॅगस्टमध्ये सरासरीच्या तुुलनेत १५२.२ टक्के इतका पाऊस झाला आहे. सरासरीमध्ये हा पाऊस ४५२.४ मि.मी. इतका आहे. विशेष म्हणजे हा पाऊस सर्वच तालुक्यात आहे. सांगली जिल्ह्यातील पाणीसाठाही ४० टक्क्याहून अधिक वाढला आहे. यामुळे ३० आॅगस्टपासून जिल्ह्यातील सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी जत तालुक्यात दोन व कवठेमहांकाळ तालुक्यात १ टँकर सुरु होता. उन्हाळ्यात १६२ टॅँकर सुरु करण्यात आले होते. सुमारे दोन कोटीहून अधिक रुपये टँकरवर खर्च करण्यात आले होते.