शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

‘स्वच्छ भारत’च्या दिखाव्यासाठी ३५ लाखांची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:24 IST

दत्ता पाटील । तासगाव : दोन वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत तब्बल ३५ लाखांचा चुराडा सुशोभिकरणाच्या नावाखाली करण्यात आला होता. ...

दत्ता पाटील ।तासगाव : दोन वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत तब्बल ३५ लाखांचा चुराडा सुशोभिकरणाच्या नावाखाली करण्यात आला होता.सांगली रस्त्यावर कापूर ओढ्यानजीक पालिकेने साडेपाच लाख रुपये खर्चून केलेले सुशोभिकरणाचे काम बेकायदेशीर असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे पालिकेच्या बेकायदा कामाचे कारनामे चव्हाट्यावर आले आहेत. जनतेच्या पैशाची बेकायदा कामांवर उधळपट्टी कशासाठी करण्यात आली, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.तासगाव शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी नगरपालिकेवर आहे. शहरात अतिक्रमणे होऊ नयेत, झालेली अतिक्रमणे काढण्याची जबाबदारी पालिकेवरच आहे. मात्र पालिकेकडून नागरिकांना नियमाची जाणीव करून देण्याऐवजी, नियम धाब्यावर बसवून काम सुरु असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. केवळ निमयांची पायमल्लीच नव्हे, तर शहरातील जनतेच्या हितासाठी मिळालेला लाखो रुपयांचा निधी बेकायदा कामांवर खर्च केला आहे.यापूर्वी लाखो रुपयांच्या बेकायदा कामाचे कारनामे चव्हाट्यावर आले होते. असाच एक बेकायदा कामाचा कारनामा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारवाईमुळे चव्हाट्यावर आला आहे.तासगाव ते सांगली रस्त्यावर कापूर ओढा पुलानजीक दोन वर्षापूर्वी रस्ता दुभाजकाच्या ठिकाणी सुशोभिकरण करण्यात आले होते. दोन्ही रस्त्यांच्या मधोमध बाजूला पेव्हिंग ब्लॉक बसवून मध्ये माती ओतण्यात आली होती. त्यावर शोभेची झाडे लावण्यात आली. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. या कामासाठी साडेपाच लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र हे काम करताना बांधकाम विभागाची परवानगी घेण्यात आली नाही.दोन वर्षे हे काम कायम होते. मात्र यावेळी पावसाळ्यात रस्त्याच्या बाजूने पाणी जाण्यासाठी गटारीची व्यवस्था नव्हती. पाऊस पडल्यानंतर रस्त्यालाच गटारींचे स्वरुप येत होते. त्यामुळे नागरिकांची तारांबळ होत होतीच किंंबहुना रस्ताही खराब झाला. पावसामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पालिकेने केलेले सुशोभिकरणाचे काम पूर्णपणे उखडून टाकले. या कामापासून पुढे काही अंतरावरदेखील सुशोभिकरण करण्यात आले आहे. हे काम काढून घेण्याबाबत बांधकाम विभागाकडून पालिकेला नोटीस बजावण्यात आली आहे. आठ दिवसांत हे काम काढले नाही, तर पुन्हा बांधकाम विभागाकडून हे काम काढून टाकण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या बेकायदा कामाचा कारनामा यानिमित्ताने चव्हाट्यावर आला असून जनतेच्या पैशाची बेकायदेशीर उधळण होत असल्यामुळे नागरिकांतून मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.बेलगाम कारभार; नियमांना फाटादोन वर्षांपूर्वी शहरात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मोहीम सुरु होती. या मोहिमेअंतर्गत पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी स्वच्छता आणि सुशोभिकरणाच्या नावाखाली तब्बल ३५ लाख रुपयांची उधळपट्टी केली. कोणतीही परवानगी नसताना, नियमांना फाटा देत पालिकेने केलेली कामे आता उखडून टाकली जात आहेत. इतकेच नव्हे, तर याच काळात निधी खर्ची पडलेल्या कामांचा मागमूसदेखील राहिला नाही. त्यामुळे जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाºया कारभाºयांचा कारभार बेलगाम असल्याचे चित्र दिसून येत आहे.