शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

गेल्यावर्षी म्हणत होते, येऊ नको, आता म्हणतात, ये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:29 IST

कोकरुड : ‘तू गावी येऊ नको. तुझ्यामुळे आम्हाला कोरोना होईल. गावात आले की, पंधरा दिवस शाळेत ठेवतात,’ असे परगावी ...

कोकरुड : ‘तू गावी येऊ नको. तुझ्यामुळे आम्हाला कोरोना होईल. गावात आले की, पंधरा दिवस शाळेत ठेवतात,’ असे परगावी असणाऱ्यांना निरोप देणारे नातेवाईक आता म्हणतात, ‘घरी लग्न कार्य आहे. त्यातच पेरणीचीही लगबग सुरू असल्याने गावी ये’, पण मात्र मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे यासारख्या मोठ्या शहरातील रुग्ण संख्या कमी होत असून, गावाकडे संख्या वाढतच चालली असल्याने पाठ फिरवणाऱ्यांची संख्या खूप आहे.

गेल्यावर्षी आलेल्या कोरोना साथीने जवळचे कोण आणि लांबचे कोण, हे दाखवून दिले. गेल्यावर्षी ‘गावी येऊ नको’ असे कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र सांगत होते. ‘तू गावी कोरोना घेऊन येशील. आलास तर गावातील शाळा, मंदिर, सभागृहात पंधरा दिवस कालावधी होईपर्यंत ठेवावे लागेल. आजारी पडलास तर सांगलीला घेऊन जातील. तू येऊच नकोस’, असे म्हणत होते. विलगीकरण कालावधी संपला तरी लोक दुरुनच बोलत होते.

मात्र यावर्षी शिराळा तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या गेल्यावर्षीच्या तिप्पट झाली आहे. पण कोरोना आजार नाही, असेच लोक वागत आहेत. भीती कमी झाल्याने नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर असलेल्या लोकांना साखरपुडा, लग्न, वास्तुशांती, वाढदिवस यासारख्या कार्यक्रमांना बोलावू लागले आहेत. काहीजण शेतीच्या कामाचे निमित्त सांगून बोलावत आहेत. मात्र मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे यासारख्या मोठ्या शहरातील रुग्ण संख्या कमी होत असून, गावाकडे संख्या वाढतच चालली असल्याने पाठ फिरवणाऱ्यांची संख्या खूप आहे.

गेल्यावर्षी नोकरी गेलेले, व्यवसाय बंद पडलेले, आर्थिक अडचणीत आलेले सर्वजण ‘आम्ही इकडे बरे आहोत. तुम्ही काळजी घेऊन कामे करा’, असे म्हणत येण्याचे टाळत आहेत.

शिराळा तालुक्यात गेल्यावर्षी पन्नास हजारापेक्षा जास्त लोक गावी येऊनही रुग्ण संख्या मर्यादित होती. यावर्षी जवळपास दहा हजाराच्यादरम्यान लोक गावी आले. त्यातील बहुतांश परत निघूनही गेले. मात्र ग्रामीण भागातील रुग्ण संख्या तिप्पट झाली आहे. त्यामुळे गाव नको शहर बरे म्हणण्याची वेळ आली आहे.