शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

कृष्णाकाठचा ढाण्या वाघ शांत झाला, बापू बिरू वाटेगावकरांचे दीर्घ आजाराने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 03:54 IST

जिवंतपणी दंतकथा बनून राहिलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील गावगुंडांच्या व खासगी सावकारीविरोधात चाळीस वर्षे रक्तरंजीत लढा देणा-या बापू बिरू वाटेगावकर यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले.

बोरगाव (जि. सांगली) : जिवंतपणी दंतकथा बनून राहिलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील गावगुंडांच्या व खासगी सावकारीविरोधात चाळीस वर्षे रक्तरंजीत लढा देणा-या बापू बिरू वाटेगावकर (रा. बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या (बुधवार) दुपारी एक वाजता कृष्णातीरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

नव्वदीनंतरही तब्येत ठणठणीत, वाणी खणखणीत असणा-या बापू बिरू यांच्यावर पुण्यात जुलैमध्ये सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यातच अन्ननलिकेच्या कर्करोगाने त्यांना ग्रासले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. ‘कृष्णाकाठचा ढाण्या वाघ’ अशी ओळख असणाºया बापू बिरूंचा जन्म १ जानेवारी १९२२ रोजी झाला. अन्यायाविरोधात पेटून उठून गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेले बापू बिरू गरिबांचा ‘रॉबिनहूड’ बनले होते. १९६५च्या दरम्यान बोरगावातील गावगुंडांनी थैमान घातले होते. त्यावेळी अतिशय गरीब परिस्थितीतून पहिलवानकी करणाºया बापू बिरूंनी हातात कुºहाड व बंदूक घेऊन बंड पुकारले. कृष्णाकाठी गोरगरिबांवर अन्याय करणारे खासगी सावकार, तसेच महिलांवर वाईट नजर ठेवणाºया, अत्याचार करणाºया गुंडांविरोधात त्यांनी आवाज उठवला. त्यांनी कित्येकांची कर्जे मुक्त केली. सावकारी पाशात अडकलेल्या जमिनी सोडवून दिल्या. अनेक महिलांचे संसार उभे केले.

‘बापू बिरू’ हे नाव कृष्णा खोºयात घेतले तर गुंड थरथर कापत. या सा-यातून त्यांच्यावर खुनाचे तब्बल १२ गुन्हे दाखल झाले होते. २५ वर्षे ते पोलिसांना गुंगारा देत होते. नंतर त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. खुनाच्या आरोपात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. पंधरा वर्षांपूर्वी पुण्याचा येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगून ते बाहेर आले होते. गावात परतल्यानंतर त्यांनी अध्यात्म आणि धनगर समाजाच्या कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. ‘आप्पा महाराज’ या टोपणनावाने ते परिचित होते. माळकरी असल्याने ते भजन, प्रवचनात रमले होते.त्यांच्या जीवन चरित्रावर अनेक पोवाडे, वगनाट्य, चित्रपट बनले आहेत. तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे यांचे ‘कृष्णाकाठचा फरारी’ हे वगनाट्य तुफान गाजले. शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी रचलेला आणि गायलेला पोवाडाही प्रसिद्ध झाला.परस्त्रीचे अपहरण करणाºया स्वत:च्या मुलालाही संपविलेपरस्त्रीकडे कोणीही वाईट नजरेने पहायचे नाही, हा बापू बिरूंचा दंडक होता. यासाठी वेळप्रसंगी त्यांनी कुºहाड आणि बंदूकही चालवली. त्यांचा थोरला मुलगा तानाजीने परस्त्रीचे अपहरण केल्यावर त्यालासुद्धा त्यांनी गोळी घालून ठार केले.