शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसची ५० वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:28 IST

मिरज : कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसने मंगळवारी ५० वर्षे पूर्ण केली. सलग ५० वर्षे धावणारी ही रेल्वे ५० व्या ...

मिरज : कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसने मंगळवारी ५० वर्षे पूर्ण केली. सलग ५० वर्षे धावणारी ही रेल्वे ५० व्या वर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे स्थानकातच थांबून आहे.

दि. ११ मे १९७१ रोजी सुरू झालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी अत्यंत सोयीची असल्याने वर्षातील बाराही महिने फुल्ल असते. कोल्हापूर ते मुंबई हे ५१८ किलोमीटरचे अंतर १८ स्थानके ओलांडत ११ तासात पूर्ण करणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस दररोज सकाळी साडेसात वाजता मुंबईत व कोल्हापुरात पोहोचते. सांगली, कोल्हापुरात येणारे सेलिब्रिटी, राजकारणी आमदार, खासदार महालक्ष्मी एक्स्प्रेसनेच ये-जा करतात. कोल्हापूर, मिरज व सांगलीकरांसाठी लाईफलाईन ठरलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने मंगळवारी ५० वर्षे पूर्ण केली.

कोरोनामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत लॉकडाऊन असल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेससह बहुतांश एक्स्प्रेस जूनअखेरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे सुवर्णमहोत्सवात पदार्पण करणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस स्थानकातच थांबून आहे. महालक्ष्मी एक्स्प्रेसमुळे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळाली असून मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील प्रवाशांची पसंती महालक्ष्मी एक्स्प्रेसलाच आहे.

चाैकट

दाेन वर्षांपूर्वी महापुरात अडकली

प्रवाशांच्या या लाडक्या एक्स्प्रेसचा ५० वर्षांत एकही मोठा अपघात घडलेला नाही. दोन वर्षापूर्वी कर्जतजवळ बदलापूर व वांगणी स्थानकांदरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात रात्रभर अडकली होती. एनडीआरएफच्या पथकाने त्यातील एक हजार प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले होते.