शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

कृष्णा आली होऽऽऽ अंगणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 23:47 IST

गार्डीत टेंभूच्या पाण्याचे स्वागत : महिलांनी भरली खणा-नारळाने ओटी

विटा : गेल्या दोन तपापासून प्रतीक्षा असलेल्या टेंभू योजनेचे पाणी अखेर बुधवारी दुष्काळी खानापूर तालुक्यातील गार्डी गावात पोहोचताच ग्रामस्थांनी जल्लोष केला. करंज ओढ्याच्या पात्रातमाता-भगिनींनी कृष्णामाईची खणा-नारळाने ओटी भरली. अबालवृध्दांनी मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटला. आ. अनिल बाबर यांच्या प्रयत्नातून गार्डी, घानवड व हिंगणगादे येथील शेतकऱ्यांचे स्वप्न साकार झाले आहे.दुष्काळी खानापूर तालुक्यात टेंभू योजनेच्या माध्यमातून कृष्णामाई अंगणी आली आहे. माहुली येथील टप्पा क्र. ३ ब मधून मुख्य कालव्याव्दारे टेंभूचे पाणी आणून करंज ओढ्यात सोडण्यात आले आहे. ओढ्यातील गार्डी, घानवड, हिंगणगादे हद्दीतील ३० बंधारे या पाण्याने भरणार आहेत. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न ऐन दुष्काळात संपुष्टात येणार आहे.या पाण्याचे बुधवारी सकाळी गार्डी येथे आगमन होताच ग्रामस्थांनी जल्लोषी स्वागत केले. गार्डी, घानवड व हिंगणगादे येथील गावकऱ्यांचे कृष्णेच्या पाण्याचे स्वप्न साकार झाल्याने आ. बाबर यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी व ‘नाथबाबांच्या नावानं चांगभलं’चा जयघोष करण्यात आला. करंज ओढ्यात महिलांनी कृष्णामाईची खणा-नारळाने ओटी भरली. त्यानंतर आ. बाबर यांच्यासह ग्रामस्थांनी पाण्याचे पूजन केले. कृष्णेचे पाणी पहिल्यांदाच ओढ्यात आल्याने अबालवृध्दांनी पाण्यात पोहण्याचा आनंद लुटला. (वार्ताहर) गुलालाची उधळण : चांगभलं!गार्डी येथे कृष्णामाईचे आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामदैवत ‘नाथबाबाच्या नावानं चांगभलं’ करीत जयघोष केला. गुलालाची प्रचंड उधळण झाल्याने गावातील रस्ते गुलालाने माखले होते. आ. बाबर यांच्या निवासस्थानात तर गुलालाचा खच पडला होता. आनंदोत्सव साजरा...गुढीपाडव्याला अजून नऊ दिवसाचा अवधी असला तरी, गार्डी गावात कृष्णामाईने प्रवेश केल्यानंतर ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले. गावात ग्रामस्थांनी बुधवारी गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला. ग्रामदैवत नाथबाबांना अभिषेकही घालण्यात आला.