शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

जलदूत एक्स्प्रेसला अखेरचा निरोप

By admin | Updated: August 8, 2016 23:38 IST

२६ कोटी लिटर पाणीपुरवठा : लिम्का बुकात नोंदीसाठी प्रयत्न करणार

मिरज : गेले चार महिने धावणाऱ्या व मिरजेतून लातूरला पाणी नेणाऱ्या जलदूत एक्स्प्रेसला सोमवारी अखेरचा निरोप देण्यात आला. आ. सुरेश खाडे यांच्याहस्ते व जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या उपस्थितीत ‘जलदूत’ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. रेल्वेने तब्बल १११ दिवस २६ कोटी लिटर पाणीपुरवठा करण्याचा जगातील पहिलाच प्रसंग आहे. याची लिम्का बुकात नोंद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी गायकवाड यांनी सांगितले. लातूर येथे तीव्र पाणी टंचाईमुळे मिरजेतून रेल्वेने लातूरला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. चार महिने दररोज जलदूत एक्स्प्रेसने लातूरला पाणीपुरवठा करण्यात आला. सोमवारी तिला अखेरचा निरोप देण्यात आला. आ. खाडे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.मजुरांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या सहकार्यामुळे रेल्वेने पाणी पुरवठ्याचा प्रयोग यशस्वी झाला. यापुढेही सण, उत्सव साजरे करताना, आपत्तीला तोंड देताना अशीच एकजूट दाखवावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी गायकवाड यांनी व्यक्त केली. ही संकल्पना मांडणारे भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद देशपांडे म्हणाले की, मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य शासन व रेल्वे प्रशासनाने समन्वयाची भूमिका घेतल्याने पाणीपुरवठा शक्य झाला. आ. सुरेश खाडे म्हणाले की, लातूरला पाणी देऊन मिरजकरांनी चांगले काम केले आहे. यामुळे मिरजेचा लौकिक वाढला आहे.यावेळी रेल्वे यांत्रिकी अभियंता प्रमोदकुमार, स्थानक अधीक्षक बुध्ददेव भगत, विनोद कुलकर्णी, गाडीचे चालक व्ही. एल. घटकरी, गार्ड बी. डी. सोनवणे, सहाय्यक चालक एन. व्ही. उरकुडकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस. के. सादलगे यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला. रेल्वे प्रवासी संघटनेचे सुकुमार पाटील, भाजपचे ओंकार शुक्ल, शीतल पाटोळे, संजय चौगुले, भैय्या कुलकर्णी, समेध ठाणेदार उपस्थित होते. रेल्वेचालक व्ही. एल. घटकरी यांनी, समारोपाच्या फेरीचे सारथ्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. (वार्ताहर)लातूर परिसरातील पावसामुळे निर्णय...मिरजेत रेल्वेच्या जलशुध्दीकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंत दोन किलोमीटर जलवाहिनी बसविण्यात आली. ११ एप्रिलपासून ५० टँकरच्या साहाय्याने दररोज २५ लाख लिटर पाणी लातूरला पाठविण्यात आले. मिरजेतून रेल्वेच्या पाणी योजनेतून दररोज ५० रेल्वे टँकर घेऊन जाणाऱ्या जलदूत एक्स्प्रेसने १११ फेऱ्यांत सुमारे २६ कोटी लिटर पाणी लातूरला पोहोचविले आहे. जून व जुलै महिन्यात पावसाळ्यातही लातूरला पाणीटंचाई असल्याने ‘जलदूत’ला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र गेल्या आठवड्यात लातूर परिसरात पाऊस झाल्याने जलदूत एक्स्प्रेस दि. ८ आॅगस्टपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.