शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

मालगावमध्ये आले कृष्णेचे पाणी!

By admin | Updated: April 2, 2015 00:45 IST

ग्रामस्थांचा जल्लोष : शुद्ध पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा संपली

मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथील चाळीस हजार लोकसंख्येच्या गावास गेली ३५ वर्षे लागलेली शुध्द पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा अखेर राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून कृष्णेचे पाणी गावात दाखल झाल्याने संपली आहे. साडेतीन वर्र्षांत पूर्ण झालेल्या योजनेतून पाणी सोडण्यात आले. गावात दाखल झालेल्या कृष्णेच्या पाण्याचे पूजन सरपंच महावीर रुकडे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केले.पस्तीस वर्षांपूर्वी २२ गावांसाठी आरग-बेडग ही प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. या योजनेत मालगावचा समावेश होता. मात्र ही योजना फार काळ टिकली नाही. पर्यायाने मालगावसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावाने पिण्याच्या पाण्यासाठी ३५ वर्षे हाल सोसले. गावाचा पिण्याच्या पाण्याचा भार कूपनलिकांवर होता. म्हैसाळ योजनेतून पाणी सोडले तरच या कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होत असे अन्यथा ग्रामस्थांना भटकंतीशिवाय पर्याय रहात नसे. प्रकाश उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश खोलकुंबे यांनी पाणी प्रश्न सुटावा, यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी शासनाने नव्याने राबविलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी शासनाकडे सुधारित प्रस्ताव दाखल केला. शासनाने ११ कोटी ३८ लाख रुपये खर्चाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेला मंजुरी दिली. सरपंच महावीर रुकडे, सदस्य विश्वास खांडेकर, विजय आवटी तसेच इतर पदाधिकारी, जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांनी सर्व अडथळे दूर केल्याने साडेतीन वर्षात ही योजना पूर्ण झाली आहे. या योजनेतून सोडण्यात आलेले कृष्णा नदीचे पाणी जलशुध्दीकरण टाकीत दाखल झाले आहे. या योजनेच्या पाण्याचे सरपंच रुकडे यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच वहिदा शेख, सदस्य विश्वास खांडेकर, जयहिंदचे अध्यक्ष विजय आवटी, विजय आवटी, रशिद मुजावर, शिवाजी माळी, पांडुरंग पाटील, रावसाहेब माने, राम चव्हाण उपस्थित होते. (वार्ताहर) या योजनेमुळे मालगावचा पाणीप्रश्न कायमचा सुटला आहे. या योजनेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. योजना सुरळीत चालावी, यासाठीही नियोजन करण्यात येणार असल्याचे सरपंच रुकडे यांनी सांगितले.