शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

कृष्णा-कोयना उपसा सिंचन कार्यालय विदर्भात स्थलांतरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2016 00:56 IST

जलसंपदा विभागाचा निर्णय : आणखी दोन कार्यालये बंद होणार

मिरज : विदर्भात सिंचन व्यवस्थापनाची स्वतंत्र व सक्षम यंत्रणा निर्माण करण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत कृष्णा-कोयना उपसा सिंचन मंडल कार्यालय बंद करून, ते यवतमाळ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. कृष्णा खोरे प्रकल्पाची दोन मंडल कार्यालये विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे स्थलांतरित करण्यात येणार असल्याने, कृष्णा खोरे प्रकल्पाच्या सिंचन योजनांच्या व्यवस्थापनासाठी पाटबंधारे मंडळावर ताण पडणार आहे. जलसंपदा विभागाने दि. १० जून रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, नागपूर व अमरावती येथे सिंचन क्षमतेचा पूर्ण वापर होण्यासाठी सिंचन व्यवस्थापनासाठी स्वतंत्र व सक्षम यंत्रणेच्या निर्मितीसाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयांची फेररचना केली आहे. जलसंपदा विभागाकडे असलेल्या आस्थापनेत फिरवाफिरवी करून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरअंतर्गत दोन नवीन सिंचन व्यवस्थापन मंडळांची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी कृष्णा-कोयना उपसा सिंचन मंडळ, सांगली हे बांधकाम कार्य प्रकारातील मंडळ कार्यालय सिंचन व्यवस्थापन कार्य प्रकारात रूपांतरित करून यवतमाळ सिंचन मंडळ या नावाने कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे कृष्णा-कोयना उपसा सिंचन मंडळ कार्यालयाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेली संपूर्ण आस्थापना सांगली पाटबंधारे मंडळाच्या नियंत्रणाखाली वर्ग करण्यात आली आहे. कृष्णा-कोयना मंडळाची वर्ग एक व दोनची तांत्रिक आस्थापनाही यवतमाळ मंडलाकडे स्थलांतरित करण्यात आली आहे. कोयना बांधकाम मंडल हे बांधकाम कार्य प्रकारातील कार्यालय सिंचन व्यवस्थापन कार्य प्रकारात रूपांतरित करून सातारा सिंचन मंडळ या नावाने कार्यान्वित करण्यात आले आहे. कृष्णा खोरे प्रकल्पाची दोन मंडल कार्यालये बंद करून ती विदर्भात हलविण्यात येणार आहेत. राज्यातील आणखी तीस विभाग बंद करून विदर्भातील सिंचन व्यवस्थेसाठी स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. कृष्णा खोरे मंडळाकडील कार्यालये व विभाग बंद करून पाटबंधारे विभागाला जोडण्यात आल्याने पाटबंधारे विभागावर कामाचा मोठा ताण पडणार आहे. पाटबंधारे विभागाच्या उपविभागात अनेक पदे रिक्त असताना, बंद करण्यात आलेल्या कार्यालयांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. कृष्णा खोरे महामंडळांतर्गत टेंभू, ताकारी, म्हैसाळ सिंचन योजनांची कामे अपूर्ण असताना, येथील कार्यालये व कर्मचारी विदर्भात हलविण्यात आल्याने, सिंचन योजनांची कामे रखडण्याची चिन्हे आहेत. (वार्ताहर)