शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

सरकारच्या फॅसिझमविरोधात रस्त्यावर उतरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : देशात सत्तेवर असलेल्या प्रतिगाम्यांमध्ये मतांच्या आधारावर सरकार चालविण्याचे धाडस नाही. सर्व आघाड्यांवर आलेले अपयश झाकण्यासाठी विचारवंतांच्या हत्यांचे सत्र सुरु आहे. बेंगलोरमधील पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या ही ‘सरकारकडे कानाडोळा करा’ असे सांगणारी आहे. या फॅसिझमविरोधात जनतेने रस्त्यावर उतरायला हवे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गणेश देवी ...

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : देशात सत्तेवर असलेल्या प्रतिगाम्यांमध्ये मतांच्या आधारावर सरकार चालविण्याचे धाडस नाही. सर्व आघाड्यांवर आलेले अपयश झाकण्यासाठी विचारवंतांच्या हत्यांचे सत्र सुरु आहे. बेंगलोरमधील पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या ही ‘सरकारकडे कानाडोळा करा’ असे सांगणारी आहे. या फॅसिझमविरोधात जनतेने रस्त्यावर उतरायला हवे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गणेश देवी यांनी केले.येथील तहसील कचेरीजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बुधवारी सायंकाळी, गौरी लंकेश या महिला पत्रकाराच्या हत्येचा जाहीर निषेध अंधश्रध्दा निर्मूलन समितीसह इतर सर्व परिवर्तनवादी संघटनांनी केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘विवेकाचा आवाज बुलंद करुया’ अशा घोषणा दिल्या.डॉ. देवी म्हणाले की, गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कर्नाटकासह देशभरातून संवेदनशील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. ज्वालामुखीप्रमाणे हा असंतोष खदखदत आहे. विवेकाच्या लढाईतून हरवत चाललेले स्वातंत्र्य पुन्हा मिळविण्यासाठी देशभरात प्रचंड मोठी मानवी साखळी निर्माण करणे गरजेचे आहे.प्रा. विजय जोखे म्हणाले की, ज्या लोकांना स्वातंत्र्य, राज्यघटना आणि तिरंगा ध्वज नको होता, ज्यांना धर्माधीष्ठीत राज्य हवे होते, अशा शक्ती आज सत्तेवर आल्या आहेत. सध्या विचारवंतांच्या होत असलेल्या हत्यांचे मूळ हे या विचारधारेत दडले आहे. त्याचा सर्वांनी निषेध करायला हवा.प्रा. संजय थोरात म्हणाले, पत्रकार गौरी लंकेश बातमीतील वस्तुनिष्ठतेचा बळी ठरल्या आहेत. तक्षशीला ज्ञानकेंद्राचे अध्यक्ष प्रकाश कांबळे म्हणाले, या हत्यांमधून समाजाला भयभीत करुन हुकूमशाही लादण्याचा डाव उधळून टाकला पाहिजे.‘अंनिस’चे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे म्हणाले की, चार वर्षात चार विचारवंतांच्या झालेल्या हत्या वेदनादायी आहेत. माणसाला मारुन विचार संपत नाहीत. पुरोगामी कार्यकर्त्यांनी समाजव्यवस्था बदलण्याचा आग्रह धरताना, अशा घटनांचा सतत मौखिक निषेध नोंदवला पाहिजे. समाजमाध्यमांचा वापर करुन विवेकी आवाजाचा दबाव वाढविणे गरजेचे आहे.माजी प्राचार्य विश्वास सायनाकर म्हणाले की, व्यवस्थेचा खोटेपणा उघडा पडायला लागला की, ती व्यवस्था पिसाट बनते. आताच्या प्रतिगाम्यांची हीच अवस्था झाली आहे. हिंदुत्ववादाच्या वर्तनात वेडेपणा आला आहे. या वेडेपणाविरुध्द डॉ. दाभोलकर, पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि आता पत्रकार गौरी लंकेश हे उभे राहिल्याने त्यांच्या हत्या झाल्या. पुरोगामी विचारांनी धर्मवादी परंपरेला नेहमी धक्के दिले आहेत. गौरीवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे. या संघर्षामध्ये सर्वांनी एकजूट दाखवायला हवी.प्रा. सुभाष ढगे, रितेश अदलिंगे यांनीही या हत्यांचा निषेध केला. प्रा. सतीश चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एकनाथ पाटील यांनी आभार मानले. यावेळी कॉ. धनाजी गुरव, प्रा. शामराव पाटील, डॉ. नीलम शहा, रोझा किणीकर, डॉ. मंजुश्री पाटील, प्रा. एल. डी. पाटील, प्रा. विष्णू होनमोरे, एम. के. पाटील उपस्थित होते.तपासासाठी २८ नोव्हेंबरची मुदत; अन्यथा उपोषणपत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमधून फॅसिझमची भेडसावणारी सावली अधिक गडद होत चालली आहे. गौरीवरील हल्ला हा पत्रकारितेच्या लोकशाहीतील चौथ्या खांबाच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे. पूर्वनियोजित कट रचून ही भ्याड हत्या घडवून आणली गेली आहे. अशा खुनी मानसिकतेवर बंदी घालायला हवी. डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येसंदर्भातील तपास पूर्ण करण्यासाठी २८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत योग्य खुलासा न झाल्यास बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे डॉ. गणेश देवी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.श्रमिक पत्रकार संघातर्फे निषेधबेंगलोर येथील लंकेश पत्रिकेच्या संपादिका गौरी लंकेश यांच्यावर भ्याड हल्ला करुन त्यांची हत्या करणाºया संशयितांना कर्नाटक शासनाने तातडीने अटक करावी, अशी मागणी करीत वाळवा तालुका श्रमिक पत्रकार संघटनेच्या बैठकीत त्यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला.