शहरं
Join us  
Trending Stories
1
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
4
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
5
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
6
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
7
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
10
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
11
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
12
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
13
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
14
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
15
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
16
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू

कडेगावात वाळू तस्करीमागे लागेबांधे

By admin | Updated: April 25, 2017 23:03 IST

प्रशासनाकडून जुजबी कारवाई : महसूल विभागाचा कानाडोळा, तालुक्यात संतापाची लाट

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील येरळा नदीतून कोट्यवधीच्या वाळूची चोरी होत असताना, महसूल प्रशासन जुजबी कारवाई करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे. वाळू माफियांशी असलेल्या महसूल प्रशासनाच्या लागेबांध्यांची जोरदार चर्चा नागरिकांतून सुरू आहे.वांगी, नेवरी, वडियेरायबाग, कान्हरवाडी, शिवणी, शेळकबाव येथील येरळा नदीपात्रात बेसुमार वाळू उपसा होत आहे. महसूलचे अधिकारी, कर्मचारी, मंडल अधिकारी, तलाठी हे केवळ जुजबी कारवाई करून वाळू तस्करांना पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. गेल्या काही दिवसात येरळा नदीपात्रातून लाखो रूपयांची वाळू चोरीस गेली. त्यामुळे वाळूपासून शासनाला मिळणारा महसूल तर बुडाला आहेच, शिवाय नदीपात्रात जागोजागी विहिरीपेक्षाही मोठे खड्डे पडले आहेत. याला जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.रात्रीच्या वेळी नदीपात्रातून वाळू उपसा सुरू असतो. वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या तस्करांशी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे लागेबांधे असल्यामुळे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नदीपात्रातील मोठा वाळूसाठा गायब झाला आहे. काहीवेळा वाळू तस्करांनी ‘डिमांड’ पूर्ण केली नाही तर कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून कारवाईचा फार्स केला जातो. मागील महिन्यात चोरीच्या वाळूची वाहतूक करणारे वाहन न पकडण्यासाठी लाच घेताना एका तलाठ्यास रंगेहात पकडले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले नाही, तर महसूलच्या या लागेबांध्यांमुळे आताच मुजोर असलेले वाळू तस्कर आणखी शिरजोर होतील. चोरीस गेलेल्या वाळूचा पंचनामा करून संबंधित वाळू तस्करांकडून रक्कम वसूल करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)छोटे मासे गळाला आणि मोठे मासे तळालायेरळा नदीपात्रात पोकलँड, जेसीबी यंत्राच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असतो. हायवा, डंपर, ट्रक अशा मोठ्या वाहनांतून वाळू वाहतूक करणारे मोठे वाळू तस्कर महसूल विभागाशी ‘हितसंबंध’ जोपासत राजरोसपणे वाळू उपसा व वाहतूक करीत आहेत. ‘डिमांड’ पूर्ण करू न शकणाऱ्या किरकोळ वाळूचोरांवर मात्र महसूलकडून कारवाईचा फार्स करून, यंत्रणा सतर्क असल्याचा आव आणला जात आहे. त्यामुळे छोटे मासे गळाला आणि मोठे मात्र तळाला, अशी अवस्था झाली आहे.तहसीलदारांना गाडी नाही कडेगावच्या तहसीलदार अचर्ना शेटे या वाळू तस्करांना चाप लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही वाळू वाहतूक करणारी वाहने त्यांनी पकडली आहेत .परंतु त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा पडत आहेत .त्यांना शासनाची गाडी नाही, त्यामुळे रात्रीच्यावेळी भाड्याची गाडी घेऊन कारवाईसाठी धावपळ करावी लागत आहे.