शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

विट्यात ‘कृषी’ची औषधे नष्ट

By admin | Updated: January 2, 2017 23:29 IST

विट्यात कारवाई : शासनाचा पैसा पाण्यात; संतप्त प्रतिक्रिया

विटा : राज्य शासनाकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोफत देण्यासाठी आलेली लाखो रुपयांची कृषी औषधे तालुका कृषी विभागाकडून विट्यात जाळून टाकून नष्ट करण्यात आली. ही औषधे मुदतबाह्य असल्याने नष्ट करण्यात आल्याचा खुलासा तालुका कृषी कार्यालयातून सोमवारी करण्यात आला असला तरी, ती मुदतबाह्य कशी झाली? मुदतबाह्य होण्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांना या औषधांचे वाटप का झाले नाही? या प्रश्नांचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही. या प्रकाराने शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.खानापूर तालुका कृषी विभागाचे गोदाम विटा ते कुंडल रस्त्यालगत जुन्या कार्यालयाजवळ आहे. गोदामात शासनाकडून शेतकऱ्यांना मोफत देण्यासाठी कीटकनाशक, तृणनाशक आणि विविध बियाणांचा साठा करण्यात आला आहे. काही वर्षांपासून कृषी औषधांचा साठा पडून होता. दोन दिवसांपूर्वी या औषधांच्या अनेक बाटल्या फुटल्याने व काही बाटल्यांना गळती लागल्याने कर्मचाऱ्यांनी ती गोदामाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या ओघळीत टाकून दिली.मात्र, नागरिकांचे लक्ष गेल्यानंतर या प्लॅस्टिक बाटल्या कर्मचाऱ्यांनी थेट जाळून टाकल्या. शनिवारी आत्मा संस्थेच्यावतीने गोदामाजवळ शेतकऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळी काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शिवाजी शिंदे यांना याची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकारामुळे शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.शासन दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी विविध योजनेतून कीटकनाशक, तृणनाशक, बियाणे यासह विविध कृषी अवजारांचे वाटप करीत असताना, कृषी विभागाकडून या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. मुदतबाह्य झाल्याने व दुर्गंधी येत असल्याने ही औषधे नष्ट केल्याचे तालुका कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. मुदतबाह्य होईपर्यंत ही औषधे गोदामात साठवून का ठेवण्यात आली? लाभार्थी शेतकऱ्यांना त्याचे वाटप का झाले नाही? शासनाचे लाखो रुपये पाण्यात घालण्यास जबाबदार कोण? यासह विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले असून, संबंधितांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)औषधे मुदतबाह्य : कारवाईची मागणीशासनाकडून साहित्य मिळत नसल्याचे सांगून दुष्काळी शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लाखो रुपयांची औषधे मुदतबाह्य झाली. औषधे जाळून नष्ट करण्याच्या प्रकाराची सखोल चौकशी करावी व दोषींवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शिवाजी शिंदे यांनी दिला.दुर्गंधी येऊ लागल्याने औषधे नष्टतालुका कृषी अधिकारी चंद्रकांत डुबल याबाबत म्हणाले की, ही औषधे मुदतबाह्य झाली होती. गेल्या पाच ते सात वर्षांपासून औषधे गोदामात पडून होती. परिणामी, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येऊ लागल्याने ती नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. गोदामात अजूनही कृषी विभागाकडील दुर्गंधीयुक्त व मुदतबाह्य औषधांचा साठा आहे. परंतु, सध्या ती नष्ट करण्याचे काम थांबविण्यात आले आहे.