शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

जिल्ह्यात पाळीव पशूंच्या संख्येत मोठी घट...

By admin | Updated: December 10, 2014 23:49 IST

पंचवार्षिक गणती : सात वर्षात गाई, म्हैशी, शेळ््या, मेंढ्यांची संख्या दोन लाखांनी घटली

सदानंद औंधे - मिरज -वाढते शहरीकरण, चाऱ्याची दरवाढ, कमी उत्पन्न, दुष्काळ, पाणीटंचाई यासह विविध कारणांमुळे जिल्ह्यात पशुपालकांची व पाळीव जनावरांची संख्या कमी होत आहे. जिल्ह्यातील पाळीव जनावरांच्या संख्येत गेल्या सात वर्षात मोठी घट झाली असून पशुसंवर्धन विभागाने केलेल्या पशुगणतीत गाई, म्हैशी, शेळ्या व मेंढ्यांच्या संख्येत दोन लाखांची घट झाली आहे. पशुसंवर्धन विभागातर्फे दर पाच वर्षांनी जिल्ह्यातील पाळीव जनावरांचे सर्वेक्षण करून त्यांची संख्या मोजण्यात येते. जिल्ह्यात यापूर्वी २००७ मध्ये पशुगणना करून त्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर २०१२ च्या पशुगणनेचे काम दोन वर्षांनी पूर्ण होऊन पशुगणनेची आकडेवारी तयार झाली आहे. २००७ मध्ये १ कोटी ५६ लाख १९९३ एवढ्या पाळीव प्राण्यांच्या संख्येत घट होऊन १ कोटी ३८ लाख २७१७ एवढी सध्याची पाळीव प्राण्यांची संख्या आहे. पोल्ट्री व्यावसायिक व पोल्ट्री कोंबड्यांच्या संख्येत तर मोठी घट झाल्याचे ताज्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. २६ लाख ४३ हजार असलेल्या पाळीव कोंबड्यांची संख्या आता केवळ ८ लाख ८७ हजार ८१० एवढी आहे. पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या संख्येत तब्बल तीन लाखाने कमी झाली आहे. पशुखाद्य व मजुरीचे वाढते दर, अंड्यांचा उत्पादन खर्च परवडत नसल्याने व बर्ड फ्लूच्या संकटाने पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांची संख्या कमी होत आहे. पाळीव कुत्र्यांची संख्याही २७ हजाराने, तर गाई व म्हैशींची संख्या ४० हजाराने कमी झाली आहे. पशुसंवर्धन विभागाने वर्षभर जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांमार्फत गणना केली आहे. वाढते शहरीकरण, चारा व पशुखाद्याची दरवाढ, पशुपालनापासून मिळणारे कमी उत्पन्न, पाणीटंचाई व शिक्षित व्यक्ती पशुपालनापासून दूर असल्याने पाळीव प्राण्यांची संख्या कमी होत असल्याचा अंदाज पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. महेश बनसोडे यांनी व्यक्त केला. आकडेवारीनुसार जिल्ह्यातील पशूंना आवश्यक वैद्यकीय सुविधा, लसीकरणासह विविध कामांचे नियोजन करण्यात येते. जिल्ह्यात ४ लाख ९२ हजार ६३३ म्हैशी व ३४ हजार २३४ रेड्यांची संख्या आहे. बैलांची संख्या ७९ हजार ३२६, तर गाई १ लाख ७० हजार ७३४ आहेत. गार्इंपैकी ३४ हजार ७६४ दूध देणाऱ्या, २७ हजार १६७ भाकड व ३०५५ वांझ आहेत. जर्सी गार्इंची संख्या १ लाख ६१ हजार ८०२ एवढी आहे.४घोडे, गाढवांची संख्या वाढलीसर्वच पाळीव प्राण्यांची संख्या घटत असताना, पाळीव घोडे व गाढवांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. घोड्यांच्या संख्येत केवळ तीनने वाढ झाली आहे, तर गाढवांची संख्या सहाशेने वाढली आहे. पाळीव बदकांच्या संख्येत कोणतीच वाढ झालेली नाही. सात वर्षातील आकडेजनावरे २00७ २0१२बैल, गाई ३,०८,०५२३,४१,५४७म्हैशी ५,३६,९९६४,९२,६३३मेंढ्या२,११,२२२ १,५७,३९०शेळ्या ४,०९,८६० ३,२४,६३२घोडे७६२ ७६५खेचर८२ ८०गाढवे ९७८ १,६७८डुकरे ५,९३५३,७५६कुत्री ८७,८१७६०,१३२ससे २८९१०४एकूण १५,६१,९९३१३,८२,७१७२00७ मध्ये देशी कोंबड्या व इतर पक्षी २६ लाख ८३ हजार १४३, तर पोल्ट्री कोंबड्या ५५ लाख ८२ हजार ८०९ होत्या. सात वर्षानंतर देशी कोंबड्या ८ लाख ८७ हजार ८१0, तर पोल्ट्री कोंबड्यांची संख्या २१ लाख ३९ हजार ५७२ वर गेली.