शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

उद्यानासाठी वनीकरणकडून जमिनीचा शोध

By admin | Updated: February 6, 2015 00:38 IST

शासनाचा निर्णय : दहा तालुक्यांच्या १० गावांमध्ये उद्यानांची निर्मिती शक्य

अण्णा खोत - मालगाव -शासनाने राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या एका गावात ग्रामोद्यान उभारण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील दहा गावांत ही योजना राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत. सामाजिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी उद्यान निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या गावालगतच्या जमिनीचा शोध सुरू केला आहे. या योजनेमुळे गावाच्या सौंदर्यात भर पडणार आहेच, त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत व मुलांची खेळण्याची व ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याची सोय होणार आहे. ही योजना तीन वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे.शासनाने ग्राम जैवविविधता उद्यान निर्मिती योजनेअंतर्गत ज्या गावालगत शासकीय पडजमीन उपलब्ध आहे, अशा जमिनींचे उद्यान निर्मितीच्या माध्यमातून सौंदर्यीकरण करून विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, खानापूर, पलूस, कडेगाव, आटपाडी, शिराळा, वाळवा या नऊ तालुक्यातही ग्रामोद्यान योजना राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तालुक्यातून एकाच गावाची उद्यान निर्मितीसाठी निवड करण्यात येणार असल्याने ज्या गावाकडे गावालगत किमान एक एकर (४० आर) शासकीय पडजमीन आहे, अशा गावांचा सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध सुरु केला आहे. तीन वर्षाच्या कालावधित या उद्यानांची निर्मिती करावयाची आहे. एका गावातील उद्यान निर्मितीवर तीन वर्षात अंदाजे ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चातून जमिनीवर वृक्ष लागवड, नक्षत्र वनऔषधी वनस्पतीची लागवड करणे, स्थानिक जैवविविधता संवर्धन करणे, त्याचबरोबर उद्यानामध्ये ग्रंथालय व माहिती केंद्रही उभारण्याचे नियोजन आहे. उद्यान निर्मितीसाठी आवश्यक असणारी जमीन ज्या गावात उपलब्ध असेल, त्या गावांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. उद्यान निर्मितीमुळे गावच्या सौंदर्यात भर पडणार आहे.तीस लाखांचा निधीतीन वर्षाच्या कालावधित या उद्यानांची निर्मिती करावयाची आहे. एका गावातील उद्यान निर्मितीवर तीन वर्षात अंदाजे ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.या खर्चातून जमिनीवर वृक्ष लागवड, उद्यान निर्मिती करणे, लहान मुलांसाठी खेळणी उभी करणे व ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग पार्क, आराम करण्यासाठी विविध सुविधा देण्यात येणार आहेत.