शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महापूर टाळण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:28 IST

सांगलीत देवेंद्र फडणवीस यांनी महापूरहानीची पाहणी केली. यावेळी प्रवीण दरेकर, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे आदी उपस्थित होते. लोकमत न्यूज ...

सांगलीत देवेंद्र फडणवीस यांनी महापूरहानीची पाहणी केली. यावेळी प्रवीण दरेकर, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पश्चिम महाराष्ट्रात वारंवार निर्माण होणारी महापूर स्थिती टाळण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण हाच पर्याय आहे. त्यावर सरकारने विचार करायला हवा, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांगलीत महापूर स्थितीच्या पाहणीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. वडनेरे समितीचा अहवाल शासनाने त्वरित स्वीकारला पाहिजे, असे ते म्हणाले.

यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, पृथ्वीराज देशमुख, प्राजक्ता कोरे, मकरंद देशपांडे, संग्रामसिंह देशमुख आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, २०१९ मध्ये कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प जागतिक बँकेपुढे मांडला होता, त्याला तत्त्वत: मान्यताही मिळाली होती. याद्वारे महापुराचे पाणी कालव्यांद्वारे मराठवाड्याकडे वळवता येईल. तेथील दुष्काळ हटेल. महापुराच्या अभ्यासासाठी नेमलेल्या वडनेरे समितीने पूर्ण अभ्यासाअंति अहवाल दिला होता, तो शासनाने स्वीकारला पाहिजे. शिफारशींची अंमलबजावणीही केली पाहिजे. त्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावा. पुरामुळे शेतकरी व व्यापारी उद्‌ध्वस्त झाले आहेत. शासनाने बहाणे न करता तातडीने मदत द्यावी.

ते म्हणाले की, सरकारने केंद्राकडे बोट दाखवणे बंद करावे. तौक्ते वादळात गुजरातमध्ये मोठी हानी झाल्याने तातडीची मदत द्यावी लागली. महाराष्ट्रालाही मिळेल. राज्य शासनाने जबाबदारी टाळू नये. आमच्या सरकारने केंद्राकडे बोटे दाखविली नव्हती.

सांगलीतील महापूर जलसंपदाच्या चुकीमुळेच गंभीर झाला. त्यांनी सांगितलेल्या पातळीपर्यंत लोक निर्धास्त राहिले, प्रत्यक्षात पातळी जास्त झाली, त्यामुळे नुकसानीची तीव्रताही वाढली.

चौकट

गेल्या महापुरात मदत वाटपात गैरव्यवहार नाही

फडणवीस म्हणाले की, २०१९ च्या महापुरात आमच्या सरकारने तातडीची मदत दिली. त्यामध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. मदत वाटपाचे लेखापरीक्षण होते, त्यातही गैरव्यवहार दिसलेला नाही. सध्याचे सरकार फक्त बहाणे करत आहे.

चौकट

जयंत पाटील यांना आरोग्य चिंतितो

जयंत पाटील यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून समजली. त्यांची प्रकृती बरी व्हावी, त्यांना आरोग्य चिंतितो, अशा शुभेच्छा फडणवीस यांनी दिल्या.