शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

बालगंधर्व पुरस्कार वितरण सोहळ्यात सातत्याचा अभाव

By admin | Updated: November 9, 2014 23:27 IST

नाट्यरसिकांमध्ये नाराजी : निधी मिळूनही स्मारकाचे काम प्रलंबित

शरद जाधव - भिलवडी -नागठाणे, ता. पलूस येथील बालगंधर्व स्मारक समितीच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या नटसम्राट नाट्यरसिकांमध्ये नाराजी : निधी मिळूनही स्मारकाचे काम प्रलंबितबालगंधर्व पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सातत्याचा अभाव निर्माण झाला आहे. नागठाणे हे संगीतसूर्य नटसम्राट बालगंधर्वांचे जन्मगाव आहे. महाराष्ट्राच्या संगीत व नाट्यक्षेत्रामध्ये प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार वितरणाची परंपरा गेल्या तीन वर्षांपासून खंडित झाल्याने नाट्यरसिक व ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.नटसम्राट बालगंधर्वांची कर्मभूमी म्हणून पुणे सर्वपरिचित आहे. मात्र नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्वांची जन्मभूमी नागठाणे गाव तसे उपेक्षितच होते. त्यांचे बालपण व प्राथमिक शिक्षणही येथेच झाले. बालगंधर्वांनी ग्रामदैवत नागेश्वर मंदिराचा जीर्णोध्दारही के ला आहे. राजू कुलकर्णी या ध्येयवेड्यासह गावातील तरुणांनी बालगंधर्व स्मारक समितीची स्थापना केली. विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागठाणे गाव बालगंधर्वांची जन्मभूमी असल्याची नव्याने ओळख निर्माण केली. यामधूनच २००० पासून बालगंधर्व पुरस्कार वितरण सोहळा सुरू करण्यात आला. नाट्यअभिनय किंवा संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात येऊ लागला. प्रभाकर पणशीकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर, डॉ. श्रीराम लागू, यशवंत देव, चंद्रकांत गोखले, जगदीश खेबूडकर, दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी, सुरेश वाडकर या मान्यवरांना बालगंधर्व पुरस्कार प्रदान करण््यात आला. युवा बालगंधर्व पुरस्कार मकरंद अनासपुरे, अमृता सुभाष, पंढरीनाथ कांबळे, सिध्दार्थ जाधव, कविता लाड, भरत जाधव, अजय-अतुल यांना प्रदान करण्यात आला. बालगंधर्व पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख रक्कम, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे, तर युवा बालगंधर्व पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे.शासनाने गठित केलेल्या बालगंधर्व स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. पतंगराव कदम व सचिव सांगलीचे जिल्हाधिकारी आहेत. गावपातळीवरील बालगंधर्व स्मारक समितीचे अध्यक्ष, महाराष्ट्र युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, तर कार्याध्यक्ष शहाजी कापसे आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांंपासून सिनेअभिनेते अनुपम खेर आदींसारखे कित्येक मान्यवर पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने नागठाणे या बालगंधर्वांच्या जन्मभूमीमध्ये येऊन गेले. या पुरस्कार सोहळ्यामुळे आणि डॉ. पतंगराव कदम यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांची दखल घेत शासनाने स्मारकास ३ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. कृष्णा नदीकाठावर स्मारकाचे बांधकाम सुरू झाले. पायाभरणीच्या वर आलेले बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून रखडले आहे. पुरस्कार वितरणाची गेल्या तीन वर्षांपासून खंडित झालेली परंपरा डॉ. पतंगराव कदम व डॉ. विश्वजित कदम यांनी लक्ष घालून पूर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी नाट्यरसिक व ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.निधी चारा छावण्यांसाठी वर्गबालगंधर्व पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख रक्कम, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे, तर युवा बालगंधर्व पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. २०११ मध्ये दुष्काळामुळे पुरस्कार वितरणाचा निधी दुष्काळग्रस्त चारा छावण्यांना मदत निधीसाठी दिला, तर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते पतंगराव कदम व त्यांचा परिवार व्यस्त असल्याने पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर पडल्याची चर्चा आहे.