शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:30 IST

कडेगाव : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील (वय ९५, रा. हणमंतवडिये, ता. कडेगाव) यांचे गुरुवारी सकाळी ...

कडेगाव : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील (वय ९५, रा. हणमंतवडिये, ता. कडेगाव) यांचे गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी पाच वाजता कऱ्हाड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत माजी आमदार भगवानराव पाटील यांच्या त्या पत्नी; तर शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड. सुभाष पाटील व प्रा. विलास पाटील यांच्या मातोश्री होत.

हौसाताई पाटील यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९२७ रोजी येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे झाला. वडील क्रांतिसिंह नाना पाटील भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सरसेनापती म्हणून भूमिगत झाले, तर हौसाताई तीन वर्षांच्या असतानाच आईचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत आजी गोजराबाई यांनी त्यांना आईचे प्रेम देत सांभाळ केला. पोलीस सतत नाना पाटील यांच्या पाळतीवर असल्याने ते मुलीला भेटायला येत नसत. महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ आजीच्या नसानसात भिनलेली होती. आजीकडून सत्यशोधक चळवळीचे बाळकडू घेतच हौसाताई मोठ्या झाल्या.

१९४० मध्येे वयाच्या तेराव्यावर्षी हणमंतवडिये येथील चळवळीतील तरुण भगवानराव पाटील यांच्याबरोबर हौसाताईंचे लग्न झाले. स्वातंत्र्यलढ्यात त्या सक्रिय होत्या. क्रांतिकारकांसमवेत त्यांनी अनेक मोहिमांत सहभाग घेतला होता. १९४३ ते १९४६ दरम्यान इंग्रजांच्या आगगाड्यांवर हल्ले करणाऱ्या, पोलिसांची शस्त्रे पळविणाऱ्या, डाक बंगले पेटवून देणाऱ्या क्रांतिकारकांच्या चमूत त्या होत्या. त्या इंग्रजांची माहिती गोळा करून क्रांतिकारकांपर्यंत पोहोचवत. हैदराबाद मुक्ती संग्राम आणि गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी योगदान दिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सहभाग होता.

स्वातंत्र्यानंतर महागाईविरोधी आंदोलन, दुष्काळविरोधी लढ्यात त्या अग्रेसर होत्या. आयुष्यभर कष्टकरी, श्रमिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्या लढत राहिल्या. पाणी प्रश्न, दुष्काळी भागातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लढा दिला. २००२ मध्ये खानापूर तहसील कार्यालयासमोर शंभर दिवसांहून अधिककाळ धरणे आंदोलन केले होते.

चाैकट

देहदानाची इच्छा अपूर्ण

हौसाताईंचे संपूर्ण जीवन शोषणविरहित समाज निर्मितीसाठी, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तसेच अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी गेले. तरुणांना लाजवेल अशी हिंमत, धाडस आणि करारी आवाज असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. तथापि त्यांच्यावर कोविड वॉर्डमध्ये उपचार सुरू असल्याने शासनाच्या नियमानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे क्रांतिवीरांगणेची देहदानाची इच्छा अपूर्ण राहिली.