शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

तीन महिन्यात जिल्ह्यातील ४० गुन्ह्यांचा छडा!----लोकमत विशेष

By admin | Updated: October 6, 2014 22:39 IST

एलसीबीची कामगिरी : ४९ जणांना अटक; ६३ लाखांचा माल जप्त; फरारी दहा गुन्हेगारांना झाली अटक

सचिन लाड - सांगली - स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाने गुन्हेगारीला आळा घालण्यात व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यात बाजी मारली आहे. गेल्या तीन महिन्यात या विभागाने जिल्ह्यातील ४० गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये खून, दरोडा, घरफोडी, वाटमारी, चोरी अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. याप्रकरणी ४० जणांना अटक करुन ६३ लाखांचा माल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांना लाच मागितल्याप्रकरणी अटक झाल्याने या विभागास बदनामीचा डाग लागला होता. सहा महिन्यांपूर्वी हे प्रकरण घडले होते. कदम निलंबितही झाले. या जागेवर जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक निवास साळोखे यांची नियुक्ती केली होती. मात्र त्यांनीही केवळ महिनाभर काम पाहिले. त्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी नांदेडहून नव्याने आलेले निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्याकडे गुन्हे अन्वेषणची सूत्रे सोपविली. घनवट जिल्ह्यात प्रथमच आले होते. त्यांना गुन्हे अन्वेषणचा गाडा चालविण्याचे मोठे आव्हान होते. मात्र त्यांनी हे आव्हान जुन्या व अनुभवी कर्मचाऱ्यांच्या जोरावर लिलया पेलल्याचे दिसून येते. घनवट यांनी ४ जुलै २०१४ रोजी सूत्रे स्वीकारली. महिनाभर त्यांनी प्रलंबित व घडत असलेल्या गुन्ह्यांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी कामाचा धडाका लावला. इस्लामपुरात एका महिलेचा खून झाला होता. अत्यंत गुंतागुंतीच्या व आव्हानात्मक बनलेल्या या खुनाचा छडा त्यांनी अवघ्या चार दिवसात लावला. जतमधील सशस्त्र दरोड्याचा गुन्हाही उघडकीस आणला. जिल्ह्यात झालेल्या पाच मोठ्या घरफोड्या उघडकीस आणल्या. दुचाकी चोरट्यांना पकडण्याची सातत्याने कामगिरी होते. मात्र गेल्या काही दिवसात मोठी वाहने चोरणारी टोळीही सक्रिय झाल्याचे समजताच घनवट यांनी या टोळीला जेरबंद केले. त्यांच्याकडून पाच ट्रक व दोन मोटारी जप्त केल्या. वाळवा तालुक्यातील एकास रिव्हॉल्व्हरसह जेरबंद केले. बोगस सीम कार्डचे दहा गुन्हे दाखल करुन दहा जणांना अटक केली. त्यानंतर जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्यांनी बोगस सीम कार्डचे गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून फरारी असलेल्या दहा गुन्हेगारांना अटक केली. गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचाही पर्दाफाश केला. दुचाकी चोरांना केले ‘टार्गेट’पुण्यात बॉम्बस्फोट करण्यासाठी दुचाकीचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले होते. ही दुचाकी कऱ्हाडमधील एका पोलिसाची चोरल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे एटीएस पथकाने राज्यातील पोलिसांना दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून चोरट्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार घनवट यांच्या पथकाने चोरीतील २९ दुचाकी जप्त करुन चौघांना अटक केली. या दुचाकी सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातून चोरल्याचे उघडकीस आले होते. गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केल्याने हे ४० गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांचेही सातत्याने मार्गदर्शन मिळाले. - विश्वनाथ घनवट, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सांगली.