शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

इस्लामपूर शहराचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

सत्ताधाऱ्यांचा डाव : विरोधकांत वेगवेगळे मतप्रवाह

अशोक पाटील - इस्लामपूर -इस्लामपूर शहराचा नियोजित विकास आराखडा नगरविकास खात्याच्या मुख्य सचिवांकडे मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. सोयीस्कर विकास आराखडा करण्यात सत्ताधाऱ्यांना यश आल्याचे समजते, तर विरोधी नेत्यांत विकास आराखड्यासंदर्भात वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे दिसते.१९८0 नंतरच्या विकास आराखड्याला अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. यापूर्वी नगरपालिकेने घोषित केलेला विकास आराखडा अन्यायकारक असल्याने तो रद्द केला गेला. त्यानंतर शासनाने नियुक्त केलेल्या समितीने नियोजित विकास आराखडा तयार करुन अंतिम मंजुरीसाठी शासनदरबारी पाठविला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीचे नेते नियोजित विकास आराखडा जाहीर करण्याच्या तयारीत आहेत.दरम्यान, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील याबाबत म्हणाले की, हा विकास आराखडा नगरविकास खात्याकडून मंजूर होणार आहे. सत्ताधाऱ्यांनी शहरातील काही रस्ते स्वत:च्या फायद्यासाठी कमी केले आहेत, तर काही रस्त्यांची रुंदी वाढवली आहे. उपजिल्हा रुग्णालयासमोरील भूखंडातील रस्ता रद्द करून हा भूखंड कासेगाव शिक्षण संस्थेसाठी आरक्षित केला आहे. त्याबद्दलही आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. कत्तलखाना, सार्वजनिक शौचालय व स्मशानभूमीसाठी सर्वसामान्यांच्या खासगी जागा अन्याय करुन घेतल्या आहेत. त्यावरील आरक्षण आपण रद्द करण्याच्या प्रयत्नात आहोत.दुसरीकडे भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य बाबासाहेब सूर्यवंशी यांनी, हा विकास आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रद्द करणार असल्याचा दावा केला आहे. याबाबत खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.काँग्रेसचे माजी नगरसेवक वैभव पवार म्हणाले की, आराखडा मंजूर होण्याअगोदरच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. परंतु न्यायालयाने हा विकास आराखडा मंजूर झाल्यानंतरच आपण न्यायालयात यावे, अशा सूचना केल्याने, आपण सध्या शांत आहोत.विरोधी पक्षनेते विजय कुंभार म्हणाले की, हा विकास आराखडा अन्यायकारक आहे. सत्ताधाऱ्यांनी सभागृहात हा आराखडा बहुमताने मंजूर करून स्वत:चे भूखंड वाचविले आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे हा आराखडा मंजूर होण्याची शक्यता आहे.इस्लामपूर विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटलो आहोत. त्यांनी विकास आराखड्याविरोधात आपल्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. या आराखड्यासंदर्भात सर्व अभ्यास करूनच आपण निर्णय घेऊ. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष आहे.- राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना.महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे. विरोधकांनी विकास आराखड्यापेक्षा शहरातील विविध विकास कामांसाठी त्यांच्याकडून निधी उपलब्ध करावा. त्यांच्यामते विकास आराखडा रद्द होणार असेल, तर ते मत त्यांना लखलाभ असो! आराखडा मंजुरीबाबत आपल्याला काहीही माहिती नाही.- विजयभाऊ पाटील, पक्षप्रतोद, इस्लामपूर नगरपालिका.