शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

महापूर टाळण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:28 IST

सांगलीत देवेंद्र फडणवीस यांनी महापूरहानीची पाहणी केली. यावेळी प्रवीण दरेकर, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे आदी उपस्थित होते. लोकमत न्यूज ...

सांगलीत देवेंद्र फडणवीस यांनी महापूरहानीची पाहणी केली. यावेळी प्रवीण दरेकर, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पश्चिम महाराष्ट्रात वारंवार निर्माण होणारी महापूर स्थिती टाळण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण हाच पर्याय आहे. त्यावर सरकारने विचार करायला हवा, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांगलीत महापूर स्थितीच्या पाहणीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. वडनेरे समितीचा अहवाल शासनाने त्वरित स्वीकारला पाहिजे, असे ते म्हणाले.

यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, पृथ्वीराज देशमुख, प्राजक्ता कोरे, मकरंद देशपांडे, संग्रामसिंह देशमुख आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, २०१९ मध्ये कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प जागतिक बँकेपुढे मांडला होता, त्याला तत्त्वत: मान्यताही मिळाली होती. याद्वारे महापुराचे पाणी कालव्यांद्वारे मराठवाड्याकडे वळवता येईल. तेथील दुष्काळ हटेल. महापुराच्या अभ्यासासाठी नेमलेल्या वडनेरे समितीने पूर्ण अभ्यासाअंति अहवाल दिला होता, तो शासनाने स्वीकारला पाहिजे. शिफारशींची अंमलबजावणीही केली पाहिजे. त्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावा. पुरामुळे शेतकरी व व्यापारी उद्‌ध्वस्त झाले आहेत. शासनाने बहाणे न करता तातडीने मदत द्यावी.

ते म्हणाले की, सरकारने केंद्राकडे बोट दाखवणे बंद करावे. तौक्ते वादळात गुजरातमध्ये मोठी हानी झाल्याने तातडीची मदत द्यावी लागली. महाराष्ट्रालाही मिळेल. राज्य शासनाने जबाबदारी टाळू नये. आमच्या सरकारने केंद्राकडे बोटे दाखविली नव्हती.

सांगलीतील महापूर जलसंपदाच्या चुकीमुळेच गंभीर झाला. त्यांनी सांगितलेल्या पातळीपर्यंत लोक निर्धास्त राहिले, प्रत्यक्षात पातळी जास्त झाली, त्यामुळे नुकसानीची तीव्रताही वाढली.

चौकट

गेल्या महापुरात मदत वाटपात गैरव्यवहार नाही

फडणवीस म्हणाले की, २०१९ च्या महापुरात आमच्या सरकारने तातडीची मदत दिली. त्यामध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. मदत वाटपाचे लेखापरीक्षण होते, त्यातही गैरव्यवहार दिसलेला नाही. सध्याचे सरकार फक्त बहाणे करत आहे.

चौकट

जयंत पाटील यांना आरोग्य चिंतितो

जयंत पाटील यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून समजली. त्यांची प्रकृती बरी व्हावी, त्यांना आरोग्य चिंतितो, अशा शुभेच्छा फडणवीस यांनी दिल्या.