शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

धनगरवाड्यामध्ये जमिनीवरून वन विभाग, शेतकऱ्यांमध्ये संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:28 IST

वारणावती : दीडशे वर्षांपेक्षा जास्त म्हणजे देश स्वतंत्र व्हायच्या अगोदरपासून पणजोबा, खापरपणजोबा जी शेती कसून खात होते, तेवढीच ...

वारणावती : दीडशे वर्षांपेक्षा जास्त म्हणजे देश स्वतंत्र व्हायच्या अगोदरपासून पणजोबा, खापरपणजोबा जी शेती कसून खात होते, तेवढीच शेती आजही आम्ही कसून खात आहोत. ज्या शेतात वरी, नाचणी, कारेळा, भात यांची पेरणी केल्यानंतर वनविभाग तुमच्या नावावर जमीनच नसल्यामुळे पेरणी करू नका म्हणत आहे. यावरून शिराळा तालुक्यातील धनगरवाडा, विनोबाग्राम येथील शेतकरी आणि वनविभागाकडून सध्या वाद सुरू झाला आहे.

धनगरवाडा गावांमध्ये ५६ घरे आणि ४०० लोकसंख्या; तर विनोबा ग्राम १६ घरांचा आणि शंभर लोकांच्या वस्तीचा. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी म्हणजे पारतंत्र्यात असताना नेमिनाथ कत्ते गुरुजी यांनी बसविलेल्या या वस्त्या आहेत. या दोन्ही वस्त्या बफर झोनमध्ये येत असून मणदूर ग्रामपंचायतीला जोडल्या आहेत. विशेष म्हणजे ४२ वर्षांपासून या गावात मद्यप्राशन करणे आणि विक्रीस बंदी आहे. येथील लोक पूर्वी पासून तीनशे ते साडेतीनशे एकर शेतात नाचणा, वरी, भात, कारेळा यांसारखी पिके दरवर्षी घेत आहेत. यातून पोट भरत नसल्याने जांभळे, करवंदे, आळू यांसारखी फळे येथील महिला, पुरुष अनेक वर्षांपासून विकत आहेत. येथील शेतकरी दीडशे वर्षांपेक्षा जास्त दिवस झाले शेती करीत आहेत. ही वस्तुस्थिती असताना सध्या वनविभागाचे अधिकारी तेथील शेतकऱ्यांना ही तुमची जमीन नाही तर ती वनविभागाची आहे. यामुळे तुम्ही येथे शेती करू नये, अशी सूचना देत आहेत.

याबत महसूल विभागाने १९६७ मध्ये दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, १६६ एकर क्षेत्रांवर वनक्षेत्र राहणार नाही, म्हणजे ते क्षेत्र धनगरवाडा, विनोबाग्राम यांचे आहे. वनविभाग सांगते तुम्हाला ३४ एकरांपेक्षा (गट नंबर २२२ मधील) जास्त जमीन मिळणार नाही. त्यामुळे गट नंबर २२१ अ/ब/क मधील जमीन नेमकी कोणाची, हा वाद स्थानिक शेतकरी आणि वनविभाग यांच्यात गेल्या ८० वर्षांपेक्षा जास्त दिवस सुरू आहे. गावात घरे आहेत, लोक आहेत, जनावरे आहेत, शेती करीत आहेत, लोकांचे मतदान आहे. विविध प्रकारचे महसूल कर भरले जात आहेत. असे असताना वापरात असलेली जमीन तुमची नाही, असे वनविभाग सांगत असल्याने येथील शेतकऱ्यांच्या पायांखालची जमीन सरकली आहे. सध्या येथील शेतकऱ्यांना जमीन मिळवून देण्यासाठी मणदूर सरपंच वसंत पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत.

चौकट

गेल्या दीडशे वर्षांपासून धनगरवाडा, विनोबाग्राम येथील आम्ही पिढीजात शेतकरी तीनशे ते साडेतीनशे एकर जमीन कसत आहे. त्यात पिके घेत आहे. त्यामुळे सातबाराला नावे आहेत की नाहीत हे आम्हांला माहीत नसून वनविभागाने त्यांच्या जमिनीची मोजणी करून हद्द ठरवावी आणि आमच्या जमिनीत येऊ नये, अशी भूमिका धनगरवाडा येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे.