शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

कडेगावात वाळू तस्करीमागे लागेबांधे

By admin | Updated: April 25, 2017 23:03 IST

प्रशासनाकडून जुजबी कारवाई : महसूल विभागाचा कानाडोळा, तालुक्यात संतापाची लाट

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील येरळा नदीतून कोट्यवधीच्या वाळूची चोरी होत असताना, महसूल प्रशासन जुजबी कारवाई करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे. वाळू माफियांशी असलेल्या महसूल प्रशासनाच्या लागेबांध्यांची जोरदार चर्चा नागरिकांतून सुरू आहे.वांगी, नेवरी, वडियेरायबाग, कान्हरवाडी, शिवणी, शेळकबाव येथील येरळा नदीपात्रात बेसुमार वाळू उपसा होत आहे. महसूलचे अधिकारी, कर्मचारी, मंडल अधिकारी, तलाठी हे केवळ जुजबी कारवाई करून वाळू तस्करांना पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. गेल्या काही दिवसात येरळा नदीपात्रातून लाखो रूपयांची वाळू चोरीस गेली. त्यामुळे वाळूपासून शासनाला मिळणारा महसूल तर बुडाला आहेच, शिवाय नदीपात्रात जागोजागी विहिरीपेक्षाही मोठे खड्डे पडले आहेत. याला जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.रात्रीच्या वेळी नदीपात्रातून वाळू उपसा सुरू असतो. वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या तस्करांशी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे लागेबांधे असल्यामुळे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नदीपात्रातील मोठा वाळूसाठा गायब झाला आहे. काहीवेळा वाळू तस्करांनी ‘डिमांड’ पूर्ण केली नाही तर कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून कारवाईचा फार्स केला जातो. मागील महिन्यात चोरीच्या वाळूची वाहतूक करणारे वाहन न पकडण्यासाठी लाच घेताना एका तलाठ्यास रंगेहात पकडले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले नाही, तर महसूलच्या या लागेबांध्यांमुळे आताच मुजोर असलेले वाळू तस्कर आणखी शिरजोर होतील. चोरीस गेलेल्या वाळूचा पंचनामा करून संबंधित वाळू तस्करांकडून रक्कम वसूल करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)छोटे मासे गळाला आणि मोठे मासे तळालायेरळा नदीपात्रात पोकलँड, जेसीबी यंत्राच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असतो. हायवा, डंपर, ट्रक अशा मोठ्या वाहनांतून वाळू वाहतूक करणारे मोठे वाळू तस्कर महसूल विभागाशी ‘हितसंबंध’ जोपासत राजरोसपणे वाळू उपसा व वाहतूक करीत आहेत. ‘डिमांड’ पूर्ण करू न शकणाऱ्या किरकोळ वाळूचोरांवर मात्र महसूलकडून कारवाईचा फार्स करून, यंत्रणा सतर्क असल्याचा आव आणला जात आहे. त्यामुळे छोटे मासे गळाला आणि मोठे मात्र तळाला, अशी अवस्था झाली आहे.तहसीलदारांना गाडी नाही कडेगावच्या तहसीलदार अचर्ना शेटे या वाळू तस्करांना चाप लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही वाळू वाहतूक करणारी वाहने त्यांनी पकडली आहेत .परंतु त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा पडत आहेत .त्यांना शासनाची गाडी नाही, त्यामुळे रात्रीच्यावेळी भाड्याची गाडी घेऊन कारवाईसाठी धावपळ करावी लागत आहे.