शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

क्रांतिवीरांची महती पश्चिम महाराष्ट्रातच राहिली

By admin | Updated: March 23, 2015 00:43 IST

उज्ज्वल निकम : तृतीय स्मृतिदिनानिमित्त नागनाथअण्णांना वाळवा येथे आदरांजली

वाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा, क्रांतिसिंह नाना पाटील यांची महती पश्चिम महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली. योग्यपद्धतीने हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशपातळीवर मांडणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम विशेष सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केले.हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्यावतीने आयोजित क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या तृतीय स्मृतिदिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत, माजी सहकारमंत्री प्रा. डॉ. एन. डी. पाटील होते. व्यासपीठावर संकुलाच्या मार्गदर्शिका कुसूमताई नायकवडी, कार्यक्रमाचे निमंत्रक वैभव नायकवडी, अ‍ॅड. अनिकेत उज्ज्वल निकम, प्रतापसिंह जाधव उपस्थित होते.अ‍ॅड. उज्ज्वल निकम म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात स्वातंत्र्याची धगधगती मशाल क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनीच पेटविली. परंतु आजही नाना पाटील व क्रांतिसिंह डॉ. नागनाथअण्णा पश्चिम महाराष्ट्रापुरतेच मर्यादित आहेत. ते नागपूरला माहिती नाहीत. ते साऱ्या देशाला माहिती झाले पाहिजेत. तरच त्यांनी दीन-दलित, उपेक्षित, शोषित, पीडित, शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी यांच्यासाठी केलेले काम सगळ्यांना समजेल. माझी आई विमलाताई आणि क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा एकाच शाळेत शिक्षण घेत होते. पुढे माझी आईसुध्दा क्रांतिकारी लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांना मदत करू लागली. माझ्या आईच्या तोंडून बालपणापासूनच स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचा इतिहास ऐकून व पुढे तो वाचून मला आजच्या गुंडांविरुध्द लढण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. आज तरुणांना गुन्हेगारीचे आकर्षण वाटू लागले आहे. समाजमनात वाढलेले हे गुन्हेगारीचे आकर्षण दूर केले पाहिजे. यावेळी कुसूमताई नायकवडी म्हणाल्या की, शेतकऱ्यांची मुले- बाळे भिक्षुकासारखी दुसऱ्याच्या दारात उभी आहेत. तरी आपले सरकार डोळे उघडून मदत देण्यास तयार नाही. प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, गेल्या दहा वर्षात देशातील तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पुरोगामी म्हणून ढोल वाजवणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातील ६३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे. निमंत्रक वैभव नायकवडी यांनी स्वागत केले. यावेळी नायकवडी म्हणाले, अवकाळी पाऊस, ऊस दराचे एफआरपी, त्यातच साखर धंदा अडचणीचा, त्यामुळे शेतकरी जगतोय की मरतोय, हे कळेनासे झाले आहे.सभेपूर्वी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी इनडोअर स्पोर्टस् हॉलचे उद्घाटन निकम यांच्याहस्ते करण्यात आले. मान्यवरांनी समाधीस्थळी पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. नागनाथअण्णांच्या स्मारकासाठी शिराळा तालुक्यातील चरणच्या सरपंच सोनाली बाळासाहेब नायकवडी यांनी एक लाख रुपयांचा धनादेश वैभव नायकवडी यांच्याकडे सुपूर्द केला. सभेला गौरव नायकवडी, अपर्णा साळुंखे, सोनाली नायकवडी, प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, नंदिनी नायकवडी, किरण नायकवडी, भगवान पाटील, जयवंत अहिर, एन. एम. मंडलिक उपस्थित होते. (वार्ताहर)