शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाळीव पशूंच्या संख्येत मोठी घट...

By admin | Updated: December 10, 2014 23:49 IST

पंचवार्षिक गणती : सात वर्षात गाई, म्हैशी, शेळ््या, मेंढ्यांची संख्या दोन लाखांनी घटली

सदानंद औंधे - मिरज -वाढते शहरीकरण, चाऱ्याची दरवाढ, कमी उत्पन्न, दुष्काळ, पाणीटंचाई यासह विविध कारणांमुळे जिल्ह्यात पशुपालकांची व पाळीव जनावरांची संख्या कमी होत आहे. जिल्ह्यातील पाळीव जनावरांच्या संख्येत गेल्या सात वर्षात मोठी घट झाली असून पशुसंवर्धन विभागाने केलेल्या पशुगणतीत गाई, म्हैशी, शेळ्या व मेंढ्यांच्या संख्येत दोन लाखांची घट झाली आहे. पशुसंवर्धन विभागातर्फे दर पाच वर्षांनी जिल्ह्यातील पाळीव जनावरांचे सर्वेक्षण करून त्यांची संख्या मोजण्यात येते. जिल्ह्यात यापूर्वी २००७ मध्ये पशुगणना करून त्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर २०१२ च्या पशुगणनेचे काम दोन वर्षांनी पूर्ण होऊन पशुगणनेची आकडेवारी तयार झाली आहे. २००७ मध्ये १ कोटी ५६ लाख १९९३ एवढ्या पाळीव प्राण्यांच्या संख्येत घट होऊन १ कोटी ३८ लाख २७१७ एवढी सध्याची पाळीव प्राण्यांची संख्या आहे. पोल्ट्री व्यावसायिक व पोल्ट्री कोंबड्यांच्या संख्येत तर मोठी घट झाल्याचे ताज्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. २६ लाख ४३ हजार असलेल्या पाळीव कोंबड्यांची संख्या आता केवळ ८ लाख ८७ हजार ८१० एवढी आहे. पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या संख्येत तब्बल तीन लाखाने कमी झाली आहे. पशुखाद्य व मजुरीचे वाढते दर, अंड्यांचा उत्पादन खर्च परवडत नसल्याने व बर्ड फ्लूच्या संकटाने पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांची संख्या कमी होत आहे. पाळीव कुत्र्यांची संख्याही २७ हजाराने, तर गाई व म्हैशींची संख्या ४० हजाराने कमी झाली आहे. पशुसंवर्धन विभागाने वर्षभर जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांमार्फत गणना केली आहे. वाढते शहरीकरण, चारा व पशुखाद्याची दरवाढ, पशुपालनापासून मिळणारे कमी उत्पन्न, पाणीटंचाई व शिक्षित व्यक्ती पशुपालनापासून दूर असल्याने पाळीव प्राण्यांची संख्या कमी होत असल्याचा अंदाज पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. महेश बनसोडे यांनी व्यक्त केला. आकडेवारीनुसार जिल्ह्यातील पशूंना आवश्यक वैद्यकीय सुविधा, लसीकरणासह विविध कामांचे नियोजन करण्यात येते. जिल्ह्यात ४ लाख ९२ हजार ६३३ म्हैशी व ३४ हजार २३४ रेड्यांची संख्या आहे. बैलांची संख्या ७९ हजार ३२६, तर गाई १ लाख ७० हजार ७३४ आहेत. गार्इंपैकी ३४ हजार ७६४ दूध देणाऱ्या, २७ हजार १६७ भाकड व ३०५५ वांझ आहेत. जर्सी गार्इंची संख्या १ लाख ६१ हजार ८०२ एवढी आहे.४घोडे, गाढवांची संख्या वाढलीसर्वच पाळीव प्राण्यांची संख्या घटत असताना, पाळीव घोडे व गाढवांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. घोड्यांच्या संख्येत केवळ तीनने वाढ झाली आहे, तर गाढवांची संख्या सहाशेने वाढली आहे. पाळीव बदकांच्या संख्येत कोणतीच वाढ झालेली नाही. सात वर्षातील आकडेजनावरे २00७ २0१२बैल, गाई ३,०८,०५२३,४१,५४७म्हैशी ५,३६,९९६४,९२,६३३मेंढ्या२,११,२२२ १,५७,३९०शेळ्या ४,०९,८६० ३,२४,६३२घोडे७६२ ७६५खेचर८२ ८०गाढवे ९७८ १,६७८डुकरे ५,९३५३,७५६कुत्री ८७,८१७६०,१३२ससे २८९१०४एकूण १५,६१,९९३१३,८२,७१७२00७ मध्ये देशी कोंबड्या व इतर पक्षी २६ लाख ८३ हजार १४३, तर पोल्ट्री कोंबड्या ५५ लाख ८२ हजार ८०९ होत्या. सात वर्षानंतर देशी कोंबड्या ८ लाख ८७ हजार ८१0, तर पोल्ट्री कोंबड्यांची संख्या २१ लाख ३९ हजार ५७२ वर गेली.