शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या फॅसिझमविरोधात रस्त्यावर उतरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : देशात सत्तेवर असलेल्या प्रतिगाम्यांमध्ये मतांच्या आधारावर सरकार चालविण्याचे धाडस नाही. सर्व आघाड्यांवर आलेले अपयश झाकण्यासाठी विचारवंतांच्या हत्यांचे सत्र सुरु आहे. बेंगलोरमधील पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या ही ‘सरकारकडे कानाडोळा करा’ असे सांगणारी आहे. या फॅसिझमविरोधात जनतेने रस्त्यावर उतरायला हवे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गणेश देवी ...

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : देशात सत्तेवर असलेल्या प्रतिगाम्यांमध्ये मतांच्या आधारावर सरकार चालविण्याचे धाडस नाही. सर्व आघाड्यांवर आलेले अपयश झाकण्यासाठी विचारवंतांच्या हत्यांचे सत्र सुरु आहे. बेंगलोरमधील पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या ही ‘सरकारकडे कानाडोळा करा’ असे सांगणारी आहे. या फॅसिझमविरोधात जनतेने रस्त्यावर उतरायला हवे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गणेश देवी यांनी केले.येथील तहसील कचेरीजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बुधवारी सायंकाळी, गौरी लंकेश या महिला पत्रकाराच्या हत्येचा जाहीर निषेध अंधश्रध्दा निर्मूलन समितीसह इतर सर्व परिवर्तनवादी संघटनांनी केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘विवेकाचा आवाज बुलंद करुया’ अशा घोषणा दिल्या.डॉ. देवी म्हणाले की, गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कर्नाटकासह देशभरातून संवेदनशील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. ज्वालामुखीप्रमाणे हा असंतोष खदखदत आहे. विवेकाच्या लढाईतून हरवत चाललेले स्वातंत्र्य पुन्हा मिळविण्यासाठी देशभरात प्रचंड मोठी मानवी साखळी निर्माण करणे गरजेचे आहे.प्रा. विजय जोखे म्हणाले की, ज्या लोकांना स्वातंत्र्य, राज्यघटना आणि तिरंगा ध्वज नको होता, ज्यांना धर्माधीष्ठीत राज्य हवे होते, अशा शक्ती आज सत्तेवर आल्या आहेत. सध्या विचारवंतांच्या होत असलेल्या हत्यांचे मूळ हे या विचारधारेत दडले आहे. त्याचा सर्वांनी निषेध करायला हवा.प्रा. संजय थोरात म्हणाले, पत्रकार गौरी लंकेश बातमीतील वस्तुनिष्ठतेचा बळी ठरल्या आहेत. तक्षशीला ज्ञानकेंद्राचे अध्यक्ष प्रकाश कांबळे म्हणाले, या हत्यांमधून समाजाला भयभीत करुन हुकूमशाही लादण्याचा डाव उधळून टाकला पाहिजे.‘अंनिस’चे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे म्हणाले की, चार वर्षात चार विचारवंतांच्या झालेल्या हत्या वेदनादायी आहेत. माणसाला मारुन विचार संपत नाहीत. पुरोगामी कार्यकर्त्यांनी समाजव्यवस्था बदलण्याचा आग्रह धरताना, अशा घटनांचा सतत मौखिक निषेध नोंदवला पाहिजे. समाजमाध्यमांचा वापर करुन विवेकी आवाजाचा दबाव वाढविणे गरजेचे आहे.माजी प्राचार्य विश्वास सायनाकर म्हणाले की, व्यवस्थेचा खोटेपणा उघडा पडायला लागला की, ती व्यवस्था पिसाट बनते. आताच्या प्रतिगाम्यांची हीच अवस्था झाली आहे. हिंदुत्ववादाच्या वर्तनात वेडेपणा आला आहे. या वेडेपणाविरुध्द डॉ. दाभोलकर, पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि आता पत्रकार गौरी लंकेश हे उभे राहिल्याने त्यांच्या हत्या झाल्या. पुरोगामी विचारांनी धर्मवादी परंपरेला नेहमी धक्के दिले आहेत. गौरीवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे. या संघर्षामध्ये सर्वांनी एकजूट दाखवायला हवी.प्रा. सुभाष ढगे, रितेश अदलिंगे यांनीही या हत्यांचा निषेध केला. प्रा. सतीश चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एकनाथ पाटील यांनी आभार मानले. यावेळी कॉ. धनाजी गुरव, प्रा. शामराव पाटील, डॉ. नीलम शहा, रोझा किणीकर, डॉ. मंजुश्री पाटील, प्रा. एल. डी. पाटील, प्रा. विष्णू होनमोरे, एम. के. पाटील उपस्थित होते.तपासासाठी २८ नोव्हेंबरची मुदत; अन्यथा उपोषणपत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमधून फॅसिझमची भेडसावणारी सावली अधिक गडद होत चालली आहे. गौरीवरील हल्ला हा पत्रकारितेच्या लोकशाहीतील चौथ्या खांबाच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे. पूर्वनियोजित कट रचून ही भ्याड हत्या घडवून आणली गेली आहे. अशा खुनी मानसिकतेवर बंदी घालायला हवी. डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येसंदर्भातील तपास पूर्ण करण्यासाठी २८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत योग्य खुलासा न झाल्यास बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे डॉ. गणेश देवी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.श्रमिक पत्रकार संघातर्फे निषेधबेंगलोर येथील लंकेश पत्रिकेच्या संपादिका गौरी लंकेश यांच्यावर भ्याड हल्ला करुन त्यांची हत्या करणाºया संशयितांना कर्नाटक शासनाने तातडीने अटक करावी, अशी मागणी करीत वाळवा तालुका श्रमिक पत्रकार संघटनेच्या बैठकीत त्यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला.