शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

उद्यानासाठी वनीकरणकडून जमिनीचा शोध

By admin | Updated: February 6, 2015 00:38 IST

शासनाचा निर्णय : दहा तालुक्यांच्या १० गावांमध्ये उद्यानांची निर्मिती शक्य

अण्णा खोत - मालगाव -शासनाने राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या एका गावात ग्रामोद्यान उभारण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील दहा गावांत ही योजना राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत. सामाजिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी उद्यान निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या गावालगतच्या जमिनीचा शोध सुरू केला आहे. या योजनेमुळे गावाच्या सौंदर्यात भर पडणार आहेच, त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत व मुलांची खेळण्याची व ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याची सोय होणार आहे. ही योजना तीन वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे.शासनाने ग्राम जैवविविधता उद्यान निर्मिती योजनेअंतर्गत ज्या गावालगत शासकीय पडजमीन उपलब्ध आहे, अशा जमिनींचे उद्यान निर्मितीच्या माध्यमातून सौंदर्यीकरण करून विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, खानापूर, पलूस, कडेगाव, आटपाडी, शिराळा, वाळवा या नऊ तालुक्यातही ग्रामोद्यान योजना राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तालुक्यातून एकाच गावाची उद्यान निर्मितीसाठी निवड करण्यात येणार असल्याने ज्या गावाकडे गावालगत किमान एक एकर (४० आर) शासकीय पडजमीन आहे, अशा गावांचा सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध सुरु केला आहे. तीन वर्षाच्या कालावधित या उद्यानांची निर्मिती करावयाची आहे. एका गावातील उद्यान निर्मितीवर तीन वर्षात अंदाजे ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चातून जमिनीवर वृक्ष लागवड, नक्षत्र वनऔषधी वनस्पतीची लागवड करणे, स्थानिक जैवविविधता संवर्धन करणे, त्याचबरोबर उद्यानामध्ये ग्रंथालय व माहिती केंद्रही उभारण्याचे नियोजन आहे. उद्यान निर्मितीसाठी आवश्यक असणारी जमीन ज्या गावात उपलब्ध असेल, त्या गावांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. उद्यान निर्मितीमुळे गावच्या सौंदर्यात भर पडणार आहे.तीस लाखांचा निधीतीन वर्षाच्या कालावधित या उद्यानांची निर्मिती करावयाची आहे. एका गावातील उद्यान निर्मितीवर तीन वर्षात अंदाजे ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.या खर्चातून जमिनीवर वृक्ष लागवड, उद्यान निर्मिती करणे, लहान मुलांसाठी खेळणी उभी करणे व ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग पार्क, आराम करण्यासाठी विविध सुविधा देण्यात येणार आहेत.