शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

बालगंधर्व पुरस्कार वितरण सोहळ्यात सातत्याचा अभाव

By admin | Updated: November 9, 2014 23:27 IST

नाट्यरसिकांमध्ये नाराजी : निधी मिळूनही स्मारकाचे काम प्रलंबित

शरद जाधव - भिलवडी -नागठाणे, ता. पलूस येथील बालगंधर्व स्मारक समितीच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या नटसम्राट नाट्यरसिकांमध्ये नाराजी : निधी मिळूनही स्मारकाचे काम प्रलंबितबालगंधर्व पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सातत्याचा अभाव निर्माण झाला आहे. नागठाणे हे संगीतसूर्य नटसम्राट बालगंधर्वांचे जन्मगाव आहे. महाराष्ट्राच्या संगीत व नाट्यक्षेत्रामध्ये प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार वितरणाची परंपरा गेल्या तीन वर्षांपासून खंडित झाल्याने नाट्यरसिक व ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.नटसम्राट बालगंधर्वांची कर्मभूमी म्हणून पुणे सर्वपरिचित आहे. मात्र नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्वांची जन्मभूमी नागठाणे गाव तसे उपेक्षितच होते. त्यांचे बालपण व प्राथमिक शिक्षणही येथेच झाले. बालगंधर्वांनी ग्रामदैवत नागेश्वर मंदिराचा जीर्णोध्दारही के ला आहे. राजू कुलकर्णी या ध्येयवेड्यासह गावातील तरुणांनी बालगंधर्व स्मारक समितीची स्थापना केली. विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागठाणे गाव बालगंधर्वांची जन्मभूमी असल्याची नव्याने ओळख निर्माण केली. यामधूनच २००० पासून बालगंधर्व पुरस्कार वितरण सोहळा सुरू करण्यात आला. नाट्यअभिनय किंवा संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात येऊ लागला. प्रभाकर पणशीकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर, डॉ. श्रीराम लागू, यशवंत देव, चंद्रकांत गोखले, जगदीश खेबूडकर, दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी, सुरेश वाडकर या मान्यवरांना बालगंधर्व पुरस्कार प्रदान करण््यात आला. युवा बालगंधर्व पुरस्कार मकरंद अनासपुरे, अमृता सुभाष, पंढरीनाथ कांबळे, सिध्दार्थ जाधव, कविता लाड, भरत जाधव, अजय-अतुल यांना प्रदान करण्यात आला. बालगंधर्व पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख रक्कम, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे, तर युवा बालगंधर्व पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे.शासनाने गठित केलेल्या बालगंधर्व स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. पतंगराव कदम व सचिव सांगलीचे जिल्हाधिकारी आहेत. गावपातळीवरील बालगंधर्व स्मारक समितीचे अध्यक्ष, महाराष्ट्र युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, तर कार्याध्यक्ष शहाजी कापसे आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांंपासून सिनेअभिनेते अनुपम खेर आदींसारखे कित्येक मान्यवर पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने नागठाणे या बालगंधर्वांच्या जन्मभूमीमध्ये येऊन गेले. या पुरस्कार सोहळ्यामुळे आणि डॉ. पतंगराव कदम यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांची दखल घेत शासनाने स्मारकास ३ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. कृष्णा नदीकाठावर स्मारकाचे बांधकाम सुरू झाले. पायाभरणीच्या वर आलेले बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून रखडले आहे. पुरस्कार वितरणाची गेल्या तीन वर्षांपासून खंडित झालेली परंपरा डॉ. पतंगराव कदम व डॉ. विश्वजित कदम यांनी लक्ष घालून पूर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी नाट्यरसिक व ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.निधी चारा छावण्यांसाठी वर्गबालगंधर्व पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख रक्कम, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे, तर युवा बालगंधर्व पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. २०११ मध्ये दुष्काळामुळे पुरस्कार वितरणाचा निधी दुष्काळग्रस्त चारा छावण्यांना मदत निधीसाठी दिला, तर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते पतंगराव कदम व त्यांचा परिवार व्यस्त असल्याने पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर पडल्याची चर्चा आहे.