शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

विट्यात ‘कृषी’ची औषधे नष्ट

By admin | Updated: January 2, 2017 23:29 IST

विट्यात कारवाई : शासनाचा पैसा पाण्यात; संतप्त प्रतिक्रिया

विटा : राज्य शासनाकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोफत देण्यासाठी आलेली लाखो रुपयांची कृषी औषधे तालुका कृषी विभागाकडून विट्यात जाळून टाकून नष्ट करण्यात आली. ही औषधे मुदतबाह्य असल्याने नष्ट करण्यात आल्याचा खुलासा तालुका कृषी कार्यालयातून सोमवारी करण्यात आला असला तरी, ती मुदतबाह्य कशी झाली? मुदतबाह्य होण्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांना या औषधांचे वाटप का झाले नाही? या प्रश्नांचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही. या प्रकाराने शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.खानापूर तालुका कृषी विभागाचे गोदाम विटा ते कुंडल रस्त्यालगत जुन्या कार्यालयाजवळ आहे. गोदामात शासनाकडून शेतकऱ्यांना मोफत देण्यासाठी कीटकनाशक, तृणनाशक आणि विविध बियाणांचा साठा करण्यात आला आहे. काही वर्षांपासून कृषी औषधांचा साठा पडून होता. दोन दिवसांपूर्वी या औषधांच्या अनेक बाटल्या फुटल्याने व काही बाटल्यांना गळती लागल्याने कर्मचाऱ्यांनी ती गोदामाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या ओघळीत टाकून दिली.मात्र, नागरिकांचे लक्ष गेल्यानंतर या प्लॅस्टिक बाटल्या कर्मचाऱ्यांनी थेट जाळून टाकल्या. शनिवारी आत्मा संस्थेच्यावतीने गोदामाजवळ शेतकऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळी काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शिवाजी शिंदे यांना याची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकारामुळे शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.शासन दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी विविध योजनेतून कीटकनाशक, तृणनाशक, बियाणे यासह विविध कृषी अवजारांचे वाटप करीत असताना, कृषी विभागाकडून या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. मुदतबाह्य झाल्याने व दुर्गंधी येत असल्याने ही औषधे नष्ट केल्याचे तालुका कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. मुदतबाह्य होईपर्यंत ही औषधे गोदामात साठवून का ठेवण्यात आली? लाभार्थी शेतकऱ्यांना त्याचे वाटप का झाले नाही? शासनाचे लाखो रुपये पाण्यात घालण्यास जबाबदार कोण? यासह विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले असून, संबंधितांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)औषधे मुदतबाह्य : कारवाईची मागणीशासनाकडून साहित्य मिळत नसल्याचे सांगून दुष्काळी शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लाखो रुपयांची औषधे मुदतबाह्य झाली. औषधे जाळून नष्ट करण्याच्या प्रकाराची सखोल चौकशी करावी व दोषींवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शिवाजी शिंदे यांनी दिला.दुर्गंधी येऊ लागल्याने औषधे नष्टतालुका कृषी अधिकारी चंद्रकांत डुबल याबाबत म्हणाले की, ही औषधे मुदतबाह्य झाली होती. गेल्या पाच ते सात वर्षांपासून औषधे गोदामात पडून होती. परिणामी, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येऊ लागल्याने ती नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. गोदामात अजूनही कृषी विभागाकडील दुर्गंधीयुक्त व मुदतबाह्य औषधांचा साठा आहे. परंतु, सध्या ती नष्ट करण्याचे काम थांबविण्यात आले आहे.