शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

नागनाथआण्णांमुळेच आटपाडी तालुक्यात कृष्णेचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:29 IST

आटपाडी : क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी, जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, डॉ. भारत पाटणकर यांच्यामुळेच दुष्काळी तालुक्यात कृष्णामाई अवतरल्याचे गौरवोद्‌गार ...

आटपाडी : क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी, जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, डॉ. भारत पाटणकर यांच्यामुळेच दुष्काळी तालुक्यात कृष्णामाई अवतरल्याचे गौरवोद्‌गार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आनंदराव पाटील यांनी काढले.

आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी येथील पुकळे वस्तीजवळच्या ओढ्यातील कृष्णामाईच्या वाहत्या पाण्याचे पूजनप्रसंगी आनंदराव पाटील बोलत होते. यावेळी आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती विजयसिंह पाटील, श्रीरंग कदम, सादिक खाटिक, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, तालुका सरचिटणीस विजय पुजारी, पाणी फौंडेशनचे गौरीहर पवार, प्रकाश बोराडे आदी उपस्थित होते.

आनंदराव पाटील म्हणाले, नागनाथअण्णा नायकवडी यांनी दुष्काळग्रस्तांना पाणी मिळावे, यासाठी तीव्र लढा दिला होता. अनेक मोर्चे, आंदोलने केल्यामुळेच आज आटपाडी तालुक्यात पाणी दिसत आहे. सध्या व्हीजन ७५ या संकल्पातून राज्याचे जलसंपदा मंत्री पाटील यांना अन्न, धान्य, फळे उत्पादनातून सांगली जिल्ह्याला देशात अग्रस्थानी न्यायचे आहे. या भागात आलेल्या कृष्णामाईच्या पाण्यातून शेतीत उत्तम दर्जाची पिके येणार आहेत. विजापूरला होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे जागतिक बाजार पेठे शेती उत्पादन उपलब्ध होणार आहे.

यावेळी यशवंतराव पुकळे, विठ्ठलराव पुकळे, भगवान दाईंगडे, प्रा . राहुल पुकळे, नाना दाईंगडे, संजय पुकळे, दत्तात्रय पुकळे, विठ्ठल पुकळे, चंद्रकांत ऐवळे, प्रणय लोकरे, सागर दाईंगडे, सागर राक्षे, पोपट चव्हाण, सदाशिव चव्हाण, मारुती मेटकरी , संजय मेटकरी , बाबूराव मेटकरी, बाळासोा डांगे गुरुजी, किसान पुकळे, बापू तळे, गंगाराम चव्हाण, दादासोा पुकळे उपस्थित होते.