शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
3
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
4
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
5
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
6
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
7
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
9
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
10
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
11
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
12
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
13
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
14
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
15
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
16
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
17
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
19
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
20
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला

...अखेर सांगली जिल्हा झाला टँकरमुक्त

By admin | Updated: August 31, 2014 23:48 IST

पाणीसाठाही वाढला : सलग दोन वर्षाच्या दुष्काळानंतर मिळाला दिलासा-लोकमत विशेष

अंजर अथणीकर -सांगली -सलग दोन वर्षे दुष्काळाच्या छायेखाली असणाऱ्या सांगली जिल्ह्याला आॅगस्टमधील पावसाने मात्र दिलासा मिळाला आहे. दोन वर्षापासून सांगली जिल्ह्यात सुरु असलेले सर्व टँकर पहिल्यांदाच बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पाणीसाठाही आता ४० टक्क्याच्या वर गेला आहे. जुलै उजाडला तरी पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. जुलैमध्ये जिल्ह्यातील टँकरची संख्या तीसवर होती. जुलैनंतर चांगला पाऊस सुरु झाला. दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यातही मान्सूनपूर्व पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढली होती. तलावांतील पाणीसाठा संपून विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला होता. चांदोली, कोयना या धरणांमध्ये पाणीसाठा वीस टक्क्याच्या खाली गेला होता. आॅगस्टमध्ये झालेल्या दिलासादायक पावसामुळे दुष्काळ हटला आहे. वारणा धरण शंभर टक्के भरलेजिल्ह्यातील वारणा धरण आता शंभर टक्के भरले आहे. धरणामध्ये ३४.४० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणात ९६.१२ टीएमसी, धोममध्ये १२.४३ व कण्हेरमध्ये ९.८० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना ९१.३२, धोम ९२.११ व कण्हेर धरण ९७.०४ टक्के भरले आहे. जिल्ह्यातील तलावांमध्ये आता ७५ टक्क्यापर्यंत पाणीसाठा झाला आहे.दोन कोटीचा खर्चजत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर तसेच मिरज तालुक्यात यावर्षीही टँकर सुरु करण्यात आले होते. जिल्ह्यात पुन्हा एकदा चारा छावण्या सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली होती. जुलैनंतर पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात आॅगस्टमध्ये सरासरीच्या तुुलनेत १५२.२ टक्के इतका पाऊस झाला आहे. सरासरीमध्ये हा पाऊस ४५२.४ मि.मी. इतका आहे. विशेष म्हणजे हा पाऊस सर्वच तालुक्यात आहे. सांगली जिल्ह्यातील पाणीसाठाही ४० टक्क्याहून अधिक वाढला आहे. यामुळे ३० आॅगस्टपासून जिल्ह्यातील सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी जत तालुक्यात दोन व कवठेमहांकाळ तालुक्यात १ टँकर सुरु होता. उन्हाळ्यात १६२ टॅँकर सुरु करण्यात आले होते. सुमारे दोन कोटीहून अधिक रुपये टँकरवर खर्च करण्यात आले होते.