शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कृष्णा, वारणेच्या महापुराचा विळखा सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात कृष्णा व वारणा नदीच्या महापुराने गेल्या तीन दिवसांपासून घातलेला विळखा आता सैल होत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात कृष्णा व वारणा नदीच्या महापुराने गेल्या तीन दिवसांपासून घातलेला विळखा आता सैल होत आहे. जिल्ह्यात सर्वत्र शनिवारी पावसाने उघडीप दिली असून, धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोरही कमी झाला आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत शनिवारी रात्रीपासून घट सुरू झाली आहे.

शुक्रवारी मध्यरात्री पावसाचा जोर कमी झाला. त्यानंतर, शनिवारी दिवसभर उघडीप मिळाली. सहा दिवसांनी सूर्यदर्शन झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत चोवीस तासांत दहा फुटांची वाढ होऊन पुन्हा त्यात घट सुरू झाली. सांगली शहरात आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी रात्री ५२ फुटांवर जाऊन स्थिर झाली. बहे व ताकारीतील पाणीपातळीत दुपारी ३ नंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत १ फुटाने घट झाली होती. मात्र, भिलवडी व सांगलीतील पाणीपातळी रात्री उशिरापर्यंत स्थिर होती. पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या मते रविवारी सकाळपर्यंत सांगलीतील पाणीपातळीत घट होण्याची शक्यता आहे.

शनिवारी पावसाने उघडीप दिली असली, तरी शुक्रवारी झालेल्या पावसाचा व धरणांमधील विसर्गाचा परिणाम शनिवारी दिसून आला. शनिवारी कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत दिवसभर वाढ होत गेली. सायंकाळी पाचनंतर काही ठिकाणी कृष्णा व वारणा नदीच्या पाणीपातळीत घट होण्यास सुरुवात झाली. सांगली, अंकली व मिरजेपर्यंतच्या पाणीपातळीत रात्री उशिरापर्यंत घट झाली नव्हती. रविवारी सकाळपर्यंत काही फुटांनी पाणी उतरण्याची चिन्हे आहेत.

चाैकट

सांगलीचा कोल्हापूर, इस्लामपूरशी संपर्क तुटला

आयर्विन व बायपास या दोन्ही पुलांच्या उतारास पुराचे पाणी वाढल्याने सांगलीचा इस्लामपूरशी संपर्क तुटला. कोल्हापूर रस्त्यावर पाणी आल्यानंतर, तसेच अंकली येथील नाक्याजवळ पाणी आल्याने कोल्हापूरशी असलेला संपर्कही तुटला.

चौकट

जिल्ह्यातील ५७ मार्गांवरील वाहतूक बंद

जिल्ह्यात मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव या तालुक्यात नदीकाठी ठिकठिकाणच्या ५७ रस्त्यांवर पाणी आल्याने, त्या ठिकाणची वाहतूक बंद झाली. नदीकाठच्या गावांचा अन्य गावांशी असलेला संपर्कही तुटला. जिल्ह्यातील बऱ्याचशा मार्गावर पाणी असल्यामुळे एसटीसेवा बंद झाली.

चौकट

जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस मिमी (शनिवारी सकाळपर्यंत)

मिरज ५७.५

जत १.८

खानापूर-विटा ३२.९

वाळवा-इस्लामपूर १४०.९

तासगाव २७

आटपाडी ४.८

क. महांकाळ १४.२

पलूस ५९.१

कडेगाव ५२.८

(शिराळ्याचा पाऊस नोंदला नाही)

चौकट

धरणातील विसर्ग घटला

वारणा व कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर घटल्याने धरणातून विसर्ग घटला. शनिवारी रात्री कोयनेतून ३० हजार २४० तर वारणा धरणातून १६ हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा व कृष्णा नदीच्या पाणीपातळीत घट होत आहे. वारणा धरणाची क्षमता ३४.४० टीएमसी असून, सध्या येथील पाणीसाठा ३१.९९ इतका आहे. कोयनेतील पाणीसाठा ८७ टीएमसी झाला आहे.

चौकट

अलमट्टीमुळे दिलासा

कर्नाटकातील अलमट्टी धरणातून शनिवारी साडेतीन लाख क्युसेकने विसर्ग सुरू राहिल्याने, कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊ शकली नाही. अत्यंत मंदगतीने पाणी वाढत गेले. अलमट्टीतील विसर्ग अद्याप मोठा असल्याने येथील पाणी उतरण्यास मदत मिळणार आहे.