शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

कृष्णाकाठचा ढाण्या वाघ शांत झाला, बापू बिरू वाटेगावकरांचे दीर्घ आजाराने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 03:54 IST

जिवंतपणी दंतकथा बनून राहिलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील गावगुंडांच्या व खासगी सावकारीविरोधात चाळीस वर्षे रक्तरंजीत लढा देणा-या बापू बिरू वाटेगावकर यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले.

बोरगाव (जि. सांगली) : जिवंतपणी दंतकथा बनून राहिलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील गावगुंडांच्या व खासगी सावकारीविरोधात चाळीस वर्षे रक्तरंजीत लढा देणा-या बापू बिरू वाटेगावकर (रा. बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या (बुधवार) दुपारी एक वाजता कृष्णातीरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

नव्वदीनंतरही तब्येत ठणठणीत, वाणी खणखणीत असणा-या बापू बिरू यांच्यावर पुण्यात जुलैमध्ये सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यातच अन्ननलिकेच्या कर्करोगाने त्यांना ग्रासले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. ‘कृष्णाकाठचा ढाण्या वाघ’ अशी ओळख असणाºया बापू बिरूंचा जन्म १ जानेवारी १९२२ रोजी झाला. अन्यायाविरोधात पेटून उठून गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेले बापू बिरू गरिबांचा ‘रॉबिनहूड’ बनले होते. १९६५च्या दरम्यान बोरगावातील गावगुंडांनी थैमान घातले होते. त्यावेळी अतिशय गरीब परिस्थितीतून पहिलवानकी करणाºया बापू बिरूंनी हातात कुºहाड व बंदूक घेऊन बंड पुकारले. कृष्णाकाठी गोरगरिबांवर अन्याय करणारे खासगी सावकार, तसेच महिलांवर वाईट नजर ठेवणाºया, अत्याचार करणाºया गुंडांविरोधात त्यांनी आवाज उठवला. त्यांनी कित्येकांची कर्जे मुक्त केली. सावकारी पाशात अडकलेल्या जमिनी सोडवून दिल्या. अनेक महिलांचे संसार उभे केले.

‘बापू बिरू’ हे नाव कृष्णा खोºयात घेतले तर गुंड थरथर कापत. या सा-यातून त्यांच्यावर खुनाचे तब्बल १२ गुन्हे दाखल झाले होते. २५ वर्षे ते पोलिसांना गुंगारा देत होते. नंतर त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. खुनाच्या आरोपात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. पंधरा वर्षांपूर्वी पुण्याचा येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगून ते बाहेर आले होते. गावात परतल्यानंतर त्यांनी अध्यात्म आणि धनगर समाजाच्या कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. ‘आप्पा महाराज’ या टोपणनावाने ते परिचित होते. माळकरी असल्याने ते भजन, प्रवचनात रमले होते.त्यांच्या जीवन चरित्रावर अनेक पोवाडे, वगनाट्य, चित्रपट बनले आहेत. तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे यांचे ‘कृष्णाकाठचा फरारी’ हे वगनाट्य तुफान गाजले. शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी रचलेला आणि गायलेला पोवाडाही प्रसिद्ध झाला.परस्त्रीचे अपहरण करणाºया स्वत:च्या मुलालाही संपविलेपरस्त्रीकडे कोणीही वाईट नजरेने पहायचे नाही, हा बापू बिरूंचा दंडक होता. यासाठी वेळप्रसंगी त्यांनी कुºहाड आणि बंदूकही चालवली. त्यांचा थोरला मुलगा तानाजीने परस्त्रीचे अपहरण केल्यावर त्यालासुद्धा त्यांनी गोळी घालून ठार केले.