शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

मालगावमध्ये आले कृष्णेचे पाणी!

By admin | Updated: April 2, 2015 00:45 IST

ग्रामस्थांचा जल्लोष : शुद्ध पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा संपली

मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथील चाळीस हजार लोकसंख्येच्या गावास गेली ३५ वर्षे लागलेली शुध्द पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा अखेर राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून कृष्णेचे पाणी गावात दाखल झाल्याने संपली आहे. साडेतीन वर्र्षांत पूर्ण झालेल्या योजनेतून पाणी सोडण्यात आले. गावात दाखल झालेल्या कृष्णेच्या पाण्याचे पूजन सरपंच महावीर रुकडे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केले.पस्तीस वर्षांपूर्वी २२ गावांसाठी आरग-बेडग ही प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. या योजनेत मालगावचा समावेश होता. मात्र ही योजना फार काळ टिकली नाही. पर्यायाने मालगावसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावाने पिण्याच्या पाण्यासाठी ३५ वर्षे हाल सोसले. गावाचा पिण्याच्या पाण्याचा भार कूपनलिकांवर होता. म्हैसाळ योजनेतून पाणी सोडले तरच या कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होत असे अन्यथा ग्रामस्थांना भटकंतीशिवाय पर्याय रहात नसे. प्रकाश उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश खोलकुंबे यांनी पाणी प्रश्न सुटावा, यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी शासनाने नव्याने राबविलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी शासनाकडे सुधारित प्रस्ताव दाखल केला. शासनाने ११ कोटी ३८ लाख रुपये खर्चाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेला मंजुरी दिली. सरपंच महावीर रुकडे, सदस्य विश्वास खांडेकर, विजय आवटी तसेच इतर पदाधिकारी, जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांनी सर्व अडथळे दूर केल्याने साडेतीन वर्षात ही योजना पूर्ण झाली आहे. या योजनेतून सोडण्यात आलेले कृष्णा नदीचे पाणी जलशुध्दीकरण टाकीत दाखल झाले आहे. या योजनेच्या पाण्याचे सरपंच रुकडे यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच वहिदा शेख, सदस्य विश्वास खांडेकर, जयहिंदचे अध्यक्ष विजय आवटी, विजय आवटी, रशिद मुजावर, शिवाजी माळी, पांडुरंग पाटील, रावसाहेब माने, राम चव्हाण उपस्थित होते. (वार्ताहर) या योजनेमुळे मालगावचा पाणीप्रश्न कायमचा सुटला आहे. या योजनेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. योजना सुरळीत चालावी, यासाठीही नियोजन करण्यात येणार असल्याचे सरपंच रुकडे यांनी सांगितले.