शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या शोधात जमिनीची चाळण

By admin | Updated: March 14, 2017 23:49 IST

कवठेमहांकाळमधील स्थिती : कूपनलिका खुदाई जोरात; बागा जगविण्यासाठी धडपड

जालिंदर शिंदे ल्ल घाटनांद्रेगेल्या दोन-तीन वर्षात घाटमाथ्यावर पावसाने दडी मारल्यामुळे, त्यातच चालूवर्षी अगदी अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळी कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवठेमहांकाळ पूर्व भागातील घाटमाथ्यावर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची घटल्यामुळे पाणीटंचाईचे संकट उभे आहे. पाण्याच्या शोधात कूपनलिकांची खुदाई करताना जागोजागी जमिनीची चाळण होत असल्याचे चित्र आहे. डिसेंबरअखेरच घाटमाथ्यावरील पाझर तलाव, ओढे, बंधारे, नाले कोरडे ठणठणीत पडले आहेत. पाण्याचे तीव्र संकट निर्माण झाले आहे. या पट्ट्यात कुची वगळता कोठेही जलसिंचन योजनेचे काम झाले नसल्याने पाण्यासाठी कोणतेही स्रोत उपलब्ध नाही. परिणामी बळीराजा बागायती क्षेत्र जगविण्यासाठी कूपनलिकांच्या खुदाईकडे वळत आहे. त्यामुळे जमिनीची चाळण होऊ लागली आहे.कवठेमहांकाळ तालुक्यात भूगर्भातील पाण्याचा शोध घेताना शेतकऱ्यांना लाखो रुपये मोजत आहेत. तालुक्यात काही भागातच जलसिंचन योजनेची कामे झाली असून बराच भाग सिंचन योजनेपासून वंचित आहे. त्यामुळे तालुक्यात पाण्याच्या शोधासाठी सरासरी दररोज चार ते पाच ठिकाणी कूपनलिका घेतल्या जात आहेत. गेल्या दोन-तीन वर्षापासून तालुक्यात सरासरीपेक्षा अगदी कमी पाऊस झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी तलाव, ओढे, नाले, बंधारे काही ठिकाणी मृत अवस्थेत तर काही ठिकाणी कोरडे ठणठणीत आहेत. त्यामुळे घाटमाथ्यावरील भूगर्भातील पाणीसाठा संपुष्टात येऊ लागला आहे. त्यामुळ शेतकरी राजा पिके जगविण्यासाठी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी धडपड करु लागला आहे. त्यासाठी कूपनलिका खुदाईशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. भूगर्भातील पाण्याचा शोध घेताना ४०० ते ५५० फूटापर्यंत खुदाई करावी लगात आहे. त्यासाठी साधारणत: ३५ ते ४० हजार रुपये मोजावे लागत असून पाणी लागलेच तर ते पिकापर्यंत नेण्यासाठी पाईपलाईन, मोटर, केबल, पेटी यासाठी एक लाख रूपयापर्यंत खर्च करावा लागत आहे. एवढे खर्च करुन ही पाण्याचा उपभोग मिळेलच असे नाही. सध्या कवठेमहांकाळ तालुक्यात अनेक बोअरवेल गाड्या तळ ठोकून असून, बरेच आॅफिसेस थाटली आहेत. दररोज किमान पाच सहा बोअरवेल घेतले जात असून, त्यामुळे पर्यावरणासही धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.प्रतीक्षा टेंभूच्या पाण्याची कवठेमहांक़ाळ पूर्व भागातील घाटमाथ्यावरील गावांंना नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सततच्या दुष्काळामुळे परिसरातील विहिरींचे पाणी खालावले आहे. कूपनलिकांमधून पूर्वी १०० फुटावर मिळणारे पाणी आज ४०० ते ५०० फूट खोदूनही मिळत नाही. यामुळे स्थिती गंभीर आहे. घाटमाथ्यावरील ११ गावांसाठी टेंभू योजनेअंतर्गत घाटनांद्रे उपसा सिंचन योजना मंजूर होण्याची प्रतीक्षा असून, त्यानंतर कायस्वरुपी दुष्काळी पट्टा म्हणून भाळी लावलेला टिळा पुसला जाणार आहे. आजपर्यंत केवळ आश्वासनावर समाधान मानावे लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाही. केवळ राज्यकर्त्यांच्या आश्वासनांवर किती दिवस पाण्याची प्रतीक्षा करायची, असा प्रश्न आता येथील शेतकरी उपस्थित करीत आहेत.