शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

धनगरवाड्यामध्ये जमिनीवरून वन विभाग, शेतकऱ्यांमध्ये संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:28 IST

वारणावती : दीडशे वर्षांपेक्षा जास्त म्हणजे देश स्वतंत्र व्हायच्या अगोदरपासून पणजोबा, खापरपणजोबा जी शेती कसून खात होते, तेवढीच ...

वारणावती : दीडशे वर्षांपेक्षा जास्त म्हणजे देश स्वतंत्र व्हायच्या अगोदरपासून पणजोबा, खापरपणजोबा जी शेती कसून खात होते, तेवढीच शेती आजही आम्ही कसून खात आहोत. ज्या शेतात वरी, नाचणी, कारेळा, भात यांची पेरणी केल्यानंतर वनविभाग तुमच्या नावावर जमीनच नसल्यामुळे पेरणी करू नका म्हणत आहे. यावरून शिराळा तालुक्यातील धनगरवाडा, विनोबाग्राम येथील शेतकरी आणि वनविभागाकडून सध्या वाद सुरू झाला आहे.

धनगरवाडा गावांमध्ये ५६ घरे आणि ४०० लोकसंख्या; तर विनोबा ग्राम १६ घरांचा आणि शंभर लोकांच्या वस्तीचा. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी म्हणजे पारतंत्र्यात असताना नेमिनाथ कत्ते गुरुजी यांनी बसविलेल्या या वस्त्या आहेत. या दोन्ही वस्त्या बफर झोनमध्ये येत असून मणदूर ग्रामपंचायतीला जोडल्या आहेत. विशेष म्हणजे ४२ वर्षांपासून या गावात मद्यप्राशन करणे आणि विक्रीस बंदी आहे. येथील लोक पूर्वी पासून तीनशे ते साडेतीनशे एकर शेतात नाचणा, वरी, भात, कारेळा यांसारखी पिके दरवर्षी घेत आहेत. यातून पोट भरत नसल्याने जांभळे, करवंदे, आळू यांसारखी फळे येथील महिला, पुरुष अनेक वर्षांपासून विकत आहेत. येथील शेतकरी दीडशे वर्षांपेक्षा जास्त दिवस झाले शेती करीत आहेत. ही वस्तुस्थिती असताना सध्या वनविभागाचे अधिकारी तेथील शेतकऱ्यांना ही तुमची जमीन नाही तर ती वनविभागाची आहे. यामुळे तुम्ही येथे शेती करू नये, अशी सूचना देत आहेत.

याबत महसूल विभागाने १९६७ मध्ये दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, १६६ एकर क्षेत्रांवर वनक्षेत्र राहणार नाही, म्हणजे ते क्षेत्र धनगरवाडा, विनोबाग्राम यांचे आहे. वनविभाग सांगते तुम्हाला ३४ एकरांपेक्षा (गट नंबर २२२ मधील) जास्त जमीन मिळणार नाही. त्यामुळे गट नंबर २२१ अ/ब/क मधील जमीन नेमकी कोणाची, हा वाद स्थानिक शेतकरी आणि वनविभाग यांच्यात गेल्या ८० वर्षांपेक्षा जास्त दिवस सुरू आहे. गावात घरे आहेत, लोक आहेत, जनावरे आहेत, शेती करीत आहेत, लोकांचे मतदान आहे. विविध प्रकारचे महसूल कर भरले जात आहेत. असे असताना वापरात असलेली जमीन तुमची नाही, असे वनविभाग सांगत असल्याने येथील शेतकऱ्यांच्या पायांखालची जमीन सरकली आहे. सध्या येथील शेतकऱ्यांना जमीन मिळवून देण्यासाठी मणदूर सरपंच वसंत पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत.

चौकट

गेल्या दीडशे वर्षांपासून धनगरवाडा, विनोबाग्राम येथील आम्ही पिढीजात शेतकरी तीनशे ते साडेतीनशे एकर जमीन कसत आहे. त्यात पिके घेत आहे. त्यामुळे सातबाराला नावे आहेत की नाहीत हे आम्हांला माहीत नसून वनविभागाने त्यांच्या जमिनीची मोजणी करून हद्द ठरवावी आणि आमच्या जमिनीत येऊ नये, अशी भूमिका धनगरवाडा येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे.