शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:30 IST

कडेगाव : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील (वय ९५, रा. हणमंतवडिये, ता. कडेगाव) यांचे गुरुवारी सकाळी ...

कडेगाव : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील (वय ९५, रा. हणमंतवडिये, ता. कडेगाव) यांचे गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी पाच वाजता कऱ्हाड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत माजी आमदार भगवानराव पाटील यांच्या त्या पत्नी; तर शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड. सुभाष पाटील व प्रा. विलास पाटील यांच्या मातोश्री होत.

हौसाताई पाटील यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९२७ रोजी येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे झाला. वडील क्रांतिसिंह नाना पाटील भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सरसेनापती म्हणून भूमिगत झाले, तर हौसाताई तीन वर्षांच्या असतानाच आईचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत आजी गोजराबाई यांनी त्यांना आईचे प्रेम देत सांभाळ केला. पोलीस सतत नाना पाटील यांच्या पाळतीवर असल्याने ते मुलीला भेटायला येत नसत. महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ आजीच्या नसानसात भिनलेली होती. आजीकडून सत्यशोधक चळवळीचे बाळकडू घेतच हौसाताई मोठ्या झाल्या.

१९४० मध्येे वयाच्या तेराव्यावर्षी हणमंतवडिये येथील चळवळीतील तरुण भगवानराव पाटील यांच्याबरोबर हौसाताईंचे लग्न झाले. स्वातंत्र्यलढ्यात त्या सक्रिय होत्या. क्रांतिकारकांसमवेत त्यांनी अनेक मोहिमांत सहभाग घेतला होता. १९४३ ते १९४६ दरम्यान इंग्रजांच्या आगगाड्यांवर हल्ले करणाऱ्या, पोलिसांची शस्त्रे पळविणाऱ्या, डाक बंगले पेटवून देणाऱ्या क्रांतिकारकांच्या चमूत त्या होत्या. त्या इंग्रजांची माहिती गोळा करून क्रांतिकारकांपर्यंत पोहोचवत. हैदराबाद मुक्ती संग्राम आणि गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी योगदान दिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सहभाग होता.

स्वातंत्र्यानंतर महागाईविरोधी आंदोलन, दुष्काळविरोधी लढ्यात त्या अग्रेसर होत्या. आयुष्यभर कष्टकरी, श्रमिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्या लढत राहिल्या. पाणी प्रश्न, दुष्काळी भागातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लढा दिला. २००२ मध्ये खानापूर तहसील कार्यालयासमोर शंभर दिवसांहून अधिककाळ धरणे आंदोलन केले होते.

चाैकट

देहदानाची इच्छा अपूर्ण

हौसाताईंचे संपूर्ण जीवन शोषणविरहित समाज निर्मितीसाठी, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तसेच अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी गेले. तरुणांना लाजवेल अशी हिंमत, धाडस आणि करारी आवाज असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. तथापि त्यांच्यावर कोविड वॉर्डमध्ये उपचार सुरू असल्याने शासनाच्या नियमानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे क्रांतिवीरांगणेची देहदानाची इच्छा अपूर्ण राहिली.